शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

एस.टी. खड्ड्यात, विभागातील पाचशे फेऱ्या अद्याप बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:38 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : अनलाॅकनंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील एस.टी. सेवा पूर्ववत होत आहे. शाळा-महाविद्यालये बंद असल्याने शालेय ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : अनलाॅकनंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील एस.टी. सेवा पूर्ववत होत आहे. शाळा-महाविद्यालये बंद असल्याने शालेय फेऱ्या अद्याप बंद आहेत. कमी भारमानामुळे जिल्ह्यातील पाचशे फेऱ्या बंद आहेत. त्यामध्ये खराब रस्त्यामुळे २८ बंद फेऱ्यांचा समावेश आहे.

रत्नागिरी विभागात सध्या ६१४ गाड्यांद्वारे ३२०० फेऱ्या सुरू आहेत. शाळा-महाविद्यालये बंद असून काही भागातून अत्यल्प भारमान लाभत असल्याने पाचशे फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने रत्नागिरी-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा आंबा घाट मोठ्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात आल्याने या मार्गावरील एस.टी. वाहतूक बंद आहे. चिपळुणातील काही फेऱ्या बंद आहेत.

कोल्हापूर मार्गात बदल

रत्नागिरी-कोल्हापूर-सांगली जिल्ह्याला जोडणारा आंबा घाट दरडी कोसळल्याने धोकादायक झाल्याने हा मार्ग मोठ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर दैनंदिन ३२ फेऱ्या सुरू होत्या; परंतु हा मार्ग धोकादायक झाल्याने अणुस्कुरामार्गे सध्या आठ फेऱ्या सुरू आहेत. अतिवृष्टीमुळे चिपळुणातील खराब रस्त्यामुळे चार फेऱ्या बंद आहेत.

एसटी खर्च वाढला

n कोल्हापूर मार्गावरील वाहतूक अणुस्कुरामार्गे वळविण्यात आली असल्याने अंतर वाढते. पर्यायाने इंधन खर्चात वाढ झाली आहे.

n काही गावातील रस्ते निकृष्ट, साइडपट्टी खराब झाल्याने अपघाताची संख्याही वाढली आहे.

n खराब रस्त्यामुळे टायर पंक्चर होणे, पाटा तुटणे, गिअर बाॅक्स निकामी होण्याचे प्रकार वाढल्याने खर्चात भर पडत आहे.

नऊ आगारांतील फेऱ्या बंद

शाळा-महाविद्यालयांचे ऑनलाइन अध्यापन सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नऊ आगारांतील शालेय फेऱ्या बंदच ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय अत्यल्प भारमान असलेल्या फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. जिल्ह्यातील नऊ आगारांतील मिळून एकूण पाचशे फेऱ्या बंद आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार भारमान पाहून फेऱ्या सुरू करण्यात येत आहेत.

भारमानाचा अंदाज घेत एस.टी.च्या फेऱ्या वाढविण्यात येत आहेत. सध्या पाचशे फेऱ्या बंद असल्या तरी प्रवाशांच्या मागणीनुसार फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. बंदमध्ये रात्रवस्तीच्या गाड्यांचा समावेश आहे. कोल्हापूर मार्गावरील वाहतूक अणुस्कुरामार्गे वळविण्यात आली आहे. मात्र, अंतरातील व तिकीटदरातील वाढीमुळे प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे. भारमान पाहून फेऱ्या सुरू करण्यात येतील.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक

n शहरी मार्गावर १२५ फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

n विभागातील रात्रवस्तीच्या शंभर फेऱ्या बंद आहेत.

n कोल्हापूर मार्गावरील २४ फेऱ्या अद्याप बंदच आहेत.

जिल्ह्यातील आगार आणि सुरू बस संख्या

मंडणगड ३६

दापोली ६९

खेड ६८

चिपळूण ९९

गुहागर ६७

देवरूख ५८

रत्नागिरी ११०

लांजा ५३

राजापूर ५४