शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मातेच्या परिश्रमाने दिले मुलांच्या पंखांना बळ

By admin | Updated: October 7, 2016 00:17 IST

जयश्री वाडेकर : २९व्या वर्षीच वैधव्याच्या कुऱ्हाडीमुळे खस्ता खात उचलला संसाराचा गाडा--सलाम

शोभना कांबळे -- रत्नागिरी -केवळ दहा वर्षांचा संसार मोडला. अवघ्या २९व्या वर्षीच वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. तीन अजाण मुलांना पदरात टाकून पती कायमस्वरूपी प्रवासाला निघून गेला. मात्र, परिस्थितीने डगमगून न जाता दहा घरची धुणी-भांडी करून जयश्री अरूण वाडेकर यांनी आपल्या मुलांना केवळ वाढविले नाही तर त्यांनाही स्वकमाईवर शिक्षण करण्यास उद्युक्त केले. आईच्या ललाटावर नियतीने कष्ट लिहिले असले तरी त्या पाऊलवाटेवरून जात मुलांनीही आपले आयुष्य उजळवले, एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही कथा. रत्नागिरीनजीकच्या नारायणमळी येथील अरूण वाडेकर यांच्याशी जयश्री वाडेकर यांचे १९व्या वर्षी लग्न झाले. लग्नापासूनच त्यांच्या कष्टाला सुरूवात झाली होती. पती व्यसनाधीन झाल्याने संसाराला ग्रहण लागण्यास सुरुवात झाली. त्यातच तीन मुले पदरात. अखेर व्यसनाने पती हिरावून घेतला आणि जयश्री वाडेकर तीन लहानग्यांसह एकाकी पडल्या. त्यावेळी मोठी मुलगी जागृती दुसरीत शिकत होती. दोन नंबरचा अनिल चार वर्षांचा आणि लहानगा सुनील केवळ दोन वर्षांचा. काही दिवस सासुबाई सोबत होत्या. पण, नंतर त्याही निघून गेल्या. कुणाचाही आधार नाही. कसा करणार उदरनिर्वाह? मुलांची काळजी जयश्री वाडेकर यांना छळू लागली. काहीही झालं तरी मुलांना मोठं करायचं, त्यांना शिकवायचं, असा निर्धार त्यांनी केला. पती निधनाचे दु:ख बाजुला सारून त्यांनी कंबर बांधली आणि रत्नागिरी शहरात येऊन धुणीभांडी करण्यास सुरुवात केली. हळूहळू घरकामे मिळू लागली. दहा घरची कामे करताना त्यांचा अख्खा दिवस जायचा. सकाळी ९ वाजता दोन्ही वेळचे जेवण करून ठेवावे लागे. लहानग्यांना घरी सोडून येताना त्यांचा जीव कासावीस व्हायचा. घरी पोहोचेपर्यंत रात्रीचे आठ वाजायचे. रात्री घरी गेल्यानंतर मुलांना कुशीत घेताना दिवसभराचा सारा शिणवटा निघून जायचा. हळूहळू घरकामांमधून चार पैसे हातात येऊ लागले, मुले शाळेत जाऊ लागली. आईच्या कष्टाच्या पाऊलवाटेवरून जात मुलांचे शिक्षण सुरू झाले. मोठी मुलगी बारावी झाली. दहावीनंतर तिने रत्नागिरीतील वाचनालयात, तर बारावीनंतर टेलिफोन कार्यालयात काम करण्यास सुरूवात केली. त्यातून मिळणाऱ्या मोबदल्यात तिचे पुढचे शिक्षण सुरू झाले. पदवीधर झाल्यानंतर जयश्री वाडेकर यांनी तिचा विवाह करून दिला. तिच्याही कष्टाचे चीज झाले. सध्या ती कोर्टात नोकरी करीत आहे.दोन नंबरचा अनिल बारावी झाला आणि त्याने रत्नागिरीतील एका मेडिकल स्टोअर्समध्ये काम करून शिक्षण घेण्यास सुरूवात केली. स्वकमाईवर त्याने ‘बी. एम. एस.’ केले. आज तो एका नामांकित कंपनीचा ‘रिप्रेझेंटेटिव्ह’ म्हणून काम करीत आहे.धाकटा सुनील बारावीनंतर छोटी-मोठी कामे करत आता बाहेरून परीक्षा देत पदवीधर झाला आहे. तो आता मार्केटिंगच्या क्षेत्रात काम करीत आहे. आयुष्यभर कष्ट करून जयश्री वाडेकर आता थकल्या असल्या तरी ज्या कामांवर आपण मुलांचे जीवन घडविले, ती कामे सोडू नयेत, असे त्यांना मनापासून वाटते. पण, आता थकलेले शरीरही साथ देत नाही. त्यामुळे आजारपणाचा सामना करावा लागत आहे. त्यातच त्यांच्या तीनही मुलांना आता आपल्या आईने यापुढे तरी कष्ट करू नयेत, असे वाटतेय. त्यामुळे सध्या त्यांनी आपली कामे थांबवली आहेत. पूर्वी एकच छोटीशी खोली असलेल्या सामायिक घराची आता वाटणी झाल्याने जयश्री वाडेकर यांची मुले आता स्वकष्टाच्या कमाईतून घराचे स्वप्न पूर्ण करीत आहेत. त्याच्या पूर्ततेसाठी सध्या त्या आपला सर्व वेळ खर्च करीत आहेत.मुलांची साथ मोलाची आईचे कष्ट पाहून लहानपणापासूनच मुलांच्या अंगी काटकसर बाणली गेली. कधीकधी अनवाणी शाळेत जाण्याचीही वेळ या मुलांवर आली. शाळेचा एकच गणवेश असल्याने रात्री तो धुवून चुलीवर वाळवून दुसऱ्या दिवशी तो घालून ही मुले शाळेत जायची. जुन्या शाळेच्या वस्तू, पुस्तके, दप्तरे वापरताना या मुलांनी कधीच कुरकूर केली नाही. लहानपणापासूनच कष्ट जयश्री वाडेकर यांच्या मुलांनी लहानपणापासूनच शिक्षणासाठी कष्ट करण्यास सुरूवात केली. अनिल याने तर सातवीनंतर बागकाम करण्यास सुरूवात केली. मेडिकल स्टोअर्समध्ये काम करत असताना त्याला एका कनवाळू बार्इंनी जुनी सायकल दिली. ती घेऊन तो रात्री-अपरात्री घरी जायचा. पण त्याने जिद्दीने बी. एम. एस.चे शिक्षण पूर्ण केले.