शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

तौक्ते वादळातील नुकसानभरपाईची अद्यापही प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST

राजापूर : काही दिवसांपूर्वी कोकणातून गेलेल्या तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या तालुक्यातील जनतेला अद्यापही भरपाईची प्रतीक्षा करावी लागत आहे़ ...

राजापूर : काही दिवसांपूर्वी कोकणातून गेलेल्या तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या तालुक्यातील जनतेला अद्यापही भरपाईची प्रतीक्षा करावी लागत आहे़ दरम्यान, तालुक्यातील नुकसानग्रस्त जनतेला शासनाकडून केव्हा भरपाई मिळणार आहे, अशी संतप्त विचारणा जनमानसातून केली जात आहे.

दक्षिणेकडून आलेल्या व गुजरातकडे सरकलेल्या तौक्ते वादळाचा राजापूर तालुक्याला मोठा तडाखा बसला होता. त्यामध्ये सुमारे दीड कोटीच्या आसपास नुकसान झाले आहे़ येथील तालुका प्रशासनाकडून तेवढ्या रकमेची मागणी शासन स्तरावर करण्यात आली आहे. मात्र, त्याला बरेच दिवस लोटले तरी नुकसानग्रस्त जनतेला अद्याप नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे़ तालुक्याला अजूनपर्यंत शासनाकडून कुठल्याच प्रकारची मदत मिळालेली नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त जनता शासनाकडून मिळणाऱ्या भरपाईच्या प्रतीक्षेत आहे़ याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता अजूनही वादळातील बाधित जनतेला भरपाईची रक्कम आलेली नसल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे आता नेमकी केव्हा ही मदतीची रक्कम मिळणार आहे, अशी संतप्त विचारणा नुकसानग्रस्तांकडून केली जात आहे़