शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शाळा व महाविद्यालये त्वरित सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:37 IST

रत्नागिरी : राज्यातील शाळा व महाविद्यालये त्वरीत सुरू कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) या अराजकीय विद्यार्थी संघटनेच्या ...

रत्नागिरी : राज्यातील शाळा व महाविद्यालये त्वरीत सुरू कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) या अराजकीय विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती मासुचे कोकण विभागप्रमुख, ॲड.गौरव शेलार यांनी दिली.

विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ओव्यांमधील ‘शुद्राचा‘ अर्थ महाराष्ट्रातील आजचे तरुण म्हणून घेत आहोत. कारण अविद्या काय करू शकते, हे इतिहासाने सिद्ध केलेले आहे आणि त्यासाठी छत्रपती, फुले, शाहू आंबेडकर या महापुरुषांचा लढा किती उपयुक्त होता, हे संबंध देशाने अनुभवलेले आहे. आपणाला प्रबोधनकार यांचा वैचारिक वारसा लाभलेला आहे, त्यामुळे प्रत्यक्षात शिक्षणाचे महत्त्व आपण जाणून आहात. आता आपण हळूहळू निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यासाठीही संबंधित मंत्रालयाला याबद्दल नियोजन करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात प्रत्यक्षात शिक्षण सुरू होणे निकडीचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी गेल्या दोन वर्षांपासून शिक्षणापासून वंचित आहेत, ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्क, विद्युत अडचणी, तसेच आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अत्याधुनिक मोबाइल नसणे, अशा अनेक समस्यांमुळे ग्रामीण, तसेच शहरी भागातीलही विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. जर शिक्षण व्यवस्था अशीच बंद राहिली, तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागेल, असे नमूद करण्यात आले आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या घटल्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये जवळपास दीड वर्षानी शाळा उघडणार आहेत. गुजरातपाठोपाठ दिल्ली व पुदुच्चेरी सरकारने शाळा १ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून महाराष्ट्र शासनानेही लवकरात लवकर यावर उपाय काढून शाळा व महाविद्यालय त्वरित सुुरू करावीत, अशी मागणी यात करण्यात आली आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये एका वर्गात १०० टक्के मुले हजर असतील, तर सकाळ सत्रामध्ये ५० टक्के विद्यार्थ्यांना बोलावून दुपारच्या सत्रात निम्म्या विद्यार्थ्यांना बोलविता येईल. शाळा आणि महाविद्यालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेला सुरुवात करावी, जेणेकरून हळूहळू लसीकरणाचा टप्पा गाठून शाळा व महाविद्यालये १ डिसेंबरपासून पूर्ण क्षमतेने सुरू होतील, असेही यात उपाय सुचविण्यात आले आहेत.