शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. सेवा सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:24 IST

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात दि. ३ ते दि. ९ जूनपर्यंत कडक लाॅकडाऊन घोषित करण्यात ...

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात दि. ३ ते दि. ९ जूनपर्यंत कडक लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेअंतर्गत मोजक्या फेऱ्या सुरू ठेवण्याचा निर्णय रत्नागिरी विभागाने घेतला आहे.

कोरोनामुळे गतवर्षी मार्चमध्ये सलग दोन ते अडीच महिने एस. टी. सेवा बंद होती. मात्र, शासनाच्या परवानगीनुसार टप्याटप्याने एस.टी. सेवा सुरू करण्यात आली. ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने एस़ टी़ बस धावू लागल्या. त्यानंतर रत्नागिरी विभागातून एकूण ६०० बसद्वारे ४ हजार २०० फेऱ्यांमधून दोन ते सव्वादोन लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येत होती़ त्यामुळे ५० लाखांपर्यंत उत्पन्न रत्नागिरी विभागाला प्राप्त होते. कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने दि. १५ एप्रिलपासून पुन्हा संचारबंदी जाहीर करण्यात आली. सुरुवातीला विकेंड लाॅकडाऊन त्यानंतर लाॅकडाऊनच घोषित करण्यात आले. यावर्षी अत्यावश्यक सेवेंतर्गत एस. टी. बस सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. प्रवाशांचा फारसा प्रतिसाद लाभत नसला तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वाहतूक मात्र करण्यात येत आहे. सध्या लांब पल्ल्याच्या गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.

सध्या १४० गाड्यांद्वारे ५२० फेऱ्या चालविण्यात येत होत्या. त्यामुळे दिवसाला १६ हजार प्रवासी वाहतूक करण्यात येत असल्याने सहा ते साडेसहा लाखांचे उत्पन्न प्राप्त होत होते. जिल्हा प्रशासनाने आठ दिवसांचे कडक लाॅकडाऊन घोषित केले आहे. खासगी आस्थापना बंद राहणार आहेत. बँका, पतसंस्था दुपारपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे पुन्हा प्रवासी वाहतुकीवर परिणाम होणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकारी यांच्या वाहतुकीसाठी एस.टी. सेवा सुरू राहणार असून, २० ते ३० गाड्यांद्वारे जेमतेम ६० ते ६५ फेऱ्या सुरू राहणार असल्याने रत्नागिरी विभागाने स्पष्ट केले आहे.