शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
4
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
5
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
6
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
7
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
8
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
9
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
10
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
11
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
12
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
13
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
14
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
15
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
16
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
17
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
18
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
19
ITR भरल्यानंतर आता तासाभरात परतावा! आयकर विभागाचा स्पीड पाहून नागरिक थक्क, जाणून घ्या कसं झालं शक्य?
20
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 

एस.टी. खड्ड्यात, विभागातील पाचशे फेऱ्या अद्याप बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:38 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : अनलाॅकनंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील एस.टी. सेवा पूर्ववत होत आहे. शाळा-महाविद्यालये बंद असल्याने शालेय ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : अनलाॅकनंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील एस.टी. सेवा पूर्ववत होत आहे. शाळा-महाविद्यालये बंद असल्याने शालेय फेऱ्या अद्याप बंद आहेत. कमी भारमानामुळे जिल्ह्यातील पाचशे फेऱ्या बंद आहेत. त्यामध्ये खराब रस्त्यामुळे २८ बंद फेऱ्यांचा समावेश आहे.

रत्नागिरी विभागात सध्या ६१४ गाड्यांद्वारे ३२०० फेऱ्या सुरू आहेत. शाळा-महाविद्यालये बंद असून काही भागातून अत्यल्प भारमान लाभत असल्याने पाचशे फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने रत्नागिरी-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा आंबा घाट मोठ्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात आल्याने या मार्गावरील एस.टी. वाहतूक बंद आहे. चिपळुणातील काही फेऱ्या बंद आहेत.

कोल्हापूर मार्गात बदल

रत्नागिरी-कोल्हापूर-सांगली जिल्ह्याला जोडणारा आंबा घाट दरडी कोसळल्याने धोकादायक झाल्याने हा मार्ग मोठ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर दैनंदिन ३२ फेऱ्या सुरू होत्या; परंतु हा मार्ग धोकादायक झाल्याने अणुस्कुरामार्गे सध्या आठ फेऱ्या सुरू आहेत. अतिवृष्टीमुळे चिपळुणातील खराब रस्त्यामुळे चार फेऱ्या बंद आहेत.

एसटी खर्च वाढला

n कोल्हापूर मार्गावरील वाहतूक अणुस्कुरामार्गे वळविण्यात आली असल्याने अंतर वाढते. पर्यायाने इंधन खर्चात वाढ झाली आहे.

n काही गावातील रस्ते निकृष्ट, साइडपट्टी खराब झाल्याने अपघाताची संख्याही वाढली आहे.

n खराब रस्त्यामुळे टायर पंक्चर होणे, पाटा तुटणे, गिअर बाॅक्स निकामी होण्याचे प्रकार वाढल्याने खर्चात भर पडत आहे.

नऊ आगारांतील फेऱ्या बंद

शाळा-महाविद्यालयांचे ऑनलाइन अध्यापन सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नऊ आगारांतील शालेय फेऱ्या बंदच ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय अत्यल्प भारमान असलेल्या फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. जिल्ह्यातील नऊ आगारांतील मिळून एकूण पाचशे फेऱ्या बंद आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार भारमान पाहून फेऱ्या सुरू करण्यात येत आहेत.

भारमानाचा अंदाज घेत एस.टी.च्या फेऱ्या वाढविण्यात येत आहेत. सध्या पाचशे फेऱ्या बंद असल्या तरी प्रवाशांच्या मागणीनुसार फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. बंदमध्ये रात्रवस्तीच्या गाड्यांचा समावेश आहे. कोल्हापूर मार्गावरील वाहतूक अणुस्कुरामार्गे वळविण्यात आली आहे. मात्र, अंतरातील व तिकीटदरातील वाढीमुळे प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे. भारमान पाहून फेऱ्या सुरू करण्यात येतील.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक

n शहरी मार्गावर १२५ फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

n विभागातील रात्रवस्तीच्या शंभर फेऱ्या बंद आहेत.

n कोल्हापूर मार्गावरील २४ फेऱ्या अद्याप बंदच आहेत.

जिल्ह्यातील आगार आणि सुरू बस संख्या

मंडणगड ३६

दापोली ६९

खेड ६८

चिपळूण ९९

गुहागर ६७

देवरूख ५८

रत्नागिरी ११०

लांजा ५३

राजापूर ५४