शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

कांगणेवाडीत पथदीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:33 IST

रस्त्याची उंची वाढविण्याची मागणी राजापूर : तालुक्यातील ओणी-अणुस्कुरा मार्गावरील साैंदळ रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर पुराचे पाणी साचून वाहतूक पावसाळ्यात दीर्घकाळ ...

रस्त्याची उंची वाढविण्याची मागणी

राजापूर : तालुक्यातील ओणी-अणुस्कुरा मार्गावरील साैंदळ रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर पुराचे पाणी साचून वाहतूक पावसाळ्यात दीर्घकाळ बंद राहते. त्यामुळे साैंदळ येथील त्या खोलगट भागात मातीचा भराव टाकून त्याची उंची वाढविण्याची मागणी प्रवासी, वाहनचालकांमधून होत आहे.

चार्जिंगला बंदी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मागार्वरून रात्रीच्या वेळी धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील मोबाइल, लॅपटाॅप चार्जिंगसाठी वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत चार्जिंग पोर्टचा वीजपुरवठा बंद असल्याने प्रवाशांना मोबाइल, लॅपटाॅप चार्जिंग करता येणार नाही.

संरक्षक कठडे गायब

आरवली : आरवली- कुचांबे रस्त्यावर मुरडवनजीक पाटबंधारे खात्याने बांधलेल्या कालव्यावरील पुलाला संरक्षक कठडे नाहीत. त्यामुळे हा पूल वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे. पाटबंधारे खात्याच्या गडनदी धरणाचा डावा कालवा मुरडव गावातून काढला आहे. या कालव्यावर पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.

जलसेवेचे लोकार्पण

खेड : भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून भारतीय जैन संघटनेच्या खेड शाखेतर्फे नगर परिषदेला शीतल जलसेवा प्रदान करण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण करण्यात आले. तीनबत्ती नाका येथील हुतात्मा अनंत कान्हेरे पुतळ्याजवळ ही जलसेवा उभारण्यात आली आहे.

अण्णा पाथरे यांची निवड

राजापूर : तालुका अखंड वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष अण्णा पाथरे यांची पाचल व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अशोक सक्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत त्यांची निवड करण्यात आली आहे.

आढावा सभा

राजापूर : तालुक्यातील पेंडखळे गावात कोरोना रुग्ण वाढत असल्याने गाव कोरोना हाॅटस्पाॅट बनले आहे. याबाबत लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

माळनाक्यावर वृक्षलागवड

गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर येथील साथसाथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ओसाड माळरानावर जंगलाच्या निर्मितीतून ऑक्सिजन देणारी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वड, पिंपळ, जांभूळ, हरडा, बेहडा, चिंच आदी ४०० झाडे लावण्यात आली आहेत. वेळेणेश्वर येथील ओसाड जागेत वृक्षलागवड करण्यात आली.

बेडची मागणी

रत्नागिरी : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दहा टक्के बेड शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, रत्नागिरी शाखेतर्फे करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन महासंघाचे अध्यक्ष वामन कदम यांनी दिले आहे.

गाव तेथे क्वारंटाइन सेंटर

राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यात गाव तिथे क्वारंटाइन सेंटर उभारण्यात यावे, तसेच जिथे क्वारंटाइन सेंटर तेथे ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर करावा, अशी मागणी राजापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते अविनाश लाड यांनी केले आहे.