शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

कोयना प्रकल्पग्रस्त उपोषणावर ठाम

By admin | Updated: August 14, 2014 22:40 IST

अलोरेत आंदोलन : कोयनेचा प्रश्न अजूनही सुटेना.

शिरगाव : कोयना प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रासाठी ५० वर्षांपूर्वी जमीन संपादित केल्यानंतर शासनाकडून प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या, उद्योगधंद्यासाठी व्यापारी गाळे यापैकी काहीच न देता फसवणूक केली. त्यापुढची स्थिती पाहता संपादित केलेल्या जमिनीवर होणाऱ्या अनधिकृत बांधकामांकडेही शासन डोळेझाक करत आहे. अशा विविध २३ मागण्यांची तातडीने पूर्तता व्हावी, यासाठी १५ आॅगस्ट रोजी अलोरेत उपोषण केले जाणार आहे. पंधरा दिवसांपूर्वी अलोरे - कोळकेवाडी नागावे (ता. चिपळूण) येथील सात प्रकल्पग्रस्तांनी उपोषणाची नोटीस देऊन आपल्या २३ मागण्यांचे निवेदन दिले. त्यावर आठ दिवसांपूर्वी कार्यकारी अभियंता रोकडे यांच्या दालनात दुपारी ३.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत बैठक घेण्यात आली. नवीनच आलेल्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केली. त्यानंतर आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना समक्ष धारेवर धरत आजवर केवळ अनधिकृत बांधकामाला नोटीसच का पाठवली? कठोर उपाययोजना का नाही ? असे प्रश्न विचारत कठोर कारवाईबाबत नोटीस काढण्याची सूचना दिली. आजअखेर शासनाची किती रक्कम येणे आहे, असे विचारताच ७५ लाख रुपये वसूल होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.प्रत्येक कार्यकाळात तत्कालीन अधिकाऱ्यांनी कोणाच्या दबावाखाली काम केले? शासनाचा महसूल बुडतो, त्याला जबाबदार कोण? निष्कासन दावा चालवण्याचा अधिकार कार्यकारी अभियंत्यांकडे नसताना का चालवला? याची उत्तरे कार्यकारी अभियंता रोकडे देऊ शकले नाहीत. तथापि त्यांनी प्रत्येक मुद्दा शासनाला कळवण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले. कोणत्याही राजकीय पक्षाचे, नेत्यांचे तूर्त पाठबळ न घेता नव्याने दोन महिन्यांपूर्वी स्थापन झालेली प्रकल्पग्रस्त समिती शासनाच्या केवळ आश्वासनाला बळी न पडता आपल्या उपोषणाबाबतच्या भूमिकेवर ठाम आहे. दि. १५ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजता उपोषण होणारच असल्याची माहिती उपोषणकर्ते नागावे, माजी सरपंच प्रकाश पालांडे यांनी दिली. (वार्ताहर)संपादित केलेल्या जमिनीवरील अनधिकृत बांधकामांकडेही शासनाची डोळेझाक.प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या नाहीत. उद्योगधंद्यासाठी व्यापारी गाळे नाहीत.प्रकल्पग्रस्तांच्या विविध २३ मागण्यांसाठी करण्यात येणार उपोषण.शासनाच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचा उपोषणकर्त्यांचा निर्धार.प्रकल्पामध्ये जमिनी गेल्या की, कोकणातील जमीनमालकांच्या पदरी निराशाच पडते. आतापर्यंत अनेक प्रकल्पांच्या बाबतीत असेच झाल्याने कोकणात नवीन प्रकल्पांना सुरुवातीला विरोध होतो. आता कोयना प्रकल्पाच्या बाबतीतही तोच प्रकार झाला असून, प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कोयना प्रकल्प होऊन इतकी वर्षे झाली तरीही मागण्यांची तड लागलेली नाही.