शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गाळ उपशाला प्रारंभ करताच देवडेतील काजळी नदीपात्र झाले अधिक विस्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पुनित झालेले, सह्याद्रीच्या कुशीत वसलेले नयनरम्य गाव म्हणजेच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पुनित झालेले, सह्याद्रीच्या कुशीत वसलेले नयनरम्य गाव म्हणजेच संगमेश्वर तालुक्यातील देवडे आदिष्टीवाडी. नऊ खोऱ्यांनी नटलेले आणि गनिमी काव्याचे उत्कृष्ट उदाहरण असलेल्या विशाळगडाच्या पायथ्याशी, काजळी नदीचा उगम अंगावर झेलीत असलेले रमणीय गाव. नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने आणि लोकसहभागातून या गावातून वाहणाऱ्या विस्तीर्ण काजळी नदीच्या पात्रातील गाळ उपसा करण्याच्या कामाला पहिल्या टप्प्यात प्रारंभ झाला आणि या नदीचे पात्र अधिकच विस्तीर्ण झाले.

पावसाळ्यात देवड्याच्या सौंदर्यात अधिक भर घालतात ते या गावातील धबधबे. सांबरखिंड, कुडव, बामणपात्र, दोरांबे, म्होवाचा कडा, कोंगिवरे, धुमक व्हाळ, कळंबचे खोरे, ब्रिटीशकालीन वात खडवा अशी या धबधब्यांची नावे असून, या खोऱ्यांमधून बाराही महिने पाणी वाहत असते. पूर्वीचे बारा बलुतेदार असलेले हे स्वयंपूर्ण खेडे, आजही गुण्यागोविंदाने नांदत आहे. १९५० साली ग्रुप ग्रामपंचायत अस्तित्वात आली. या नदीचा उगम या गावातून होत असल्याने हे पात्र अतिशय विस्तीर्ण असे आहे. या पात्रातील गाळ उपसा झाल्यास भविष्यात पुराचा धोका निर्माण होणार नाही, या उद्देशाने ग्रामपंचायतीने गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली. गावातील धडपड्या तरूण अनिल कांबळे आणि ग्रामपंचायतीच्या अन्य ज्येष्ठ ग्रामस्थांनी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनशी संपर्क केला आणि लागलीच या फाऊंडेशवनच्या मदतीने या उपक्रमाला सुरूवातही झाली. देवडे - वाडीअधिष्ठी ग्रामपंचायत हद्दीतील काजळी नदी गाळ उपसा व नदी पुनर्जीवन मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला २५ मार्च रोजी प्रारंभ झाला. नाम फाऊंडेशनचे कोकण समन्वयक समीर जानवलकर, सरपंच राजेश राणे, उपसरपंच रश्मी जंगम आणि ग्रुपग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच डाॅ. शशिकांत चिंचवलकर, ज्येष्ठ ग्रामस्थ प्रकाश बेर्डे, दयानंद चिंचवलकर तसेच देवडेतील अन्य ग्रामस्थ, कोंडगावचे सरपंच बापू शेट्ये, भडकंब्याचे उपसरपंच बापू शिंदे आदींच्या उपस्थितीत सोमलिंग मंदिरात गाळ उपसा मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ झाला.

नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने सर्व अद्ययावत मशिनरी गावात दाखल झाली. गाळ उपशाला सुरूवात झाली. शासकीय यंत्रणेकडून या कामाकरिता १५ लाख रक्कम मंजूर झाली. त्यातील ५० टक्के रक्कम सुरूवातीलाच मिळणार होती. परंतु, तेवढ्यात कोरोना महामारी सुरू झाल्याने ही रक्कम कोरोनासाठी वर्ग करण्यात आली. आता पुढे काय, असा प्रश्न ग्रामस्थांना सतावू लागला. मात्र, ‘गाव करी ते राव न करी’, या उक्तीप्रमाणे लोकसहभागातून सुमारे दहा लाखांपर्यंत रक्कम गोळा करण्यात आली आणि नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने गाळ उपशाला सुरूवात झाली. अंदाजे ७०० मीटर लांब व ४० मीटर रुंद, खोली साधारण २ मीटरचे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, पाऊस लवकर सुरू झाला. त्यामुळे मे अखेरपर्यंत पहिल्या टप्प्यात ६० हजार क्युबिक मीटर इतका गाळ काढण्यात आला. त्यामुळे या नदीतील सहा करोड लीटर पाणीसाठा वाढला. त्यामुळे पुढच्या वर्षी दुसरा टप्पाही पूर्ण करण्याचा निर्धार या ग्रामपंचायतीने आणि देवडे वाडीअधिष्ठी ग्रामस्थांनी केला आहे.

..........

ग्रामस्थांची एकी आणि नाम फाऊंडेशनचा मदतीचा हात...

नदीच्या दोन्ही बाजूला २ मोठ्या विहीरी काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे गावात पिण्याचे मुबलक पाणी व तिबार पीक घेता येणार आहे. नाम फाऊंडेशनने केलेल्या अनमोल सहकार्यामुळे आणि देवडे वाडीअधिष्ठी ग्रामस्थांच्या एकीमुळे काजळी नदी पुनर्जीवन मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. पुढच्या वर्षी या मोहिमेसाठी लागणारा निधी उभारून दुसरा टप्पाही यशस्वी करण्याचा निर्धार या ग्रामस्थांनी केला आहे.