शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

राज्यातील शाळा व महाविद्यालये त्वरित सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:37 IST

रत्नागिरी : राज्यातील शाळा व महाविद्यालये त्वरीत सुरू कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) या अराजकीय विद्यार्थी संघटनेच्या ...

रत्नागिरी : राज्यातील शाळा व महाविद्यालये त्वरीत सुरू कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) या अराजकीय विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती मासुचे कोकण विभागप्रमुख, ॲड.गौरव शेलार यांनी दिली.

विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ओव्यांमधील ‘शुद्राचा‘ अर्थ महाराष्ट्रातील आजचे तरुण म्हणून घेत आहोत. कारण अविद्या काय करू शकते, हे इतिहासाने सिद्ध केलेले आहे आणि त्यासाठी छत्रपती, फुले, शाहू आंबेडकर या महापुरुषांचा लढा किती उपयुक्त होता, हे संबंध देशाने अनुभवलेले आहे. आपणाला प्रबोधनकार यांचा वैचारिक वारसा लाभलेला आहे, त्यामुळे प्रत्यक्षात शिक्षणाचे महत्त्व आपण जाणून आहात. आता आपण हळूहळू निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यासाठीही संबंधित मंत्रालयाला याबद्दल नियोजन करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात प्रत्यक्षात शिक्षण सुरू होणे निकडीचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी गेल्या दोन वर्षांपासून शिक्षणापासून वंचित आहेत, ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्क, विद्युत अडचणी, तसेच आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अत्याधुनिक मोबाइल नसणे, अशा अनेक समस्यांमुळे ग्रामीण, तसेच शहरी भागातीलही विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. जर शिक्षण व्यवस्था अशीच बंद राहिली, तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागेल, असे नमूद करण्यात आले आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या घटल्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये जवळपास दीड वर्षानी शाळा उघडणार आहेत. गुजरातपाठोपाठ दिल्ली व पुदुच्चेरी सरकारने शाळा १ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून महाराष्ट्र शासनानेही लवकरात लवकर यावर उपाय काढून शाळा व महाविद्यालय त्वरित सुुरू करावीत, अशी मागणी यात करण्यात आली आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये एका वर्गात १०० टक्के मुले हजर असतील, तर सकाळ सत्रामध्ये ५० टक्के विद्यार्थ्यांना बोलावून दुपारच्या सत्रात निम्म्या विद्यार्थ्यांना बोलविता येईल. शाळा आणि महाविद्यालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेला सुरुवात करावी, जेणेकरून हळूहळू लसीकरणाचा टप्पा गाठून शाळा व महाविद्यालये १ डिसेंबरपासून पूर्ण क्षमतेने सुरू होतील, असेही यात उपाय सुचविण्यात आले आहेत.