शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

वाळू उत्खनन सर्व्हेनंतर शक्य

By admin | Updated: June 9, 2015 00:10 IST

उत्खनन बंदी : चेंडू ‘मेरिटाईम’च्या कोर्टात

रत्नागिरी : केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाकडून वाळू उत्खननाला हिरवा कंदिल मिळाला असला तरी मेरिटाईम बोर्डाकडून सर्वेक्षण झाल्यानंतरच उत्खननासाठी परवाने देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता वाळू व्यवसायाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. आवाज संस्थेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेअनुषंगाने पश्चिम घाट संरक्षित करण्याच्या दृष्टीने केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने आॅक्टोबर २०११ पासून रत्नागिरीसह कोकणात अधिस्थगन लागू केला होता. वाळू, जांभा दगड आदी गौण खनिजांच्या उत्खननावर बंदी आणल्याने वाळू व्यावसायिकांबरोबरच चिरेखाण व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवले होते. याबाबत पर्यावरण खात्याकडे पाठपुरावा केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील इको सेन्सिटिव्ह १९२ गावे वगळून उर्वरित गावांमधील गौण खनिज उत्खननावरील बंदी उठवण्यात आली. मात्र, जिल्ह्यातील खाडीपात्र तसेच नदीपात्रातील वाळू उत्खननावर आजतागायत बंदी आहे. गेल्या तीन वर्षांपासून असलेल्या या बंदीमुळे बांधकामासाठी चिरे, वाळू उपलब्ध होणे कठीण झाले होते. बांधकाम साहित्य बाहेरून आणावे लागत होते. बांधकाम व्यावसायिकांना जादा भुर्दंड सहन करून बाहेरून वाळू खरेदी करावी लागत आहे. शासकीय बांधकामेही रेंगाळली आहेत. वाळू लिलाव थांबल्याने प्रशासनाचा महसूलही बुडाला आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने वाळूवरील बंदी उठवल्याने व्यावसायिकांना हायसे वाटले आहे. पूर्वी जिल्हा खनिकर्म कार्यालयाकडून जिल्ह्यातील ३५ गटांना उत्खननासाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु आता वाळू उपसा व लिलावाचे हक्क मेरिटाईम बोर्डाकडे देण्यात आले आहेत. मेरिटाईम बोर्ड जिल्ह्यातील नद्या व खाड्यांचे सर्वेक्षण करून वाळू उत्खनन क्षेत्र ठरवणार आहे. त्यानुसार हातपाटी किंवा ड्रेजरसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला जाईल. (प्रतिनिधी)व्यावसायिकांवर आर्थिक संकटमेरिटाईम बोर्डाच्या सर्वेक्षणानंतर निश्चित केलेल्या उत्खनन क्षेत्रासाठी खनिकर्म विभागाला प्रस्ताव मागवता येणार आहेत. त्यामुळे मेरिटाईम बोर्ड सर्वेक्षण करून उत्खननासाठी कधी एकदा परवानगी देते, याकडे हातपाटी व्यावसायिकांसह अन्य वाळू व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. इको सेन्सिटिव्ह १९२ गावे वगळता अन्य गावांमधील गौण खनिज उत्खननावरील बंदी उठवण्यात आली.