शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद

By admin | Updated: January 7, 2016 00:40 IST

शेखर निकम : विद्यार्थी संघटनेचा मोर्चा

चिपळूण : उद्याचा खंबीर विद्याविभूषित नागरिक म्हणून ज्या विद्यार्थ्यांकडे पाहिले जाते, त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करणे हा शासनाचा नाकर्तेपणा आहे. आघाडी सरकारच्या काळात विद्यार्थी हिताच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यात आघाडी शासन यशस्वी झाले. मात्र, युती सरकार सत्तेत आल्यापासून विद्यार्थी देशोधडीला लागला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी केली. यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते - पाटील उपस्थित होते. सावर्डे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयासमोर सावर्डे विभागातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मोर्चात एकत्र आले होते. यावेळी निकम म्हणाले की, जगामध्ये तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाचे वाढणारे महत्त्व लक्षात घेऊन देशातील अन्य राज्यांमध्ये व्यावसायिक, तांत्रिक शिक्षणाला शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, राज्य शासनाला विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करुन नेमके काय साधायचे आहे? हे न उलगडलेले कोडे आहे. तातडीने विद्यार्थी शिष्यवृत्ती नव्याने सुरु न केल्यास आगामी काळात राज्य शासनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. शासनाच्या विरोधात शिष्यवृत्ती बंद केल्यामुळे विद्यार्थी एकवटत आहेत. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरु केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते - पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली सावर्डे, चिपळूण परिसरातील ५०० विद्यार्थी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी अशोक विचारे, सुनितकुमार पाटील, तानाजी कांबळे, उमेश लकेश्री, अमित सुर्वे, शकील मोडक, एकनाथ सावर्डेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)शासनाचा नाकर्तेपणा : विद्यार्थी एकवटलेयुती शासनाविरोधात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने टिकास्त्र सोडले आहे. शासनाचा नाकर्तेपणा समोर आणण्यासाठी आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केल्याचा मुद्दा यावेळी विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आला.आंदोलनाचा इशाराविद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ही शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.