शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

भात उत्पादनात भरघोस वाढ

By admin | Updated: June 25, 2014 00:49 IST

सव्वातीन कोटी उत्पन्न : शेतकऱ्यांना यंदा मिळाला बोनस

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अंतरिम बजेटमध्ये उत्पादन शुल्कात दिलेली सवलत 30 जून रोजी संपणार आहे. या सवलतीला मुदतवाढ न मिळाल्यास देशातील कार, स्कूटर आणि मोटारसायकलींच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. 
पी. चिदंबरम यांनी फेब्रुवारीमध्ये संपुआ सरकारचे अंतरिम बजेट संसदेत मांडले होते. संपुआ सरकारचे हे अखेरचे बजेट ठरले. वाहन उद्योगाला सवलत देताना चिदंबरम यांनी छोटय़ा कार, स्कूटर, मोटारसायकली आणि व्यावसायिक वाहनांवरील उत्पादन शुल्क 12 टक्क्यांवरून 8 टक्के केले होते. एसयूव्ही कारवरील उत्पादन शुल्क 30 टक्क्यांवरून 24 टक्के, मध्यम आकाराच्या कारवरील उत्पादन शुल्क 24 टक्क्यांवरून 20 टक्के आणि मोठय़ा कारवरील उत्पादन शुल्क 27 टक्क्यांवरून 24 टक्के केले होते. ही सवलत 30 जूनर्पयत देण्यात आली होती. मुख्य अर्थसंकल्पात त्यावर अंतिम निर्णय व्हावा, या अपेक्षेने ही मुदत ठेवण्यात आली होती. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचा अर्थसंकल्प 10 जुलै रोजी सादर होणार आहे. 1 जुलै ते 10 जुलै या काळात उत्पादन शुल्क सवलतीचे काय करायचे, याबाबत अद्याप कोणत्याही सूचना सरकारने केलेल्या नाहीत. ही सवलत बहुधा रद्द होईल, असे संकेत आहेत. 
दुस:या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी असलेल्या हुंदाईने किंमत वाढीचे संकेतही दिले आहेत. हुंदाईच्या प्रवक्त्याने म्हटले की, उत्पादन शुल्क सवलत रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतलाच, तर त्याचे आम्ही पालन करू. मात्र, वाढीव शुल्काचा भार ग्राहकांवर टाकावा लागेल. त्यामुळे किमती वाढतील. 
जनरल मोटर्स इंडियाचे उपाध्यक्ष पी. बालेंद्रन यांनी सांगितले की, मागच्या सरकारने सवलत दिल्यानंतरही वाहन उद्योगावरील संकट टळलेले नाही. नव्या सरकारने ही सवलत पुढे सुरू ठेवावी, अशी उद्योगाची अपेक्षा आहे. टाटा मोटर्सच्या प्रवक्त्याने म्हटले की, उत्पादन शुल्कातील कपातीने वाहन उद्योगाला मदत झाली आहे. नव्या अर्थसंकल्पाची आता आम्हाला प्रतीक्षा आहे. होंडा, निसान या कंपन्यांनी ‘थांबा आणि वाट पाहा’ अशी प्रतिक्रिया यावर दिली आहे. मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा यांसह प्रमुख 7 कार उत्पादक कंपन्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 
भारतातील वाहन उद्योग दीर्घ काळापासून मंदीच्या सावटाखाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4वाहन उत्पादकांची संघटना सियामने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बहुतांश कार उत्पादकांनी करातील ही सवलत ग्राहकांर्पयत पोहोचवली होती. त्यामुळे वाहनांच्या किमती उतरल्या होत्या. 
 
4आता ही सवलत सरकारने काढून घेतल्यास कंपन्या किमती वाढवून पूर्ववत करतील. ही सवलत वाढून मिळावी, यासाठी संघटना योग्य त्या पातळीवर चर्चा करीत आहे.