शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

राजकीय हस्तक्षेपाची साथ

By admin | Updated: September 8, 2015 22:12 IST

रत्नागिरी पालिका : दैनंदिन कामकाज ठप्प होण्याचे प्रकार

रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या कामात गेल्या काही काळापासून राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे कर्मचारी बेजार झाले आहेत. कामाच्या वेळेत काही पदाधिकाऱ्यांचा सततचा हस्तक्षेप, विविध कामांसाठी सातत्याने वेठीस धरण्याच्या प्रकारामुळे दैनंदिन कामकाज ठप्प होत आहे. त्यामुळेच दैनंदिन काम पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना ७ वाजेपर्यंत कार्यालयात थांबणे भाग पडत आहे. याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. प्रत्येक प्रभागाचे नगरसेवक हे त्यांच्या प्रभागातील विकासकामांसाठीच मतदारांनी निवडून दिलेले आहेत. त्यामुळे हे नगरसेवक त्यांच्या प्रभागातील विकासकामांचा पाठपुरावा करीत असतात. त्यात काहीही गैर नाही. परंतु त्यातील काहीजण हे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामांसाठी सातत्याने वेठीस धरतात. त्यांच्याकडून ठराविक कामेच करून घेण्यासाठी राजकीय दबाव टाकला जातो. विशेष करून नियमबाह्य कामांसाठीही त्यांना वेठीस धरले जात असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.दिवसभर अन्य कामात जुंपल्याने दैनंदिन कामकाज करणे अनेक कर्मचाऱ्यांना कठीण होत आहे. परिणामी ६ वाजेपर्यंत कामकाजाची वेळ असतानाही अनेक कर्मचाऱ्यांना त्यांचे कागदोपत्री काम पूर्ण करण्यासाठी सायंकाळी ७ वाजेपर्यंत थांबून काम पूर्ण करणे भाग पडत आहे.विकासाच्या कामांसाठी नगरसेवकांनी पालिकेत येणे, अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेटणे, त्यांच्याकडे विविध कामांसाठी पाठपुरावा करणे या गोष्टी कर्मचारी कधीही अमान्य करीत नाहीत. तो कामाचाच भाग आहे. परंतु हा पाठपुरावा जेव्हा काही नगरसेवक दिवसभर करतात, त्यावेळी मात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या हातातील दैनंदिन काम करणे अशक्य होते. तसेच काहीवेळा ठाण मांडून बसण्याच्या प्रकारामुळे काही प्रकरणे तपासून ती कागदपत्र मार्गी लावणे शक्य होत नाही. अशी कागदपत्र तपासण्याचा प्रयत्न केल्यास त्यात हस्तक्षेप केला जातो. त्याचा नाहक त्रास कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. अर्थातच काहीजणांच्या या दिवसभर ठाण मांडण्याच्या प्रकारांमुळे अन्य नगरसेवकही त्यात नाहक भरडले जात आहेत. (प्रतिनिधी)नगरसेवकांमध्येही अस्वस्थतापदाधिकाऱ्यांनी करावे कामाचे नियोजनशहर विकासासाठी सर्वच प्रभाग हे महत्त्वाचे असून, समतोल विकास होणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी सामान्यत: दुपारच्या वेळेपर्र्यंत त्यांच्या प्रभागांबाबतची संबंधित कामे पूर्ण होतील, असे नियोजन केल्यास दुपारनंतरच्या वेळेत कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज पूर्ण करणे शक्य होईल व सायंकाळी उशिरापर्यंत थांबण्याचे दुष्टचक्र संपेल, अशीही चर्चा आहे.अन्य नगरसेवकही त्रस्तकाही नगरसेवक हे आक्रमक भूमिका घेत आपल्याच प्रभागात कामगारांनी काम करण्याचा हट्ट धरतात. त्यामुळे अन्य प्रभागातील कामावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. काही ठराविकच भागातील कामांसाठी पालिका आहे काय, असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे, तर सफाई, कचरा, गवत काढणी यांसारखी कामे वेळेत न होणाऱ्या प्रभागातील नगरसेवकांना तेथील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. कामचुुकारांनाही हवी शिस्त...पालिकेतील काही विभागातील कर्मचारी हे कामचुकारपणा करण्यातही माहीर असल्याचे दिसून येत आहे. कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेत बसवण्यात आलेल्या सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यांमुळे अनेकांचा कामचुकारपणाही प्रशासनाच्या लक्षात आला आहे. त्यामुळेच अशा काही कर्मचाऱ्यांना अन्य विभागात हलवण्यात आले आहे. हेतूबाबत संशय नको...पालिकेतील काही महत्त्वाच्या विभागात कामाच्या फाईल्स तशाच पडून असतात. काही महत्त्वाच्या फाईल्स गहाळ होण्याचे प्रकारही घडतात, तर काही कागदपत्रांची पूर्तता होण्यात विलंब होतो. त्यामुळे संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या हेतूबाबत संशयही निर्माण होत असून, कोणतेही कागदपत्रविषयक काम किती दिवसांनी होणार, याची नागरिकांना स्पष्ट कल्पना देणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांना पालिकेचे उंबरठे सतत झिजवावे लागणार नाहीत, याचीही दक्षता घेतली जावी, अशी नागरिकांची मागणी आहे.