शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

महामार्गावरील माती पावसाळ्यात ठरणार डाेकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:24 IST

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे़ मात्र, ताैक्ते वादळानंतर पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर येणारे पाणी ...

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे़ मात्र, ताैक्ते वादळानंतर पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर येणारे पाणी आणि चिखल याचे कोणतेच नियोजन केले नसल्याने पहिल्याच पावसात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल, माती आणि पाणी रस्त्यावर येण्याचे प्रकार घडले. यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि महामार्ग चौपदरीकरणाचा मूळ ठेकेदार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

आरवली ते वाकेड हे काम मुंबईतील एमईपी कंपनीला देण्यात आले आहे़ एमईपीने नियमबाह्य काम जे.एम. म्हात्रे कंपनीला दिले आहे़ हे काम सुरू करत असताना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत़ पहिल्याच पावसात महामार्गाची दुरवस्था झाल्याने पुढे काय हाेणार, याची चिंता पडली आहे़

मुंबई-गोवा महामार्ग आरवली ते वाकेडदरम्यान ९१ किलोमीटरमधील चौपदरीकरणाचे काम करत असताना काही ठिकाणी पाइप कलव्हर्ट, छोटे पूल, मोठे पूल आणि डोंगराची माती यामध्ये कामाचे नियोजन ढिसाळ असल्याचे दिसत आहे़ पाइप कलव्हर्ट आणि पुलांच्या कामासाठी केलेल्या खोदकामामुळे पावसाळ्यात प्रवाशांच्या प्रवासाला धोका निर्माण झाला आहे़ तर, डोंगराचा भाग खोदून केलेल्या कामाची माती रस्त्यावर आल्याने महामार्ग निसरडा होण्याची भीती निर्माण झाली आहे़ त्यामुळे अपघात घडण्याची स्थिती निर्माण होत आहे़

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम रखडले म्हणून संतोष येडगे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. कामाची पावसामुळे झालेली दुरवस्था पाहता आणि संभाव्य अपघात लक्षात घेऊन ही बाब आपण उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे याचिकाकर्ते संतोष येडगे यांनी सांगितले आहे.