शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

वाढत्या रुग्णसंख्येने रत्नागिरीवर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST

रत्नागिरी : जून महिना सुरू झाला तरीही कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणाखाली आलेली नाही. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रत्नागिरीतील दोन्ही कोविड रुग्णालये, ...

रत्नागिरी : जून महिना सुरू झाला तरीही कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणाखाली आलेली नाही. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रत्नागिरीतील दोन्ही कोविड रुग्णालये, डीसीएचसी आणि कोरोना सेंटर यावर अधिक ताण येत असल्याने रुग्णांना खाटा मिळणे जिकिरीचे झाले आहे.

जिल्ह्यात आता दरदिवशीच कोरोना रुग्णांची संख्या ५०० ते ६०० वर पोहोचू लागली आहे. त्यातच आता शासनाने सौम्य लक्षणे किंवा अजिबातच लक्षणे नसलेल्या आणि ज्यांच्या घरी स्वतंत्र अलगीकरणाची सोय आहे, अशा १० ते २० टक्के कोरोना रुग्णांना घरी उपचार करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी स्वतंत्र सोय आहे, अशा रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे असे रुग्णही आता अन्य तालुक्यांमध्ये कोरोना केअर सेंटर पुरेशा प्रमाणात नसल्याने तसेच तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रत्नागिरी शहरातील केअर सेंटरमध्ये दाखल होत आहेत.

रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने आणि रत्नागिरीतच महिला रुग्णालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालय अशी दोन कोविड रुग्णालये आहेत. त्यामुळे ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड तसेच अन्य उपचार गंभीर रुग्णांना या दोन रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. या सुविधा कामथे, कळंबणी, दापोली या उपजिल्हा रुग्णालयात काही प्रमाणात असल्या, तरी तज्ज्ञ डाॅक्टर्स रत्नागिरीतच आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी हलविले जात आहे. त्यामुळे या दोन्ही कोविड रुग्णालयांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. सध्या वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेने तज्ज्ञ डाॅक्टर्स आणि अन्य कर्मचारी यांची संख्या अपुरी असल्याने आरोग्य यंत्रणेचीही दमछाक होत आहे.

दरदिवशी येणाऱ्या पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये कुटुंबातील एकाबरोबरच अनेक सदस्य बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे. त्यामुळे अशांना एकत्र ठेवण्यासाठी आता केअर सेंटरमध्ये क्षमता अपुरी पडू लागली आहे.

रुग्णसंख्या वाढू लागली असली, तरी अजूनही केअर सेंटरमध्ये आणखी वाढ न झाल्याने आहे त्याच केअर सेंटरमध्ये सर्वच खाटा भरलेल्या राहात आहेत. त्यामुळे नव्या रुग्णांना या केअर सेंटरमध्येही जागा मिळताना अडचणी येत आहेत.

चौकट

शासनाच्या नव्या निर्णयानुसार, ज्या ग्रामपंचायतींमध्ये २००० पेक्षा अधिक लोकसंख्या आहे, त्या ग्रामपंचायतींनी गावातील सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांसाठी अलगीकरण कक्ष सुरू करावयाचे आहेत. मात्र, ते सुरू करतानाही बाधितांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा देणे आवश्यक आहे. मात्र, या रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्यास त्यांना तालुक्याच्या डीसीएचसी किंवा रत्नागिरीतील कोरोना रुग्णालयांमध्ये दाखल करावे लागणार आहे. सध्या काही ग्रामपंचायतींकडून याची उभारणी करण्याचे काम सुरू आहे. मात्र, सध्या कोरोना रुग्णसंख्या अजूनही भरमसाठ वाढत असल्याने रत्नागिरीतील कोरोना रुग्णालय तसेच कोविड सेंटरवर अधिक ताण येत आहे.