शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राजापूर किनारपट्टीला वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:30 IST

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाचा राजापूर तालुक्यात रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान प्रवेश झाला आणि किनाऱ्यावर लाटा उसळू लागल्या़ ...

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाचा राजापूर तालुक्यात रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान प्रवेश झाला आणि किनाऱ्यावर लाटा उसळू लागल्या़ किनाऱ्यालगत असलेल्या नाटे, सागवे, साखरीनाटे, आंबोळगड, दळे, वाडापेठ, मुसाकाझी, कशेळी गावांना जोरदार तडाखा बसला़ वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, काही ठिकाणी घरे व गोठ्याची पडझड झाली आहे. काही ठिकाणी घरावर वृक्ष कोसळून नुकसान झाले आहे़ मात्र, तालुक्यात काेठेही जीवितहानी झालेली नाही़

तौक्ते चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यात सागवे येथे दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला होता़ पावसाचा जाेरही वाढला हाेता़ राजापूरमध्ये हे वादळ आल्यानंतर तालुक्यातील सागवे, नाटे, जैतापूर, आंबोळगड, मुसाकाझी परिसरात वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्याचबरोबर पाऊसही सुरू झाला आहे.

कारिवणे गावात गणपत गोकुळ नाकटे यांच्या घराची एक बाजू कोसळून नुकसान.

जीवितहानी झालेली नाही त्यांना नातेवाइकाकडे स्थलांतरित करण्यात आले, तर जैतापूर व जुवे जैतापूर या गावांना या वादळाचा जोरदार तडाखा बसला. जैतापूर येथे घरांवर माड पडून बऱ्याच जणांचे नुकसान झाले, तर काहींच्या घरांचे पत्रे, कौले उडाली आहेत़ मात्र, कोठेही जीवितहानी झालेली नाही. होळी गावातसुद्धा घरांवर माड व इतरही झाडे पडून नुकसान झाले आहे.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून प्रशासनाने आंबोळगड येथील ६८ कुटुंबांतील २५४ व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले होते. मुसाकाझी येथील दोन कुटुंबांचे, तर आवळीचीवाडी येथील सात कुटुंबातील ३५ व्यक्तींचे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

राजापूर डोंगर मार्गावर झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती़ मात्र, प्रशासनाने झाड हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर केले. या वादळाने राजापूर शहराला तडाखा दिला असून, वादळाला वारे हळूहळू रत्नागिरीकडे सरकत आहेत. या वादळचा पुढे सरकण्याचा वेग ताशी सात किलोमीटर एवढा हाेता़ सायंकाळी पाचच्या सुमाराला हे वादळ रत्नागिरीच्या दिशेने सरकल्यानंतर वाऱ्याचा वेग काहीसा कमी झाला हाेता़