शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:21 IST

देवरुख : शहरातील खालची आळी येथील पारंपरिक पावसाचे पाणी वाहून जाणारी सारण येथे मारुती राऊत यांनी पक्के बांधकाम ...

देवरुख : शहरातील खालची आळी येथील पारंपरिक पावसाचे पाणी वाहून जाणारी सारण येथे मारुती राऊत यांनी पक्के बांधकाम करून बंद केली आहे. यामुळे परिसरातील वाहून येणारे पाणी अडू लागले आहे. या दुर्गंधीयुक्त साठलेल्या पाण्याने रोगराई पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. ही बंद केलेली सारण मोकळी करून मिळण्यासाठी स्थानिक नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन दिले.

एनडीआरएफच्या तुकड्या सज्ज

रत्नागिरी : पाच तालुक्यांमध्ये जीवरक्षक ५ बोटी आणि एनडीआरएफच्या दोन तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी आवश्यक ते सर्व साहित्यही तैनात करण्यात आले आहे. जिल्ह्यात सुमारे ४५ गावांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग, घाटरस्ते तसेच जिल्हा परिषदेच्या रस्त्यावरही दरडी कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

म्युकरमायकोसिसची जिल्ह्यात भीती

रत्नागिरी : जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या ३ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. एकाचा मृत्यू रत्नागिरीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात तर दोघांचा मृत्यू मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान झाला. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे एकूण ८ रुग्ण आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यात म्युकरमायकोसिसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रिक्षात अचानक नागोबा दिसल्याने धावपळ

रत्नागिरी : बावनदी येथून रिक्षातून प्रवासी रत्नागिरीकडे निघाले होते. त्यावेळी रिक्षात मागील बाजूस नाग असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आल्याने त्यांची धावपळ उडाली होती. प्रवाशांनी तत्काळ ही बाब रिक्षाचालकाच्या लक्षात आणून दिली. प्रसंगावधान राखून रिक्षाचालकाने निवळी फाट्याजवळ रिक्षा थांबवली. तेथे सर्पमित्र राकेश पाटील यांनी नागाला सुखरूपरीत्या पकडले.

आराेग्य सुविधा प्रदान

हातखंबा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात आणि माभळे, कुरधुंडा, ओझरखोल, कोळंबे, आंबेड आदी गावांतील रुग्णांना रुग्णवाहिका तसेच आरोग्यविषयक सुविधा मिळाव्यात, यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे ग्रामस्थांनी मागणी केली होती. ती मागणी अखेर सामंत यांनी पूर्ण केली.

मत्स्यगंधा एक्स्प्रेस १५ जूनपासून धावणार

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस येत्या १५ जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे. कोरोनाच्या काळात अनेक रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते मंगलोर सेंट्रल या मार्गावर धावणाऱ्या या गाडीचा समावेश होता. कोरोनाच्या काळात ही गाडी सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल या नावाने धावत आहे.

अवैध वाळू उत्खनन

खेड : पर्यावरणाच्या कारणास्तव तालुक्यात उत्खननाला बंदी असतानाही तालुक्यातील आंबवली, सुकीवली परिसरात जगबुडी नदीपात्रातून शेकडो ब्रास वाळूचे उत्खनन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अनधिकृतपणे वाळू उत्खनन करणाऱ्यांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून महसूल विभागाच्या ताब्यात दिले असतानाही कारवाई करण्यात आलेली नाही.