शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एस.टी. खड्ड्यात, विभागातील पाचशे फेऱ्या अद्याप बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:38 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : अनलाॅकनंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील एस.टी. सेवा पूर्ववत होत आहे. शाळा-महाविद्यालये बंद असल्याने शालेय ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : अनलाॅकनंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील एस.टी. सेवा पूर्ववत होत आहे. शाळा-महाविद्यालये बंद असल्याने शालेय फेऱ्या अद्याप बंद आहेत. कमी भारमानामुळे जिल्ह्यातील पाचशे फेऱ्या बंद आहेत. त्यामध्ये खराब रस्त्यामुळे २८ बंद फेऱ्यांचा समावेश आहे.

रत्नागिरी विभागात सध्या ६१४ गाड्यांद्वारे ३२०० फेऱ्या सुरू आहेत. शाळा-महाविद्यालये बंद असून काही भागातून अत्यल्प भारमान लाभत असल्याने पाचशे फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने रत्नागिरी-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा आंबा घाट मोठ्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात आल्याने या मार्गावरील एस.टी. वाहतूक बंद आहे. चिपळुणातील काही फेऱ्या बंद आहेत.

कोल्हापूर मार्गात बदल

रत्नागिरी-कोल्हापूर-सांगली जिल्ह्याला जोडणारा आंबा घाट दरडी कोसळल्याने धोकादायक झाल्याने हा मार्ग मोठ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर दैनंदिन ३२ फेऱ्या सुरू होत्या; परंतु हा मार्ग धोकादायक झाल्याने अणुस्कुरामार्गे सध्या आठ फेऱ्या सुरू आहेत. अतिवृष्टीमुळे चिपळुणातील खराब रस्त्यामुळे चार फेऱ्या बंद आहेत.

एसटी खर्च वाढला

n कोल्हापूर मार्गावरील वाहतूक अणुस्कुरामार्गे वळविण्यात आली असल्याने अंतर वाढते. पर्यायाने इंधन खर्चात वाढ झाली आहे.

n काही गावातील रस्ते निकृष्ट, साइडपट्टी खराब झाल्याने अपघाताची संख्याही वाढली आहे.

n खराब रस्त्यामुळे टायर पंक्चर होणे, पाटा तुटणे, गिअर बाॅक्स निकामी होण्याचे प्रकार वाढल्याने खर्चात भर पडत आहे.

नऊ आगारांतील फेऱ्या बंद

शाळा-महाविद्यालयांचे ऑनलाइन अध्यापन सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नऊ आगारांतील शालेय फेऱ्या बंदच ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय अत्यल्प भारमान असलेल्या फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. जिल्ह्यातील नऊ आगारांतील मिळून एकूण पाचशे फेऱ्या बंद आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार भारमान पाहून फेऱ्या सुरू करण्यात येत आहेत.

भारमानाचा अंदाज घेत एस.टी.च्या फेऱ्या वाढविण्यात येत आहेत. सध्या पाचशे फेऱ्या बंद असल्या तरी प्रवाशांच्या मागणीनुसार फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. बंदमध्ये रात्रवस्तीच्या गाड्यांचा समावेश आहे. कोल्हापूर मार्गावरील वाहतूक अणुस्कुरामार्गे वळविण्यात आली आहे. मात्र, अंतरातील व तिकीटदरातील वाढीमुळे प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे. भारमान पाहून फेऱ्या सुरू करण्यात येतील.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक

n शहरी मार्गावर १२५ फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

n विभागातील रात्रवस्तीच्या शंभर फेऱ्या बंद आहेत.

n कोल्हापूर मार्गावरील २४ फेऱ्या अद्याप बंदच आहेत.

जिल्ह्यातील आगार आणि सुरू बस संख्या

मंडणगड ३६

दापोली ६९

खेड ६८

चिपळूण ९९

गुहागर ६७

देवरूख ५८

रत्नागिरी ११०

लांजा ५३

राजापूर ५४