शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

राजापूर किनारपट्टीला वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:30 IST

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाचा राजापूर तालुक्यात रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान प्रवेश झाला आणि किनाऱ्यावर लाटा उसळू लागल्या़ ...

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाचा राजापूर तालुक्यात रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान प्रवेश झाला आणि किनाऱ्यावर लाटा उसळू लागल्या़ किनाऱ्यालगत असलेल्या नाटे, सागवे, साखरीनाटे, आंबोळगड, दळे, वाडापेठ, मुसाकाझी, कशेळी गावांना जोरदार तडाखा बसला़ वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, काही ठिकाणी घरे व गोठ्याची पडझड झाली आहे. काही ठिकाणी घरावर वृक्ष कोसळून नुकसान झाले आहे़ मात्र, तालुक्यात काेठेही जीवितहानी झालेली नाही़

तौक्ते चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यात सागवे येथे दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला होता़ पावसाचा जाेरही वाढला हाेता़ राजापूरमध्ये हे वादळ आल्यानंतर तालुक्यातील सागवे, नाटे, जैतापूर, आंबोळगड, मुसाकाझी परिसरात वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्याचबरोबर पाऊसही सुरू झाला आहे.

कारिवणे गावात गणपत गोकुळ नाकटे यांच्या घराची एक बाजू कोसळून नुकसान.

जीवितहानी झालेली नाही त्यांना नातेवाइकाकडे स्थलांतरित करण्यात आले, तर जैतापूर व जुवे जैतापूर या गावांना या वादळाचा जोरदार तडाखा बसला. जैतापूर येथे घरांवर माड पडून बऱ्याच जणांचे नुकसान झाले, तर काहींच्या घरांचे पत्रे, कौले उडाली आहेत़ मात्र, कोठेही जीवितहानी झालेली नाही. होळी गावातसुद्धा घरांवर माड व इतरही झाडे पडून नुकसान झाले आहे.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून प्रशासनाने आंबोळगड येथील ६८ कुटुंबांतील २५४ व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले होते. मुसाकाझी येथील दोन कुटुंबांचे, तर आवळीचीवाडी येथील सात कुटुंबातील ३५ व्यक्तींचे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

राजापूर डोंगर मार्गावर झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती़ मात्र, प्रशासनाने झाड हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर केले. या वादळाने राजापूर शहराला तडाखा दिला असून, वादळाला वारे हळूहळू रत्नागिरीकडे सरकत आहेत. या वादळचा पुढे सरकण्याचा वेग ताशी सात किलोमीटर एवढा हाेता़ सायंकाळी पाचच्या सुमाराला हे वादळ रत्नागिरीच्या दिशेने सरकल्यानंतर वाऱ्याचा वेग काहीसा कमी झाला हाेता़