शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
2
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
3
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
4
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
5
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
6
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
7
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
8
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
9
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
10
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
11
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
12
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
13
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
14
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
15
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
16
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
17
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
18
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
19
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
20
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू

तंटामुक्तीची अजून प्रतीक्षाच

By admin | Updated: May 4, 2016 23:55 IST

राजापूर तालुका : तंट्यातून मोकळा श्वास मिळणार कधी?

राजापूर : मागील ९ वर्षे राज्यात धडाक्यात राबविल्या जात असलेल्या महात्मा गांधी गाव तंटामुक्त योजनेला १ मे पासून सुरुवात झाली असली तरी मागील काही वर्षांच्या तुलनेत या कामामध्ये शिथिलता आली असून, राजापूर तालुक्यात तर काही गावे अद्यापही तंटामुक्त न झाल्याने ती केव्हा मुक्ततेचा श्वास घेणार, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.माजी उपमुख्यमंत्री व तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यातील दिवसागणिक वाढते अमाप तंटे व त्याचा कमी होणारा निपटारा यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त योजना सुरु केली. या योजनेत सहभाग घेऊन तंटामुक्त होणाऱ्या गावांसाठी घसघशीत बक्षिसे ठेवण्यात आली होती. या योजनेला राज्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व असंख्य गावांनी परस्पर तडजोडी करत आपापसातील तंटे मिटवले व बक्षिसे मिळवली.राजापूर तालुक्याने देखील तंटामुक्त योजनेत सहभाग घेत आपल्या यशाचा आलेख चढता ठेवला. मागील सहा ते सात वर्षामध्ये तालुक्यातील एकूण एकशेएक ग्रामपंचायतींपैकी साठ ते सत्तर गावे ही तंटामुक्त ठरली होती. ही योजना सुरु झाल्यानंतर पहिल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह््यात विशेष पुरस्कारासाठी पात्र ठरलेली तीनही गावे ही राजापूर तालुक्यातील होती. जिल्ह््यात तंटामुक्त योजनेंतर्गत राजापूर तालुक्याचे काम उत्कृष्ट राहिले आहे.मात्र, तालुक्यातील पाचल, रायपाटण अशा मोठ्या गावांसहीत अन्य काही गावे अजूनही तंटामुक्त झालेली नाहीत. परिणामी ही गावे शासकीय पातळीवरुन मिळणाऱ्या बक्षिसापासून वंचित राहिली आहेत. त्यामुळे चालू वर्षी तरी या वंचित असलेली ही गावे पुरस्कार पटकावण्याची संधी साधणार का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे.राजापूर तालुका तंटामुक्ती अभियानावर एक कटाक्ष टाकल्यास असे दिसून येईल की, पहिली चार-पाच वर्षे नेटाने हे अभियान राबविले गेले. मात्र, मागील तीन ते चार वर्षे तालुक्यात या अभियानाचा मागमूसच नसल्याचे पुढे आले आहे. या कालावधीत फारशी गावे तंटामुक्त झालेली नाहीत. तालुकास्तरावर तहसील कार्यालयासहीत पोलीस ठाण्याच्या तंटामुक्त समित्यांच्या स्थापनाही झालेल्या नाहीत. दि. १ मे रोजी गावांमध्ये ग्रामसभा घेऊन आपण या योजनेत सहभाग घेणार असल्याचे घोषित करायचे असते. पण तालुक्यातील राजापूर व नाटे या दोन्ही पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या किती गावांनी आपला सहभाग निश्चित केला ते कळू शकलेले नाही. स्थानिक पोलीस यंत्रणेतही उदासीनता दिसून आली आहे. त्यामुळे महात्मा गांधी तंटामुक्त योजनेंतर्गत तालुक्यात तंटामुक्तीपासून वंचित असलेली गावे यावर्षी तरी पुरस्काराला पात्र ठरतील का, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)तंटामुुक्त : किरकोळ वादही पोलीस ठाण्यापर्यंत...राजापूर तालुक्यातील काही गावांमुळे राजापूर तालुका तंटामुक्त होण्यात अडचण निर्माण होत आहे. या गावांमध्ये उद्भवणाऱ्या किरकोळ तंट्यांचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत जात असून, त्यामुळे संपूर्ण तालुका तंटामुक्त होऊ शकलेला नाही. किरकोळ वादही पोलीस ठाण्यापर्यंत जात असल्याने त्या-त्या ठिकाणच्या तंटामुक्त समित्यांनी आता याबाबत जागृती करणे गरजेचे आहे.४० गावे प्रतीक्षेत...राजापूर तालुक्यातील जवळपास ४० गावे अद्याप तंटामुक्त होणे बाकी आहेत तर जवळपास ६० ते ७० गावे तंटामुक्त झाली आहेत. उर्वरित गावे तंटामुक्त होणार कधी? असा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.