शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

पासबद्दल रत्नागिरीत मात्र अद्याप संभ्रम

By admin | Updated: July 20, 2014 22:46 IST

सेवानिवृत्तांमध्ये समाधान : कर्मचारी संघटनेच्या लढ्याला यश

रत्नागिरी : एस. टी महामंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पाचशे रूपये भरून वर्षभर मोफत प्रवासाची सवलत राज्य परिवहनमंत्री मधुकर चव्हाण यांनी जाहीर केली. या जाहीर केलेल्या सवलतीमुळे सेवानिवृत्तांमध्ये समाधान पसरले आहे. परंतु रत्नागिरी विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी या सवलतीपासून अद्याप संभ्रमात आहेत. एस. टी. प्रशासनात सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मोफत वर्षभर पास मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र एस. टी. निवृत्त कर्मचारी संघटनेने केली होती. त्यासाठी परिवहन राज्यमंत्री मधुकर चव्हाण यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दोन महिने मोफत पाससह उर्वरित दहा महिने ५०० रूपये भरून सवलतीचा पास देण्याचा निर्णय घेण्यात आला. या पाचशे रूपयांमध्ये थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही निवृत्त कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.सेवानिवृत्त कर्मचाऱ्यासह त्याच्या जोडीदारासही मोफत प्रवास करता येणार आहे. तसेच कर्मचारी मृत झाल्यास त्याच्या जोडीदाराला पास वापरता येणार आहे. परंतु या निर्णयाबाबत रत्नागिरी विभागातील सेवानिवृत्तांमध्ये संभ्रम आहे. एस. टी. प्रशासन दीड हजार कोटींचा संचित तोटा सोसत असतानाच सेवानिवृत्तांसाठी पास सवलतीचा घेतलेला निर्णय अनपेक्षित आहे. सध्या एस. टी.चे भारमान खालावलेले आहे. तरीही प्रशासनाने सेवानिवृत्तांसाठी जाहीर केलेल्या निर्णयामुळे भारमान वाढेलच शिवाय प्रत्येक सेवानिवृत्ताकडून ५०० रूपयेप्रमाणे एस. टी.च्या महसुलात काही प्रमाणात भर पडेल, असाही विचार मांडण्यात आला आहे. (प्रतिनिधी)