शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मच्छीमारांनी न्याय मिळेपर्यंत लढ्यास तयार राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 02:40 IST

हर्णे बंदरातील मच्छीमार बांधव ज्याप्रमाणे नौका घेऊन समुद्रात गेले आणि त्यांनी एलईडी लाइट(एलईडी विद्युत प्रणाली)ने मच्छीमारी करणारी बोट पकडली त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा आपली लढाई आपल्यालाच लढून जिंकायची आहे

बोर्ली मांडला : हर्णे बंदरातील मच्छीमार बांधव ज्याप्रमाणे नौका घेऊन समुद्रात गेले आणि त्यांनी एलईडी लाइट(एलईडी विद्युत प्रणाली)ने मच्छीमारी करणारी बोट पकडली त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा आपली लढाई आपल्यालाच लढून जिंकायची आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मच्छीमार खलाशी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ म्हात्रे यांनी मुरुड तालुक्यातील नांदगाव कोळीवाडा येथे आयोजित एलईडी लाइट मच्छीमारी समस्येबाबत आयोजित सभेत केले.मच्छीमार बांधवांना सध्याच्या परिस्थितीत भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आहे ती एलईडी लाइट मच्छीमारी. मच्छीमार बांधवांनी संघर्ष केला मात्र त्याची दखल ही लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी यांनी आजपर्यंत घेतली नाही.फक्त आश्वासनाशिवाय काहीही दिले नाही.त्यामुळे आता कोणाच्याही पाठीशी न जाता आपण आपली लढाई लढण्यासाठी सज्ज होणे आवश्यक आहे. मस्यव्यवसाय विभागाचे जाधव नावाचे जॉइंट कमिशनर हे एलईडी लाइट मच्छीमारी आणि पर्सनेटने मच्छीमारी करणाऱ्या धनदांडग्यांना पाठीशी घालत आहे. समुद्रात बेकायदेशीररीत्या मच्छीमारी करीत असणारी बोट पकडून किंवा पकडली गेल्यास त्या बोटीकडून पाच पट दंड आकारला जातो. मात्र आतापर्यंत १३८ बोटी पकडल्या त्याचे काय झाले?असाही सवाल त्यांनी केला. लाकडी नौकांना पर्सनेटने मच्छीमारी करण्याची परवानगी आहे. मात्र फायबर बोटींना नाही. आता तर ९0 टक्के मच्छीमार हे फायबरची बोट वापरत असून त्यावर पर्सनेट वापरत आहेत. रामदास कदम हे मच्छीमार संघाच्या पाठीशी ठामपणे आहेत. मस्यव्यवसाय मंत्री हे कोकणातील नसल्याने त्यांना मच्छीमार बांधवांना उद्भवणारे प्रश्न काय समजणार? आता प्रत्येक गावातील वीस पंचवीस नौकांनी समुद्रात जाऊन एलईडी लाइटने मच्छीमारी करीत असलेली बोट पकडायची आणि त्यावरील खलाशी यांना आपल्या बोटीत घेऊन त्या बोटीवर असणारे एलईडी लाइट, जनरेटर आदी साहित्य समुद्रात नष्ट करायचे, असे विश्वनाथ म्हात्रे यांनी उपस्थित मच्छीमार बांधवांना सांगितले.>अधिवेशनात मच्छीमारांच्या बाजूने आवाज उठवामच्छीमार हा गेली अनेक वर्षे पिढ्यानपिढ्या समुद्रात मच्छीमारी करून उपजीविका करीत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून एलईडी लाइटने मासेमारी राजरोसपणे सुरू आहेत. या संदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा विधानपरिषद आमदार जयंत पाटील यांना गेल्या अधिवेशनापूर्वी भेटून एलईडी लाइटने मासेमारी राजरोसपणे सुरू आहे त्यावर अधिवेशनात मच्छीमारांच्या बाजूने आवाज उठवा अशी विनंती केली.मात्र जयंत पाटील यांनी मच्छीमार बांधवांचा आवाज काही अधिवेशनात उचलला नाही. त्याचप्रमाणे अधिकारीही लक्ष देत नाही. हे सर्व पैसेवाल्यांना पाठीशी घालत आहेत, असे रायगड जिल्हा कोळी समाज संघाचे अध्यक्ष धर्मा घाबरट यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर मनोहर बैले, मोतीराम पाटील, गोरखनाथ नवरीकर, ताराचंद कोंडे, महेंद्र गारडी, लहू रावजी आदी मान्यवर उपस्थित होते.