शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

तपासणी नाके बदलताच अनेक सापडले कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST

तन्मय दाते रत्नागिरी : विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना चाप बसावा, यासाठी पाेलिसांकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे़ तरीही ...

तन्मय दाते

रत्नागिरी : विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना चाप बसावा, यासाठी पाेलिसांकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे़ तरीही अनेकजण दुपारच्या वेळेत आडमार्गाचा वापर करून बाहेर पडत असल्याचे प्रकार घडत आहेत़ या वाहनचालकांना चाप बसण्यासाठी पाेलिसांनी जिल्हाभरात दुपारच्या वेळेत आडमार्गावर पाेलीस तैनात करून तपासणी केली़ या कारवाईत तब्बल ४०० जणांवर कारवाई करण्यात आली़

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी संचारबंदी करण्यात आली आहे़ या काळात विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर वचक राहावा, यासाठी पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी केली आहे. याठिकाणी दररोज जाणारी प्रत्येक गाडी तपासूनच पाठवली जाते. तरीही, काही नागरिक पोलिसांची नजर चुकवून आडमार्गाने पळ काढतात़ विशेषत: दुपारच्या वेळेत विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या अधिक असते़ अशा नागरिकांना चाप लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी ‘सरप्राइज’ नाकाबंदी मोहीम हाती घेतली हाेती़ ही माेहीम शनिवारी दुपारी ३ ते ३.३० यावेळेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यात आली.

अचानकपणे नाकाबंदीची ठिकाणे बदलल्याने गाफील असलेले नागरिक पोलिसांच्या तावडीत सापडले. ही कारवाई कारवांचीवाडी, निवळी, देवरूख, चिपळूण बाजारपेठ आणि अन्य ठिकाणी करण्यात आली. या कारवाईत विनामास्क फिरणाऱ्या १२७, मोटार वाहन कायदा भंग केल्याप्रकरणी २५० आणि अन्य प्रकारांमध्ये २३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले़ या तपासणीचा विनाकारण फिरणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला असून, दाेन दिवस विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या राेडावली हाेती़

-----------------------

कारवाई करून लोकांकडून दंड वसूल करणे, हा यामागचा उद्देश नाही़ झपाट्याने पसरत असलेला कोरोना लवकरात लवकर आटोक्यात यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ काेराेनाचा संसर्ग वाढत असूनही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहे़ हे त्यांच्यासाठी आणि इतरांसाठीही धाेकादायक आहे़ त्यामुळे ही माेहीम हाती घेण्यात आली हाेती़ काेराेनाला राेखण्यासाठी अशा विविध याेजना अचानकपणे राबवण्यात येणार आहेत़

- डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा पाेलीस अधीक्षक, रत्नागिरी

-------------------------

रत्नागिरी येथील कारवांचीवाडी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे व परिविक्षाधीन अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड व पोलीस कर्मचाऱ्यांनी दुचाकीचालकांची तपासणी केली़