शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रदेशाध्यक्षांचा आज बूथ समित्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:38 IST

रत्नागिरी : केंद्रातील भाजप सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि लोकसभा, विधानसभा निवडणुकीची स्वबळावर तयारी करण्याकरिता भाजपने समर्थ बूथ अभियान ...

रत्नागिरी : केंद्रातील भाजप सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि लोकसभा, विधानसभा निवडणुकीची स्वबळावर तयारी करण्याकरिता भाजपने समर्थ बूथ अभियान सुरू केले. रत्नागिरी जिल्ह्यात ८५३ पैकी ६८८ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९१६ पैकी ९१२ बूथप्रमुख व समित्या नेमण्यात आल्या आहेत. या सर्व सदस्यांशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मंगळवारी ऑडिओ ब्रीजच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत, अशी माहिती समर्थ बूथ अभियानचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा समन्वयक अतुल काळसेकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजपच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत काळसेकर म्हणाले की, आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या महाराष्ट्रातील सर्व जागा स्वबळावर लढवून जिंकण्यासाठी भाजपाने समर्थ बूथ अभियान सुरू केले आहे. ६ जुलै रोजी जनसंघाचे पहिले अध्यक्ष स्व. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्मदिवसापासून हे अभियान सुरू झाले. १७ सप्टेंबर ला पंतप्रधान मोदी यांचा जन्मदिवशी त्याची सांगता होणार आहे. या अभियान समाप्ती दिवशी पंतप्रधान मोदी राज्यातील सुमारे ९३ हजार बूथ अध्यक्षांशी थेट संवाद साधणार आहेत.

बूथ समित्यांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे आणि केंद्र सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत घेअन जाणे हा मुख्य उद्देश असल्याचे ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.

यावेळी भाजपचे रत्नागिरी शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे आणि महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार उपस्थित आदी होते.