शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

मंडणगडात कोविड रुग्णालयाचा दर्जा केवळ कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST

मंडणगड : रुग्णशय्येवरील मंडणगड तालुक्यातील आरोग्य व्यवस्था केवळ कागदावरील दर्जा बदलल्याने काेराेनाला सामोरे जाण्यास समर्थ नसल्याची गंभीर बाब पुढे ...

मंडणगड : रुग्णशय्येवरील मंडणगड तालुक्यातील आरोग्य व्यवस्था केवळ कागदावरील दर्जा बदलल्याने काेराेनाला सामोरे जाण्यास समर्थ नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. एप्रिल महिन्यात भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालयात इतर अन्य आजारांवर उपचार बंद करून केवळ कोविड रुग्णालय असा दर्जा देऊन उपचार सुरू करण्यात आले. मात्र, हा दर्जा केवळ कागदावरच राहिला असून, रुग्णांचे आजार कमी करण्यापेक्षा, त्यांना मृत्यूच्या वाटेवर नेणारे ठरत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यातील ग्रामीण भागात गावोगावी कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे़. त्यामुळे स्थानिक पातळीवर उपचाराची सुरू करण्यात आलेली ही अर्धीमुर्धी सोय पूर्णत्वाकडे नेण्याची आवश्यकता आहे. मानवी फुफ्फुसात कोविडचे किती संक्रमण झाले आहे, यावर उपचार ठरत असले तरी, यासाठी आवश्यक सिटी स्कॅन मशीन येथे उपलब्ध नाही़. याशिवाय कोरोनामुळे श्वसनक्रियेवर सर्वाधिक आघात होत असल्याने आवश्यक असणारा एकही व्हेंटिलेटर रुग्णालयात उपलब्ध नाही. तसेच १० पल्स ऑक्सिमीटर, ५ थर्मल गन, १० बीटल साईन मॉनिटर, १० जम्बो रेग्युलेटरसहित सिलिंडर, ५ ग्लोकोमीटर, १० फेसशिल्ड, २ हॉस्पिटल फावलर्स बेड, सर्जिकल ग्लोज, एन ९५ मास्क, एनआरबीएम मास्क व सॅनिटायझेशन पंपाची अग्रक्रमाने आवश्यकता आहे़. याशिवाय सर्व उपचारांकरिता गरजेचे असलेले फिजिशियन रुग्णालयात पूर्ण वेळ उपलब्ध असण्याची आवश्यकता आहे.

तालुक्यात आवश्यक बाबींची पूर्तता न करता सुरू केलेले काेविड रुग्णालय निरुपयाेगी ठरत आहे़. तालुक्यात वृद्ध नागरिक व विविध आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याचे काही दिवसांपासून आढळत आहे़. यासाठी आवश्यक सीटी स्कॅनसाठी दापोली, महाड, माणगाव ही शहरे गाठावी लागतात. फुफ्फुसांवर कोरोनाचे संक्रमण झाल्याचे दिसून आल्यास चांगले उपचार हाेणे गरजेचे आहे़. मात्र, येथे आवश्यक साधनसामग्री नसल्याने होणारे उपचार तोकडे पडत आहेत. सध्या ग्रामीण रुग्णालयात १० ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात आले असले तरी, तालुक्याची एकंदरीत परिस्थिती पाहता, ही संख्या वाढविण्याची गरज आहे. तसेच अत्यावश्यक बनलेल्या व्हेंटिलेटर व सिटी स्कॅन चाचण्या तालुक्यातच उपलब्ध करणे अनिवार्य केले आहे. अशी सामग्री उपलब्ध नसल्याने काही प्रसंगी आजारी व्यक्तींच्या जिवावर बेतत आहे. ग्रामीण भागात कम्युनिटी स्प्रेड होत असल्याचे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णसंख्येवरून स्पष्ट होत आहे.