शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. खड्ड्यात, विभागातील पाचशे फेऱ्या अद्याप बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:38 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : अनलाॅकनंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील एस.टी. सेवा पूर्ववत होत आहे. शाळा-महाविद्यालये बंद असल्याने शालेय ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : अनलाॅकनंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील एस.टी. सेवा पूर्ववत होत आहे. शाळा-महाविद्यालये बंद असल्याने शालेय फेऱ्या अद्याप बंद आहेत. कमी भारमानामुळे जिल्ह्यातील पाचशे फेऱ्या बंद आहेत. त्यामध्ये खराब रस्त्यामुळे २८ बंद फेऱ्यांचा समावेश आहे.

रत्नागिरी विभागात सध्या ६१४ गाड्यांद्वारे ३२०० फेऱ्या सुरू आहेत. शाळा-महाविद्यालये बंद असून काही भागातून अत्यल्प भारमान लाभत असल्याने पाचशे फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने रत्नागिरी-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा आंबा घाट मोठ्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात आल्याने या मार्गावरील एस.टी. वाहतूक बंद आहे. चिपळुणातील काही फेऱ्या बंद आहेत.

कोल्हापूर मार्गात बदल

रत्नागिरी-कोल्हापूर-सांगली जिल्ह्याला जोडणारा आंबा घाट दरडी कोसळल्याने धोकादायक झाल्याने हा मार्ग मोठ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर दैनंदिन ३२ फेऱ्या सुरू होत्या; परंतु हा मार्ग धोकादायक झाल्याने अणुस्कुरामार्गे सध्या आठ फेऱ्या सुरू आहेत. अतिवृष्टीमुळे चिपळुणातील खराब रस्त्यामुळे चार फेऱ्या बंद आहेत.

एसटी खर्च वाढला

n कोल्हापूर मार्गावरील वाहतूक अणुस्कुरामार्गे वळविण्यात आली असल्याने अंतर वाढते. पर्यायाने इंधन खर्चात वाढ झाली आहे.

n काही गावातील रस्ते निकृष्ट, साइडपट्टी खराब झाल्याने अपघाताची संख्याही वाढली आहे.

n खराब रस्त्यामुळे टायर पंक्चर होणे, पाटा तुटणे, गिअर बाॅक्स निकामी होण्याचे प्रकार वाढल्याने खर्चात भर पडत आहे.

नऊ आगारांतील फेऱ्या बंद

शाळा-महाविद्यालयांचे ऑनलाइन अध्यापन सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नऊ आगारांतील शालेय फेऱ्या बंदच ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय अत्यल्प भारमान असलेल्या फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. जिल्ह्यातील नऊ आगारांतील मिळून एकूण पाचशे फेऱ्या बंद आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार भारमान पाहून फेऱ्या सुरू करण्यात येत आहेत.

भारमानाचा अंदाज घेत एस.टी.च्या फेऱ्या वाढविण्यात येत आहेत. सध्या पाचशे फेऱ्या बंद असल्या तरी प्रवाशांच्या मागणीनुसार फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. बंदमध्ये रात्रवस्तीच्या गाड्यांचा समावेश आहे. कोल्हापूर मार्गावरील वाहतूक अणुस्कुरामार्गे वळविण्यात आली आहे. मात्र, अंतरातील व तिकीटदरातील वाढीमुळे प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे. भारमान पाहून फेऱ्या सुरू करण्यात येतील.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक

n शहरी मार्गावर १२५ फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

n विभागातील रात्रवस्तीच्या शंभर फेऱ्या बंद आहेत.

n कोल्हापूर मार्गावरील २४ फेऱ्या अद्याप बंदच आहेत.

जिल्ह्यातील आगार आणि सुरू बस संख्या

मंडणगड ३६

दापोली ६९

खेड ६८

चिपळूण ९९

गुहागर ६७

देवरूख ५८

रत्नागिरी ११०

लांजा ५३

राजापूर ५४