शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
2
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
3
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
4
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
5
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
6
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
7
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
8
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
9
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
10
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
11
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
12
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
13
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
14
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
15
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
16
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
17
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
18
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
19
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
20
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!

...हा तर खेडेकरांनी लावलेला जावईशोध : रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:35 IST

खेड : भाजप नेते किरीट सोमय्या यांना भेटून पालकमंत्री अनिल परब यांच्या हॉटेलची तक्रार केली, हा जावईशोध वैभव खडेकर ...

खेड : भाजप नेते किरीट सोमय्या यांना भेटून पालकमंत्री अनिल परब यांच्या हॉटेलची तक्रार केली, हा जावईशोध वैभव खडेकर यांनी लावलेला दिसतो. रामदास कदम कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसत नसतो, मी सांगून आणि समोरून अंगावर जातो. होय! प्रसाद कर्वे यांचा माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेण्यासाठी मी उपयोग करून घेतला. बाकी माझा व त्यांचा कोणताही संबंध नाही. किरीट सोमय्या यांना भेटण्याचा किंवा त्यांचे थोबाड पाहण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त आमच्या कुटुंबांमध्ये भांडणे लावण्यासाठी हे कटकारस्थान आहे, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे नेते तथा माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मनसे सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना दिले आहे.

मी कडवा शिवसैनिक आहे. मी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, असे स्वप्न वैभव खेडेकर यांना पडले असावे, असा टोलाही त्यांनी हाणला आहे.

नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शनिवारी दि. १८ रोजी पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांच्यावर तोफ डागली. त्यांच्या आरोपांचे खंडन करण्यासाठी आमदार कदम यांनी प्रसिद्धीपत्रक प्रसिध्दीस दिले आहे. जे मनसे पक्षाचे आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, असा संभ्रम खेडच्या जनतेला पडला आहे, असे क वर्ग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर खोटे, दिशाभूल करणारे आरोप केले आहेत. माझी बदनामी करणारे, जनमानसामध्ये, माझ्या पक्षामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये माझ्याबाबतीत गैरसमज पसरवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी खेडेकर यांनी बेछूटपणे आरोप केले आहेत. त्यांचा मी तीव्रपणे निषेध करीत आहे. त्यांच्याविरोधात जे आरोप केले होते, त्यासंदर्भात ते न्यायालयात गेले होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधात निकाल लागला, तर १ महिन्यासाठी त्यांना स्थगिती दिली आहे. त्याचा विपर्यास करून, जणू काय न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिली असे भासवून त्यांनी शिमगाच साजरा केला आहे, याचे आपल्याला आश्चर्य वाटते, असे त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.

विधानसभेच्या निवडणुकीवेळी मातोश्रीच्या पायऱ्या व माजी पालकमंत्र्यांच्या पायऱ्या ज्यांनी शिवसेनेतून तिकीट मागण्यासाठी झिजविल्या, त्या नेत्याच्या मैत्रीचा हा परिणाम असावा असे वाटते. निवडणुकीपूर्वीच मी पत्रकार परिषद घेऊन, यापुढे मी कोणतेही पद घेणार नाही, असे जाहीर केले होते. त्यामुळे मंत्री होण्याचा व नाराज होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तमाम महाराष्ट्रातील जनता रामदास कदम यांना चांगली ओळखते. महाराष्ट्राने, कोकणाने व शिवसेनेने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. त्याची परतफेड या जन्मी होऊ शकणार नाही. अशा बिनबुडाच्या आरोपांना आपण भीक घालीत नाही. शेवटी सत्य जनतेपुढे येईलच व भ्रमाचा भोपळा फुटेल, असा दावा त्यांनी यातून व्यक्त केला आहे.