शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

कुणी बाबा तर कुणी आईचे छत्र गमावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर ठरली आहे. मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या या लाटेत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर ठरली आहे. मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या या लाटेत आतापर्यंत जवळपास २५ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित झाले, तर साडेअकराशेपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. यात अनेकांनी आपले आप्त गमावले आहेत. काही ठिकाणी तर कुटुंबातील सर्वच सदस्य कोरोनाचे बळी ठरले आहेत.

० ते १८ वयोगटातील ज्या मुलांचे आई आणि वडील दोन्हीही कोरोनामुळे गेले आहेत, अशांना शासनाच्या बालसंगोपन योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, ज्या मुलांचे वडील गेले आहेत आणि आई घरातच असेल अशा कुटुंबांची कमावती व्यक्तीच गेल्याने त्यांच्या मुलाबरोबरच कुटुंबावरही आर्थिक संकट कोसळणार आहे. त्याचबरोबर मुलांचे भवितव्य काय, हा प्रश्नही त्यांच्या मातेसमोर उभा राहणार आहे.

- दापोली तालुक्यातील म्हाळुंगे येथील ५४ वर्षीय पांडुरंग देवघरे आणि त्यांची पत्नी प्राची यांचे कोरोनामुळे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे त्यांची तीन मुले अनाथ झाली आहेत. या कुटुंबाचा पोशिंदाच गेल्याने त्याचबरोबर मातृछत्रही हरपल्याने या मुलांचे भवितव्य अंधारले आहे.

- मोठी मुलगी सिद्धी १९ वर्षांची असून, ती सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे. मात्र, तिच्या पाठची गाैरी आणि श्रीदीप ही जुळी भावंडे १५ वर्षांची असून, नववी इयत्तेत शिकत आहेत.

- पांडुरंग देवघरे हे व्यवसायाने कंत्राटदार होते. छोट्या-मोठ्या कामांवर त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालत होता. परंतु त्यांच्या जाण्याने मुलांच्या शिक्षणाबरोबरच पुढे काय, हा प्रश्न उभा राहिला आहे.

जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या ११६० व्यक्तींमधून ज्यांची मुले ० ते १८ वर्षांखालील आहेत. अशा बालकांना शोधून काढण्यासाठी चार दिवसांपासून युद्धपातळीवर शोधमोहीम राबविल्यानंतर अशी ९० मुले सापडली आहेत. त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- समृद्धी वीर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, रत्नागिरी

एकरकमी पाच लाख

बालसंगोपन योजनेत बालकाला बालगृहामध्ये दाखल करून किंवा संबंधित बालकांच्या नातेवाइकाकडून संगोपन अशा दोन्ही पद्धतीत संबंधित बालकाच्या नावे एकरकमी पाच लाख रुपये मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येणार आहे. ठेवीची ही रक्कम बालकाला २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्याजासह मिळणार आहे.

शासनाच्या बालसंगोपन योजनेचा आधार मिळणार

या योजनेत १ मार्च २०२० रोजी व त्यानंतर कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक (आई व वडील) मृत्यू पावलेले किंवा एका पालकाचा कोरोनामुळे व अन्य पालकांचा इतर कारणामुळे मृत्यू झाला असल्यास किंवा एका पालकाचा (१ मार्च २०२०) पूर्वीच मृत्यू झाला असेल आणि त्यानंतर एका पालकाचा कोविडमुळे मृत्यू झाला असल्यास अशी ० ते १८ वयोगटातील बालकांचा बालसंगोपन योजनेत समावेश होणार आहे.