शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

विभागात शटल फेऱ्यांसाठी प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST

मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : अनलाॅकनंतर राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. ...

मेहरून नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : अनलाॅकनंतर राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. लाॅकडाऊनमध्ये बंद असलेल्या शटल फेऱ्या सुरू करण्यात आल्या असून त्यासाठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. रात्रवस्ती व लांब पल्ल्याच्या बहुतांश गाड्या सुरू करण्यात आल्या असून उर्वरित गाड्या गणेशोत्सवापर्यंत सुरू करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात रात्रवस्तीच्या २४० फेऱ्या सुरू होत्या त्यापैकी १७० फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. विभागात ४० शटल फेऱ्या सुरू होत्या, सर्व फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. शिवाय लांब पल्ल्याच्या १९० पैकी ११० फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. उर्वरित फेऱ्या प्रवासी प्रतिसाद पाहून गणेशोत्सवापर्यंत सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

रेल्वेलाही प्रतिसाद

कोकण रेल्वेमार्गावर १२० रेल्वे गाड्या सुरू आहेत. रेल्वेने कोरोना चाचणीचे नियम शिथिल केले असल्याने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. लाॅकडाऊनपूर्वी लांब पल्ल्याच्या १९० एस.टी.च्या फेऱ्या सुरू होत्या. त्यापैकी ११० फेऱ्या सुरू केल्या आहेत. पुणे, मुंबई, सोलापूर, अर्नाळा, अक्कलकोट मार्गावर एस.टी. फेऱ्यांना चांगला प्रतिसाद लाभत आहे.

या मार्गावर वाढल्या फेऱ्या

- खेड- चिपळूण

- खेड-दापोली

- देवरूख-रत्नागिरी

- रत्नागिरी -लांजा

- लांजा-राजापूर

- चिपळूण-रत्नागिरी

- रत्नागिरी-संगमेश्वर

- चिपळूण-पोफळी

- दापोली-हर्णे

रात्रवस्तीला मागणी

लाॅकडाऊनपूर्वी जिल्ह्यात रात्रवस्तीच्या २४० फेऱ्या सुरू होत्या. ग्रामीण भागातून रात्रवस्तीच्या फेऱ्यांना वाढती मागणी असल्याने १७० फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, उर्वरित ७० रात्रवस्तीच्या फेऱ्या लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेत चालक-वाहकांसाठी राहण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.

कोल्हापूर मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे फेऱ्यांवर परिणाम झाला आहे. मात्र, उर्वरित अन्य मार्गावरील बहुतांश फेऱ्या मात्र सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. गणेशोत्सव जवळ आला असून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. परतीसाठी ६६० गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध केल्या आहेत.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक.