शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सौरऊर्जा बॅटऱ्या चोर अद्याप मोकाट

By admin | Updated: December 5, 2014 23:18 IST

दाभोळ : पोलिसांच्या तपासाबाबत शंका

दाभोळ : जनतेच्या सोयीसाठी दाभोळ ग्रामपंचायतीच्यावतीने गावात सौरऊर्जा पथदिवे लावण्यात आले होते. त्यातील सात सौरऊर्जा पथदिव्यांच्या बॅटऱ्यांची चोरी झाल्याची तक्रार सरपंच डॉ. आनंद गोंधळेकर यांनी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तब्बल सात जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्यावर भादंविक ४११, ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. यातील आरोपींची न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली असून, खरे गुन्हेगार मात्र अद्याप मोकाट फिरत असल्याची गावात चर्चा सुरु झाली आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मधु शिंदे यांनी योग्य तऱ्हेने तपास करुन गुन्हेगारांना अटक केली. आरोपींनी पोलिसांना नावे सांगूनही पोलिसांचा तपास त्यांच्यापर्यंत जात नसल्याने पोलिसांच्या तपासाबाबत सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गावातील सरकारी मालमत्तेची सर्वात मोठी व धाडसी चोरी म्हणून या घटनेकडे पाहिले जाते. बॅटऱ्या चोरल्याने दाभोळ गावचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे या चोरीच्या मुळापर्यंत जाऊन पोलिसांनी तपास करणे महत्त्वाचे आहे.यामध्ये मोठे रॅकेट असून खरे गुन्हेगार कोण आहेत हे जनतेला कळलेच पाहिजे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास होत नाही, असे जनतेच्या निदर्शनास येत आहे. सौर पथदीप बॅटऱ्यांच्या चोरीबाबत वेळीच तक्रार दाखल झाली नसती, तर दाभोळ गावात मोठा दरोडाच पडला असता आणि एखादवेळ जीवितहानी करण्यापर्यंत मजल गेली असती. त्यामुळे दाभोळ गाव चांगलेच बदनाम झाले असते. दाभोळ ग्रामपंचायतीच्या वतीने सौरऊर्जेवरील एकूण ६0 पथदिवे बसवण्यात आले असून, सौरऊर्जेवरील दिव्यांच्या पन्नास बॅटऱ्या ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहेत. त्यातील सात बॅटऱ्यांची चोरी झाल्याची तक्रार दाखल असून, तीन बॅटऱ्या चोरीस गेल्याची तक्रार दाखल झालेली नाही. पोलीस याबाबत कसा तपास करतात, हे येणारा काळच ठरवणार आहे. (वार्ताहर)