शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

गरज पडल्यास रत्नागिरीतही कडक लाॅकडाऊन करणार : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:33 IST

रत्नागिरी : काेराेनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ मे राेजी रात्री १२ पासून कडक लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात ...

रत्नागिरी : काेराेनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ मे राेजी रात्री १२ पासून कडक लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़. सिंधुदुर्गप्रमाणे गरज पडल्यास रत्नागिरी जिल्ह्यातही कडक लाॅकडाऊन करण्यात येईल़. याबाबत पालकमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करून येत्या दाेन दिवसांत निर्णय घाेषित करू, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली़

ऑनलाईन घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, सिंधुदुर्गात कडक लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे़. या लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील मेडिकल, आंबा वाहतूक, लसीकरण व अन्य महत्त्वाच्या बाबींसाठी सूट देण्यात येणार आहे़. अन्य सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले़. रत्नागिरीतही काेराेनाचे रुग्ण वाढत असल्याने कडक लाॅकडाऊन करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले़

कोरोनाची तिसरी लाट येणार असून, त्यामध्ये लहान मुले बाधित होण्याचा धोका आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी विशेष काळजी घेत लहान मुलांसाठी अद्ययावत काेविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. मुलांवर चांगले उपचार व्हावेत, यासाठी तज्ज्ञ बालरोगतज्ज्ञांची टीमही नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुल येथे खास महिलांसाठी स्वतंत्र शंभर बेडचे कोरोना रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे.

कोरोना रुग्णालयात ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची कमतरता भासत असल्याने रुग्णांना खुर्चीत किंवा बाकड्यावर झोपून उपचार द्यावे लागत आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, याबाबत आपण वस्तुस्थितीची माहिती घेताे, असे सांगितले. पत्रकारांना कोरोना लस उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे सांगून, लस उपलब्ध झाल्यानंतर जनतेसाठी लसीकरण करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.