शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

पासबद्दल रत्नागिरीत मात्र अद्याप संभ्रम

By admin | Updated: July 20, 2014 22:46 IST

सेवानिवृत्तांमध्ये समाधान : कर्मचारी संघटनेच्या लढ्याला यश

रत्नागिरी : एस. टी महामंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पाचशे रूपये भरून वर्षभर मोफत प्रवासाची सवलत राज्य परिवहनमंत्री मधुकर चव्हाण यांनी जाहीर केली. या जाहीर केलेल्या सवलतीमुळे सेवानिवृत्तांमध्ये समाधान पसरले आहे. परंतु रत्नागिरी विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी या सवलतीपासून अद्याप संभ्रमात आहेत. एस. टी. प्रशासनात सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मोफत वर्षभर पास मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र एस. टी. निवृत्त कर्मचारी संघटनेने केली होती. त्यासाठी परिवहन राज्यमंत्री मधुकर चव्हाण यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दोन महिने मोफत पाससह उर्वरित दहा महिने ५०० रूपये भरून सवलतीचा पास देण्याचा निर्णय घेण्यात आला. या पाचशे रूपयांमध्ये थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही निवृत्त कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.सेवानिवृत्त कर्मचाऱ्यासह त्याच्या जोडीदारासही मोफत प्रवास करता येणार आहे. तसेच कर्मचारी मृत झाल्यास त्याच्या जोडीदाराला पास वापरता येणार आहे. परंतु या निर्णयाबाबत रत्नागिरी विभागातील सेवानिवृत्तांमध्ये संभ्रम आहे. एस. टी. प्रशासन दीड हजार कोटींचा संचित तोटा सोसत असतानाच सेवानिवृत्तांसाठी पास सवलतीचा घेतलेला निर्णय अनपेक्षित आहे. सध्या एस. टी.चे भारमान खालावलेले आहे. तरीही प्रशासनाने सेवानिवृत्तांसाठी जाहीर केलेल्या निर्णयामुळे भारमान वाढेलच शिवाय प्रत्येक सेवानिवृत्ताकडून ५०० रूपयेप्रमाणे एस. टी.च्या महसुलात काही प्रमाणात भर पडेल, असाही विचार मांडण्यात आला आहे. (प्रतिनिधी)