शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

कुणी बाबा तर कुणी आईचे छत्र गमावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर ठरली आहे. मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या या लाटेत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर ठरली आहे. मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या या लाटेत आतापर्यंत जवळपास २५ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित झाले, तर साडेअकराशेपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. यात अनेकांनी आपले आप्त गमावले आहेत. काही ठिकाणी तर कुटुंबातील सर्वच सदस्य कोरोनाचे बळी ठरले आहेत.

० ते १८ वयोगटातील ज्या मुलांचे आई आणि वडील दोन्हीही कोरोनामुळे गेले आहेत, अशांना शासनाच्या बालसंगोपन योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, ज्या मुलांचे वडील गेले आहेत आणि आई घरातच असेल अशा कुटुंबांची कमावती व्यक्तीच गेल्याने त्यांच्या मुलाबरोबरच कुटुंबावरही आर्थिक संकट कोसळणार आहे. त्याचबरोबर मुलांचे भवितव्य काय, हा प्रश्नही त्यांच्या मातेसमोर उभा राहणार आहे.

- दापोली तालुक्यातील म्हाळुंगे येथील ५४ वर्षीय पांडुरंग देवघरे आणि त्यांची पत्नी प्राची यांचे कोरोनामुळे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे त्यांची तीन मुले अनाथ झाली आहेत. या कुटुंबाचा पोशिंदाच गेल्याने त्याचबरोबर मातृछत्रही हरपल्याने या मुलांचे भवितव्य अंधारले आहे.

- मोठी मुलगी सिद्धी १९ वर्षांची असून, ती सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे. मात्र, तिच्या पाठची गाैरी आणि श्रीदीप ही जुळी भावंडे १५ वर्षांची असून, नववी इयत्तेत शिकत आहेत.

- पांडुरंग देवघरे हे व्यवसायाने कंत्राटदार होते. छोट्या-मोठ्या कामांवर त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालत होता. परंतु त्यांच्या जाण्याने मुलांच्या शिक्षणाबरोबरच पुढे काय, हा प्रश्न उभा राहिला आहे.

जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या ११६० व्यक्तींमधून ज्यांची मुले ० ते १८ वर्षांखालील आहेत. अशा बालकांना शोधून काढण्यासाठी चार दिवसांपासून युद्धपातळीवर शोधमोहीम राबविल्यानंतर अशी ९० मुले सापडली आहेत. त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- समृद्धी वीर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, रत्नागिरी

एकरकमी पाच लाख

बालसंगोपन योजनेत बालकाला बालगृहामध्ये दाखल करून किंवा संबंधित बालकांच्या नातेवाइकाकडून संगोपन अशा दोन्ही पद्धतीत संबंधित बालकाच्या नावे एकरकमी पाच लाख रुपये मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येणार आहे. ठेवीची ही रक्कम बालकाला २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्याजासह मिळणार आहे.

शासनाच्या बालसंगोपन योजनेचा आधार मिळणार

या योजनेत १ मार्च २०२० रोजी व त्यानंतर कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक (आई व वडील) मृत्यू पावलेले किंवा एका पालकाचा कोरोनामुळे व अन्य पालकांचा इतर कारणामुळे मृत्यू झाला असल्यास किंवा एका पालकाचा (१ मार्च २०२०) पूर्वीच मृत्यू झाला असेल आणि त्यानंतर एका पालकाचा कोविडमुळे मृत्यू झाला असल्यास अशी ० ते १८ वयोगटातील बालकांचा बालसंगोपन योजनेत समावेश होणार आहे.