शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

खर्च लाखोंचा; थेंब नाही पाण्याचा

By admin | Updated: August 7, 2014 00:13 IST

जैतापूर आरोग्यकेंद्र : कोणालाच सोयरसुतक नाही

जैतापूर : पाण्याचा विषय काढला की, डोळ्यातून पाणी येईल. पण, नळपाणी योजनेतून काही येणार नाही, असे सध्या ग्रामीण भागात म्हटले जात आहे. याची तंतोतंत प्रचिती जैतापूरमध्ये येत आहे. सुमारे १९ लाख रुपये खर्च करुन जिल्हा परिषदेने प्राथमिक आरोग्य केंद्र, जैतापूरला पाणीपुरवठा योजना राबवली. मात्र, या योजनेचे थेंबभर पाणी गेल्या आठ वर्षांत आरोग्य केंद्राला न मिळाल्याने कर्मचारी व रुग्णांची पाण्यासाठी वणवण संपलेली नाही.जैतापूर आरोग्य केंद्र (ता. राजापूर) हे परिसरातील सामान्य रुग्णांवरील प्राथमिक उपचारासाठी मोठे आशास्थान आहे. मात्र, येथे रुग्णाला नेल्यास त्याचा उपचाराअभावी नाही तर पाण्याअभावी मृत्यू ओढवू शकतो. कारण १९ लाख रूपये खर्च झाले तरी पाण्याचं स्वप्न काही सत्यात उतरलेलं नाही.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा तत्कालीन उपाध्यक्ष विलास अवसरे, दळेचे त्यावेळचे उपसरपंच महेश करगुटकर, तत्कालीन वैद्यकीय अधिकारी महेंद्र गावडे यांच्या उपस्थितीत होळी गावात एकनाथ राजू गुरव यांच्या जमिनीत योजनेसाठीच्या विहिरीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. माजी उपसरपंच महेश करगुटकर नवीन कार्यकारिणीत सरपंचपदी विराजमान झाले. त्यांचा कार्यकाळ संपत आला तरी ही योजना ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रातील पाणी समस्या संपलेली नाही.हे आरोग्य केंद्र ग्रामपंचायत, दळेच्या कार्यक्षेत्रात येते. एकनाथ गुरव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या नावे बक्षीसपत्राने विहिरीसाठी जमीन विनामोबदला दिली आहे. १९ लाखाची ही नळपाणी योजना असताना मक्तेदाराने दळे नळपाणी योजनेच्या चरातच पाईपलाईन टाकले. काही लाईन सहा इंच खोलीच्या कातळावर चर मारुन टाकली व पैसे वाचवले. विहीर बांधून तयार आहे. विजेचा खांब विहिरीजवळ आहे. तरीही विहिरीवर पंप बसलेला नाही. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे एवढा पैसा ओतूनही पाणी न आल्याचे कोणालाच सोयरसुतक नाही. त्यामुळे हे १९ लाख रुपये नेमके जिरले कुठे? असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे. (वार्ताहर)आरोग्य केंद्राबाबत सामान्यांचे राहोच, पण लोकप्रतिनिधीही किती उदासिन आहेत, हेच या घटनेवरून दिसून येते. आरोग्य केंद्रासाठी १९ लाखांचा निधी खर्चूनही पाण्याचा एक थेंब येत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. आमदारांपासून ते जिल्हा परिषद सदस्यांपर्यंत कोणालाच या आरोग्य केंद्राकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने रुग्णांबरोबरच स्थानिक ग्रामस्थांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.-अजूनही पाण्याची समस्या कायमच.-विहीर बांधून पूर्ण, विजेचे खांबही तयार. मात्र विहीरीवर पंपच बसवलेला नाही.-दळे येथील एकनाथ गुरव यांनी विहीरीसाठी दिली विनामोबदला जागा.-पाण्यासाठी करावी लागतेय -मक्तेदाराने पैसे वाचवण्यासाठी दळे नळपाणी योजनेच्या चरातच पाईपलाईन टाकली.