शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

साहित्याचा प्रश्न तारांकित मांडावा

By admin | Updated: March 9, 2015 23:55 IST

बच्चू कडू : अपंग व्यक्ती दुर्लक्षित का राहते, याचा विचार हवा

रत्नागिरी : शासनाकडून अपंगांसाठी असलेल्या ३ टक्के निधीतून अपंगांना कोणते साहित्य दिले जाते, असा तारांकित प्रश्न अधिवेशनात उपस्थित व्हायला हवा, अशी मागणी आज (सोमवारी) झालेल्या अपंगांच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात करण्यात आली.प्रहार अपंग क्रांती आंदोलन व संलग्न रत्नागिरी जिल्हा अपंग सहाय व पुनर्वसन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अपंगांच्या मागण्यांसाठी जिल्हा परिषदेनजीकच्या मराठा मंडळ सभागृहात अपंगांचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे संस्थापक, अचलपूर विधानसभेचे आमदार ओमप्रकाश तथा बच्चू कडू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी आंदोलनाचे पदाधिकारी रामदास माचे, धमेंद्र सातव (पुणे), सुरेखा सूर्यवंशी, रत्नागिरी जिल्हा अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष विजय कदम, एस. जिल्हा परिषद अपंग सहायता केंद्राचे एस. एस. कांबळे, कनिष्ठ सहायक स्नेहल पाटील, आस्था फाऊंडेशनच्या सुरेखा पाथरे-जोशी, प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष श्रद्धा आंबेरकर आदी उपस्थित होते.बच्चू कडू यांनी अपंग व्यक्ती दुर्लक्षित का राहाते, याचा विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले. शासनाने अपंगांबाबतचा उदासीन दृष्टीकोन झटकावा आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, असे यावेळी सांगितले.बच्चू कडू हे गली सात आठ वर्षे अपंगांसाठी तळमळीने काम करीत असल्याबद्दल विजय कदम यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आता अपंगांच्या समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. अपंगांना साहित्य दिले जाते. मात्र, ते साहित्य देताना त्याला त्याचा उपयोग होईल का, याचा विचार करून दिले जात नाही. अपंगानां साहित्य देताना तेथील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून दिले जावे, असा मुद्दा सुरेखा पाथरे यांनी मांडला. (प्रतिनिधी)