शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उत्खनन सर्व्हेनंतर शक्य

By admin | Updated: June 9, 2015 00:10 IST

उत्खनन बंदी : चेंडू ‘मेरिटाईम’च्या कोर्टात

रत्नागिरी : केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाकडून वाळू उत्खननाला हिरवा कंदिल मिळाला असला तरी मेरिटाईम बोर्डाकडून सर्वेक्षण झाल्यानंतरच उत्खननासाठी परवाने देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता वाळू व्यवसायाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. आवाज संस्थेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेअनुषंगाने पश्चिम घाट संरक्षित करण्याच्या दृष्टीने केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने आॅक्टोबर २०११ पासून रत्नागिरीसह कोकणात अधिस्थगन लागू केला होता. वाळू, जांभा दगड आदी गौण खनिजांच्या उत्खननावर बंदी आणल्याने वाळू व्यावसायिकांबरोबरच चिरेखाण व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवले होते. याबाबत पर्यावरण खात्याकडे पाठपुरावा केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील इको सेन्सिटिव्ह १९२ गावे वगळून उर्वरित गावांमधील गौण खनिज उत्खननावरील बंदी उठवण्यात आली. मात्र, जिल्ह्यातील खाडीपात्र तसेच नदीपात्रातील वाळू उत्खननावर आजतागायत बंदी आहे. गेल्या तीन वर्षांपासून असलेल्या या बंदीमुळे बांधकामासाठी चिरे, वाळू उपलब्ध होणे कठीण झाले होते. बांधकाम साहित्य बाहेरून आणावे लागत होते. बांधकाम व्यावसायिकांना जादा भुर्दंड सहन करून बाहेरून वाळू खरेदी करावी लागत आहे. शासकीय बांधकामेही रेंगाळली आहेत. वाळू लिलाव थांबल्याने प्रशासनाचा महसूलही बुडाला आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने वाळूवरील बंदी उठवल्याने व्यावसायिकांना हायसे वाटले आहे. पूर्वी जिल्हा खनिकर्म कार्यालयाकडून जिल्ह्यातील ३५ गटांना उत्खननासाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु आता वाळू उपसा व लिलावाचे हक्क मेरिटाईम बोर्डाकडे देण्यात आले आहेत. मेरिटाईम बोर्ड जिल्ह्यातील नद्या व खाड्यांचे सर्वेक्षण करून वाळू उत्खनन क्षेत्र ठरवणार आहे. त्यानुसार हातपाटी किंवा ड्रेजरसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला जाईल. (प्रतिनिधी)व्यावसायिकांवर आर्थिक संकटमेरिटाईम बोर्डाच्या सर्वेक्षणानंतर निश्चित केलेल्या उत्खनन क्षेत्रासाठी खनिकर्म विभागाला प्रस्ताव मागवता येणार आहेत. त्यामुळे मेरिटाईम बोर्ड सर्वेक्षण करून उत्खननासाठी कधी एकदा परवानगी देते, याकडे हातपाटी व्यावसायिकांसह अन्य वाळू व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. इको सेन्सिटिव्ह १९२ गावे वगळता अन्य गावांमधील गौण खनिज उत्खननावरील बंदी उठवण्यात आली.