शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

तात्पुरत्या आरोग्य भरतीचा फार्स थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:31 IST

रत्नागिरी : आरोग्य विभागात असंख्य जागा रिक्त असताना सरकार केवळ तात्पुरत्या नेमणुका करुन आरोग्य यंत्रणा सुस्थितीत असल्याचा फार्स करत ...

रत्नागिरी : आरोग्य विभागात असंख्य जागा रिक्त असताना सरकार केवळ तात्पुरत्या नेमणुका करुन आरोग्य यंत्रणा सुस्थितीत असल्याचा फार्स करत आहे, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे. ही फसवणूक तत्काळ थांबवून कायमस्वरुपी भरती केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

रत्नागिरीच्या आरोग्य व्यवस्थेत पुरेसे मनुष्यबळ नाही. रुग्ण संख्या वाढत आहे. मात्र, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वॉर्ड बॉय आणि अन्य कर्मचारी यांची वानवा सातत्याने असल्याने यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असताना लोकप्रतिनिधी, महाआघाडी शासन बेफिकीर आहे. भाजपवर राजकारण करण्याचा आरोप केला की, सगळे अपयश माफ होते, अशा समजुतीत सत्ताधीश मश्गुल आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

गेले अनेक महिने आरोग्य व्यवस्थेत खूप जागा रिक्त आहेत. अगदी गळ्याशी आले की, तात्पुरती भरती करण्याची घोषणा करणे, हा खेळ झाला आहे. कोरोनासारख्या महामारीत धोका पत्करून २ आणि ३ महिन्यांसाठी कोणतीही भविष्याची हमी, सुरक्षितता नसताना, धोका पत्करून आरोग्य यंत्रणेत अल्प मोबदल्यावर काम करायला लावणे म्हणजे गरजू बेरोजगारांची चेष्टा आहे. जाहिरात देऊनही माणसे मिळत नाहीत, असे म्हणायला यंत्रणा तयार असते. परत तात्पुरती भरती होणार, अशी माहिती पुढे आली आहे. हा खेळ थांबवून रितसर भरती केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तात्पुरती भरती हा बेरोजगार तरुणांना धोक्यात टाकण्याचा खेळ आहे. कोरोनाच्या या अवघड कालावधीत रूजू होणाऱ्या व्यक्तिंना भविष्यात भरतीत प्राधान्य देण्याचे आणि त्यांना गरज लागली तर मोफत उपचार देण्याची हमी घोषित करावी. एका बाजूला नागरिकांचे आरोग्य आणि दुसऱ्या बाजूला तात्पुरत्या रोजगाराचे फसवे मायाजाल दाखवून चाललेली फसवणूक तत्काळ थांबवावी. रिक्त जागा भरण्याच्या खऱ्या मानसिकतेने भरती अभियान राबवले तरच हा अनुशेष भरून आरोग्य व्यवस्थेचा भार हलका होईल, अशी मागणी त्यांनी केली आहे.