शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
3
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
4
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
5
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
6
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
7
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
8
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
9
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
10
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
11
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
12
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
13
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
14
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
15
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
16
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
17
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
18
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
19
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
20
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

खास बाब म्हणून कोकणवासीयांना १ लाख ४० हजार डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:38 IST

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास बाब म्हणून कोकणवासीयांना १ लाख ४० हजार कोरोना प्रतिबंधक डोस ...

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास बाब म्हणून कोकणवासीयांना १ लाख ४० हजार कोरोना प्रतिबंधक डोस दिले असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिली.

गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन आणि गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी घेऊन, मंत्री सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी अधिक डोसची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, मुख्यमंत्री ठाकरे यांनी रत्नागिरीसाठी ७० हजार तर सिंधुदुर्गासाठी ६९ हजार डोस दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी खास बाब म्हणून कोकणवासीयांसाठी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, एक कोकणवासीय म्हणून कोकणातील सर्व लोकांकडून मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, अशा शब्दात मंत्री सामंत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

प्राप्त डोस दोन दिवसांत नागरिकांना द्यावेत, अशा सूचना मंत्री सामंत यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ही लस मिळण्यासाठी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, आमदार राजन साळवी, आमदार योगेश कदम व आमदार भास्कर जाधव यांनीही प्रयत्न केले आहेत.