शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

...हा तर खेडेकरांनी लावलेला जावईशोध : रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:35 IST

खेड : भाजप नेते किरीट सोमय्या यांना भेटून पालकमंत्री अनिल परब यांच्या हॉटेलची तक्रार केली, हा जावईशोध वैभव खडेकर ...

खेड : भाजप नेते किरीट सोमय्या यांना भेटून पालकमंत्री अनिल परब यांच्या हॉटेलची तक्रार केली, हा जावईशोध वैभव खडेकर यांनी लावलेला दिसतो. रामदास कदम कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसत नसतो, मी सांगून आणि समोरून अंगावर जातो. होय! प्रसाद कर्वे यांचा माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेण्यासाठी मी उपयोग करून घेतला. बाकी माझा व त्यांचा कोणताही संबंध नाही. किरीट सोमय्या यांना भेटण्याचा किंवा त्यांचे थोबाड पाहण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त आमच्या कुटुंबांमध्ये भांडणे लावण्यासाठी हे कटकारस्थान आहे, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे नेते तथा माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मनसे सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना दिले आहे.

मी कडवा शिवसैनिक आहे. मी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, असे स्वप्न वैभव खेडेकर यांना पडले असावे, असा टोलाही त्यांनी हाणला आहे.

नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शनिवारी दि. १८ रोजी पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांच्यावर तोफ डागली. त्यांच्या आरोपांचे खंडन करण्यासाठी आमदार कदम यांनी प्रसिद्धीपत्रक प्रसिध्दीस दिले आहे. जे मनसे पक्षाचे आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, असा संभ्रम खेडच्या जनतेला पडला आहे, असे क वर्ग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर खोटे, दिशाभूल करणारे आरोप केले आहेत. माझी बदनामी करणारे, जनमानसामध्ये, माझ्या पक्षामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये माझ्याबाबतीत गैरसमज पसरवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी खेडेकर यांनी बेछूटपणे आरोप केले आहेत. त्यांचा मी तीव्रपणे निषेध करीत आहे. त्यांच्याविरोधात जे आरोप केले होते, त्यासंदर्भात ते न्यायालयात गेले होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधात निकाल लागला, तर १ महिन्यासाठी त्यांना स्थगिती दिली आहे. त्याचा विपर्यास करून, जणू काय न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिली असे भासवून त्यांनी शिमगाच साजरा केला आहे, याचे आपल्याला आश्चर्य वाटते, असे त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.

विधानसभेच्या निवडणुकीवेळी मातोश्रीच्या पायऱ्या व माजी पालकमंत्र्यांच्या पायऱ्या ज्यांनी शिवसेनेतून तिकीट मागण्यासाठी झिजविल्या, त्या नेत्याच्या मैत्रीचा हा परिणाम असावा असे वाटते. निवडणुकीपूर्वीच मी पत्रकार परिषद घेऊन, यापुढे मी कोणतेही पद घेणार नाही, असे जाहीर केले होते. त्यामुळे मंत्री होण्याचा व नाराज होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तमाम महाराष्ट्रातील जनता रामदास कदम यांना चांगली ओळखते. महाराष्ट्राने, कोकणाने व शिवसेनेने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. त्याची परतफेड या जन्मी होऊ शकणार नाही. अशा बिनबुडाच्या आरोपांना आपण भीक घालीत नाही. शेवटी सत्य जनतेपुढे येईलच व भ्रमाचा भोपळा फुटेल, असा दावा त्यांनी यातून व्यक्त केला आहे.