शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

साहित्याचा प्रश्न तारांकित मांडावा

By admin | Updated: March 9, 2015 23:55 IST

बच्चू कडू : अपंग व्यक्ती दुर्लक्षित का राहते, याचा विचार हवा

रत्नागिरी : शासनाकडून अपंगांसाठी असलेल्या ३ टक्के निधीतून अपंगांना कोणते साहित्य दिले जाते, असा तारांकित प्रश्न अधिवेशनात उपस्थित व्हायला हवा, अशी मागणी आज (सोमवारी) झालेल्या अपंगांच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात करण्यात आली.प्रहार अपंग क्रांती आंदोलन व संलग्न रत्नागिरी जिल्हा अपंग सहाय व पुनर्वसन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अपंगांच्या मागण्यांसाठी जिल्हा परिषदेनजीकच्या मराठा मंडळ सभागृहात अपंगांचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे संस्थापक, अचलपूर विधानसभेचे आमदार ओमप्रकाश तथा बच्चू कडू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी आंदोलनाचे पदाधिकारी रामदास माचे, धमेंद्र सातव (पुणे), सुरेखा सूर्यवंशी, रत्नागिरी जिल्हा अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष विजय कदम, एस. जिल्हा परिषद अपंग सहायता केंद्राचे एस. एस. कांबळे, कनिष्ठ सहायक स्नेहल पाटील, आस्था फाऊंडेशनच्या सुरेखा पाथरे-जोशी, प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष श्रद्धा आंबेरकर आदी उपस्थित होते.बच्चू कडू यांनी अपंग व्यक्ती दुर्लक्षित का राहाते, याचा विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले. शासनाने अपंगांबाबतचा उदासीन दृष्टीकोन झटकावा आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, असे यावेळी सांगितले.बच्चू कडू हे गली सात आठ वर्षे अपंगांसाठी तळमळीने काम करीत असल्याबद्दल विजय कदम यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आता अपंगांच्या समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. अपंगांना साहित्य दिले जाते. मात्र, ते साहित्य देताना त्याला त्याचा उपयोग होईल का, याचा विचार करून दिले जात नाही. अपंगानां साहित्य देताना तेथील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून दिले जावे, असा मुद्दा सुरेखा पाथरे यांनी मांडला. (प्रतिनिधी)