शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

राजकीय हस्तक्षेपाची साथ

By admin | Updated: September 8, 2015 22:12 IST

रत्नागिरी पालिका : दैनंदिन कामकाज ठप्प होण्याचे प्रकार

रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या कामात गेल्या काही काळापासून राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे कर्मचारी बेजार झाले आहेत. कामाच्या वेळेत काही पदाधिकाऱ्यांचा सततचा हस्तक्षेप, विविध कामांसाठी सातत्याने वेठीस धरण्याच्या प्रकारामुळे दैनंदिन कामकाज ठप्प होत आहे. त्यामुळेच दैनंदिन काम पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना ७ वाजेपर्यंत कार्यालयात थांबणे भाग पडत आहे. याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. प्रत्येक प्रभागाचे नगरसेवक हे त्यांच्या प्रभागातील विकासकामांसाठीच मतदारांनी निवडून दिलेले आहेत. त्यामुळे हे नगरसेवक त्यांच्या प्रभागातील विकासकामांचा पाठपुरावा करीत असतात. त्यात काहीही गैर नाही. परंतु त्यातील काहीजण हे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामांसाठी सातत्याने वेठीस धरतात. त्यांच्याकडून ठराविक कामेच करून घेण्यासाठी राजकीय दबाव टाकला जातो. विशेष करून नियमबाह्य कामांसाठीही त्यांना वेठीस धरले जात असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.दिवसभर अन्य कामात जुंपल्याने दैनंदिन कामकाज करणे अनेक कर्मचाऱ्यांना कठीण होत आहे. परिणामी ६ वाजेपर्यंत कामकाजाची वेळ असतानाही अनेक कर्मचाऱ्यांना त्यांचे कागदोपत्री काम पूर्ण करण्यासाठी सायंकाळी ७ वाजेपर्यंत थांबून काम पूर्ण करणे भाग पडत आहे.विकासाच्या कामांसाठी नगरसेवकांनी पालिकेत येणे, अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेटणे, त्यांच्याकडे विविध कामांसाठी पाठपुरावा करणे या गोष्टी कर्मचारी कधीही अमान्य करीत नाहीत. तो कामाचाच भाग आहे. परंतु हा पाठपुरावा जेव्हा काही नगरसेवक दिवसभर करतात, त्यावेळी मात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या हातातील दैनंदिन काम करणे अशक्य होते. तसेच काहीवेळा ठाण मांडून बसण्याच्या प्रकारामुळे काही प्रकरणे तपासून ती कागदपत्र मार्गी लावणे शक्य होत नाही. अशी कागदपत्र तपासण्याचा प्रयत्न केल्यास त्यात हस्तक्षेप केला जातो. त्याचा नाहक त्रास कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. अर्थातच काहीजणांच्या या दिवसभर ठाण मांडण्याच्या प्रकारांमुळे अन्य नगरसेवकही त्यात नाहक भरडले जात आहेत. (प्रतिनिधी)नगरसेवकांमध्येही अस्वस्थतापदाधिकाऱ्यांनी करावे कामाचे नियोजनशहर विकासासाठी सर्वच प्रभाग हे महत्त्वाचे असून, समतोल विकास होणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी सामान्यत: दुपारच्या वेळेपर्र्यंत त्यांच्या प्रभागांबाबतची संबंधित कामे पूर्ण होतील, असे नियोजन केल्यास दुपारनंतरच्या वेळेत कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज पूर्ण करणे शक्य होईल व सायंकाळी उशिरापर्यंत थांबण्याचे दुष्टचक्र संपेल, अशीही चर्चा आहे.अन्य नगरसेवकही त्रस्तकाही नगरसेवक हे आक्रमक भूमिका घेत आपल्याच प्रभागात कामगारांनी काम करण्याचा हट्ट धरतात. त्यामुळे अन्य प्रभागातील कामावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. काही ठराविकच भागातील कामांसाठी पालिका आहे काय, असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे, तर सफाई, कचरा, गवत काढणी यांसारखी कामे वेळेत न होणाऱ्या प्रभागातील नगरसेवकांना तेथील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. कामचुुकारांनाही हवी शिस्त...पालिकेतील काही विभागातील कर्मचारी हे कामचुकारपणा करण्यातही माहीर असल्याचे दिसून येत आहे. कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेत बसवण्यात आलेल्या सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यांमुळे अनेकांचा कामचुकारपणाही प्रशासनाच्या लक्षात आला आहे. त्यामुळेच अशा काही कर्मचाऱ्यांना अन्य विभागात हलवण्यात आले आहे. हेतूबाबत संशय नको...पालिकेतील काही महत्त्वाच्या विभागात कामाच्या फाईल्स तशाच पडून असतात. काही महत्त्वाच्या फाईल्स गहाळ होण्याचे प्रकारही घडतात, तर काही कागदपत्रांची पूर्तता होण्यात विलंब होतो. त्यामुळे संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या हेतूबाबत संशयही निर्माण होत असून, कोणतेही कागदपत्रविषयक काम किती दिवसांनी होणार, याची नागरिकांना स्पष्ट कल्पना देणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांना पालिकेचे उंबरठे सतत झिजवावे लागणार नाहीत, याचीही दक्षता घेतली जावी, अशी नागरिकांची मागणी आहे.