शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
3
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
4
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
5
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
6
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
7
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
8
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
10
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
11
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
12
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
13
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
14
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
15
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
16
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
17
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
18
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
19
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
20
५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन

गावोगावचे गुंतागुंतीचे प्रश्न सोडविणार : माने

By admin | Updated: July 23, 2016 23:50 IST

पुनर्वसन मंत्र्यांची भेट घेणार : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांची बैठक

रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला मिळण्यासाठी आणि पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, प्रत्येक गावात सभा घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधून समस्या जाणून घेऊ, कोंडी फोडण्यासाठी आपण रत्नागिरीत आलात ही ऐतिहासिक गोष्ट आहे. दशक्रोशीतील कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी आम्ही पक्षविरहित काम करू. तसेच प्रकल्पबाधितांना भाजप सरकार आईच्या मायेने प्रेम देईल, असे आश्वासन भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी दिले.विसूभाऊ पटवर्धन व प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येऊन दत्तमंगल कार्यालयात सभा घेतली. त्यावेळी माने बोलत होते. व्यासपीठावर विसूभाऊ पटवर्धन, दिवाकर आडविरकर आणि केंद्रीय रेल्वे समितीचे सदस्य मनोहर गोठणकर उपस्थित होते.बाळ माने यांनी केंद्र व राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर आमचीही भूमिका व नैतिक जबाबदारी वाढली असून, मी प्रकल्पाबाबतचे आपले दु:ख समजू शकतो. मी प्रकल्पाचा एजंट नाही. पक्षविरहीत काम झाले पाहिजे. भाजपमध्ये प्रवेश करा, मग काम करतो अशी माझी वृत्ती नाही. पक्षामुळे तुमच्यामध्येच वादंग होऊ नयेत. सर्व समस्या जाणून घेतल्यानंतरच आपण एकत्र काम करू, असे बाळ माने म्हणाले.पक्षविहरित कामावर भर देऊ. प्रकल्पाबाबत अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल प्रशासन, पुनर्वसन यांच्याकडूनही पूर्ण माहिती घेतली पाहिजे. नुकसानभरपाई वाढली पाहिजे, पाच किलोमीटर परिसरातील गावे बाधित घोषित करावी, याकरिता पुनर्वसन मंत्र्यांची भेट घेऊ, असे माने यांनी सांगितले.विसूभाऊंनी ग्रामस्थांमधील संभ्रमावस्था मांडली. मोबदला घेतला म्हणजे प्रकल्पाला पाठिंंबा नव्हे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. शासनाने ग्रामस्थांची बाजू मांडून प्रकल्पाशी नवा करार करावा. महामार्ग किंवा विमानतळासाठी लाखो रूपयांची भरपाई दिली जाते. या भरपाईच्या बाबतीत कोकणाला वेगळा न्याय का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. यावेळी राजन लाड, माडबनच्या माजी सरपंच मंदा वाडेकर, आदींसह काही ग्रामस्थांनी व्यथा मांडल्या.अध्यक्षीय भाषणात दिवाकर आडविरकर यांनी सांगितले की, १९७५च्या सुमारास दिल्ली विश्वविद्यालयातील ४० युवक अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिणामांचे सर्वेक्षण करण्यासाठी जैतापूरला आले होते. या सभेला मिठगवाणे, जैतापूर, जानशी, बाकाळे, सागवे, माडबन आदी दहा गावांतील दीडशे ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)