शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

...हा तर खेडेकरांनी लावलेला जावईशोध : रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:35 IST

खेड : भाजप नेते किरीट सोमय्या यांना भेटून पालकमंत्री अनिल परब यांच्या हॉटेलची तक्रार केली, हा जावईशोध वैभव खडेकर ...

खेड : भाजप नेते किरीट सोमय्या यांना भेटून पालकमंत्री अनिल परब यांच्या हॉटेलची तक्रार केली, हा जावईशोध वैभव खडेकर यांनी लावलेला दिसतो. रामदास कदम कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसत नसतो, मी सांगून आणि समोरून अंगावर जातो. होय! प्रसाद कर्वे यांचा माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेण्यासाठी मी उपयोग करून घेतला. बाकी माझा व त्यांचा कोणताही संबंध नाही. किरीट सोमय्या यांना भेटण्याचा किंवा त्यांचे थोबाड पाहण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त आमच्या कुटुंबांमध्ये भांडणे लावण्यासाठी हे कटकारस्थान आहे, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे नेते तथा माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मनसे सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना दिले आहे.

मी कडवा शिवसैनिक आहे. मी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, असे स्वप्न वैभव खेडेकर यांना पडले असावे, असा टोलाही त्यांनी हाणला आहे.

नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शनिवारी दि. १८ रोजी पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांच्यावर तोफ डागली. त्यांच्या आरोपांचे खंडन करण्यासाठी आमदार कदम यांनी प्रसिद्धीपत्रक प्रसिध्दीस दिले आहे. जे मनसे पक्षाचे आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, असा संभ्रम खेडच्या जनतेला पडला आहे, असे क वर्ग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर खोटे, दिशाभूल करणारे आरोप केले आहेत. माझी बदनामी करणारे, जनमानसामध्ये, माझ्या पक्षामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये माझ्याबाबतीत गैरसमज पसरवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी खेडेकर यांनी बेछूटपणे आरोप केले आहेत. त्यांचा मी तीव्रपणे निषेध करीत आहे. त्यांच्याविरोधात जे आरोप केले होते, त्यासंदर्भात ते न्यायालयात गेले होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधात निकाल लागला, तर १ महिन्यासाठी त्यांना स्थगिती दिली आहे. त्याचा विपर्यास करून, जणू काय न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिली असे भासवून त्यांनी शिमगाच साजरा केला आहे, याचे आपल्याला आश्चर्य वाटते, असे त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.

विधानसभेच्या निवडणुकीवेळी मातोश्रीच्या पायऱ्या व माजी पालकमंत्र्यांच्या पायऱ्या ज्यांनी शिवसेनेतून तिकीट मागण्यासाठी झिजविल्या, त्या नेत्याच्या मैत्रीचा हा परिणाम असावा असे वाटते. निवडणुकीपूर्वीच मी पत्रकार परिषद घेऊन, यापुढे मी कोणतेही पद घेणार नाही, असे जाहीर केले होते. त्यामुळे मंत्री होण्याचा व नाराज होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तमाम महाराष्ट्रातील जनता रामदास कदम यांना चांगली ओळखते. महाराष्ट्राने, कोकणाने व शिवसेनेने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. त्याची परतफेड या जन्मी होऊ शकणार नाही. अशा बिनबुडाच्या आरोपांना आपण भीक घालीत नाही. शेवटी सत्य जनतेपुढे येईलच व भ्रमाचा भोपळा फुटेल, असा दावा त्यांनी यातून व्यक्त केला आहे.