शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

पथकांची ‘भरारी’ थांबणार?

By admin | Updated: February 10, 2015 00:01 IST

शिक्षण विभाग : शिक्षणाधिकारी नियुक्तीकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

टेंभ्ये : रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा कारभार केवळ एका शिक्षणाधिकाऱ्यावर सुरु आहे. राज्यातील हे एकमेव उदाहरण असून, शासनाचे जिल्ह्याकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे. विशेष म्हणजे दहावी बारावीच्या परिक्षा तोंडावर आल्याने आता पथकांची ‘भरारी’ कशी होणार? असा प्रश्न शिक्षण विभागालाच पडला आहे.गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यात प्राथमिक व निरंतर विभागाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारीच दिलेला नसल्याने, हे विभाग प्रभारी म्हणूनच काम करीत आहेत. या सर्वात भर म्हणून, एकाच वेळी उपशिक्षणाधिकारी रजेवर असल्याने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेंद्र अहिरे यांच्यावर कामाचा ताण आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.जिल्ह्यात शिक्षण विभागात अधिकाऱ्यांची कमतरता हा कायमचा चर्चेचा विषय बनला आहे. एकावेळी सर्व शिक्षणाधिकारी कार्यरत आहेत, असे अपवादात्मक परिस्थितीतच घडले असेल. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी शिक्षण विभागाच्या बाबतीत उदासीन असल्याने परिपूर्ण अधिकारी वर्ग भरण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न होत नसल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात शिक्षण सेवा वर्ग एकची किमान चार पदे कार्यरत असणे आवश्यक आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, निरंतर व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांपैकी सध्या केवळ शिक्षणाधिकारी (माध्यमिक) या पदावरच पूर्णवेळ अधिकारी कार्यरत आहेत. उर्वरित सर्व ठिकाणी प्रभारीच कार्यभार पाहत आहेत.प्राथमिक विभागाचे दोन उपशिक्षणाधिकारी व माध्यमिक विभागाचा एक उपशिक्षणाधिकारी रजेवर असल्याने, विस्तार अधिकाऱ्यांच्या मदतीने शिक्षण विभागाचे काम करुन घेण्याची वेळ अहिरे यांच्यावर आली आहे. तीन शिक्षणाधिकाऱ्यांपैकी सोमवारी हजर होणार असल्याचे बोलले जात आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या आयोजनामध्ये शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. या प्रत्येकाचे एक स्वतंत्र भरारी पथक कार्यरत असते. या संदर्भात गैरमार्ग विरूद्ध कृ ती कार्यक्रमाच्या सभा सुुरु आहेत. या सभांना त्यांची उपस्थिती आवश्यक असते. या भरारी पथकांना मार्गदर्शन करण्यासाठी अधिकारीवर्गच नसल्याने शिक्षण विभागाचा कारभारच सध्या विस्कळीत झाला आहे.एकंदरीत जिल्ह्यात शिक्षण विभागातील सर्व अधिकारी पदे भरली जावीत, यासाठी लोकप्रतिनिधी स्तरावरून विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या शासनाच्या सुरु असलेल्या विविध योजना सक्षमपणे कार्यान्वित करण्यासाठी अधिकारी वर्ग परिपूर्ण असणे आवश्यक आहे. प्रत्येकवेळी रत्नागिरी जिल्ह्याच्या वाट्याला येणारा उपेक्षितपणा विचार करायला लावणारा आहे. (वार्ताहर)पदेमंजूररिक्तगटशिक्षणाधिकारी९३उपशिक्षणाधिकारी४१शिक्षणाधिकारी३२डाएट प्राचार्य११शालेय पोषणआहार अधीक्षक११