शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

वाढत्या रुग्णसंख्येने रत्नागिरीवर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST

रत्नागिरी : जून महिना सुरू झाला तरीही कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणाखाली आलेली नाही. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रत्नागिरीतील दोन्ही कोविड रुग्णालये, ...

रत्नागिरी : जून महिना सुरू झाला तरीही कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणाखाली आलेली नाही. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रत्नागिरीतील दोन्ही कोविड रुग्णालये, डीसीएचसी आणि कोरोना सेंटर यावर अधिक ताण येत असल्याने रुग्णांना खाटा मिळणे जिकिरीचे झाले आहे.

जिल्ह्यात आता दरदिवशीच कोरोना रुग्णांची संख्या ५०० ते ६०० वर पोहोचू लागली आहे. त्यातच आता शासनाने सौम्य लक्षणे किंवा अजिबातच लक्षणे नसलेल्या आणि ज्यांच्या घरी स्वतंत्र अलगीकरणाची सोय आहे, अशा १० ते २० टक्के कोरोना रुग्णांना घरी उपचार करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी स्वतंत्र सोय आहे, अशा रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे असे रुग्णही आता अन्य तालुक्यांमध्ये कोरोना केअर सेंटर पुरेशा प्रमाणात नसल्याने तसेच तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रत्नागिरी शहरातील केअर सेंटरमध्ये दाखल होत आहेत.

रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने आणि रत्नागिरीतच महिला रुग्णालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालय अशी दोन कोविड रुग्णालये आहेत. त्यामुळे ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड तसेच अन्य उपचार गंभीर रुग्णांना या दोन रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. या सुविधा कामथे, कळंबणी, दापोली या उपजिल्हा रुग्णालयात काही प्रमाणात असल्या, तरी तज्ज्ञ डाॅक्टर्स रत्नागिरीतच आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी हलविले जात आहे. त्यामुळे या दोन्ही कोविड रुग्णालयांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. सध्या वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेने तज्ज्ञ डाॅक्टर्स आणि अन्य कर्मचारी यांची संख्या अपुरी असल्याने आरोग्य यंत्रणेचीही दमछाक होत आहे.

दरदिवशी येणाऱ्या पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये कुटुंबातील एकाबरोबरच अनेक सदस्य बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे. त्यामुळे अशांना एकत्र ठेवण्यासाठी आता केअर सेंटरमध्ये क्षमता अपुरी पडू लागली आहे.

रुग्णसंख्या वाढू लागली असली, तरी अजूनही केअर सेंटरमध्ये आणखी वाढ न झाल्याने आहे त्याच केअर सेंटरमध्ये सर्वच खाटा भरलेल्या राहात आहेत. त्यामुळे नव्या रुग्णांना या केअर सेंटरमध्येही जागा मिळताना अडचणी येत आहेत.

चौकट

शासनाच्या नव्या निर्णयानुसार, ज्या ग्रामपंचायतींमध्ये २००० पेक्षा अधिक लोकसंख्या आहे, त्या ग्रामपंचायतींनी गावातील सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांसाठी अलगीकरण कक्ष सुरू करावयाचे आहेत. मात्र, ते सुरू करतानाही बाधितांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा देणे आवश्यक आहे. मात्र, या रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्यास त्यांना तालुक्याच्या डीसीएचसी किंवा रत्नागिरीतील कोरोना रुग्णालयांमध्ये दाखल करावे लागणार आहे. सध्या काही ग्रामपंचायतींकडून याची उभारणी करण्याचे काम सुरू आहे. मात्र, सध्या कोरोना रुग्णसंख्या अजूनही भरमसाठ वाढत असल्याने रत्नागिरीतील कोरोना रुग्णालय तसेच कोविड सेंटरवर अधिक ताण येत आहे.