शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

...तर चिपळुणात नव्याने बांधकामच करता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:35 IST

अडरे : जलसंपदा विभागाकडून शहरातील पूररेषा निश्चित करण्यात आली आहे. त्याबाबतचे नकाशेही जाहीर झाले आहेत. त्यानुसार ब्ल्यू लाइन ...

अडरे : जलसंपदा विभागाकडून शहरातील पूररेषा निश्चित करण्यात आली आहे. त्याबाबतचे नकाशेही जाहीर झाले आहेत. त्यानुसार ब्ल्यू लाइन पातळीत ८० टक्के शहर बाधित होत आहे, तर रेड लाइनमध्ये ठरावीक भाग वगळता शहराचा समावेश होत आहे. जलसंपदा विभागाच्या या आदेशाची अंमलबजावणी झाल्यास यापुढील काळात चिपळुणात एकही बांधकाम नव्याने करता येणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी करण्यापूर्वी नदीतील गाळ काढणे व पूर परिस्थिती आटोक्यात येण्याच्या उपायोजना राबविण्याची मागणी करण्यात आली.

अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे व आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत सोमवारी प्रांत कार्यालयात बैठक झाली. प्रामुख्याने २२ जुलैला आलेली पूर परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी उपाययोजना राबविण्याचे ठरविण्यात आले. वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी नाम फाउंडेशन यंत्रसामूग्री उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी डिझेलचा खर्च पालिकेच्या माध्यमातून केला जाणार आहे. याबाबतची सर्व प्रक्रिया येत्या आठवडाभरात पूर्ण करण्याची सूचना आमदार शेखर निकम यांनी दिली.

गाळ काढण्यास सुरुवात झाल्यानंतर काही अडचणी उद्भवतील. त्यावर आपण सर्व जण मात करू या. मात्र गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात होणे गरजेचे आहे, असे आमदारांनी सांगितले. या वेळी जलसंपदा विभागाने जाहीर केलेला ब्लू लाइन आणि रेड लाइनचा मुद्दा उपस्थित झाला. ब्ल्यू लाइनमध्ये ८० टक्के तर तर रेड लाइनमध्ये ९५ टक्के शहराचा भाग समाविष्ट होत आहे. या आदेशाची अंमलबजावणी करावयाची झाल्यास शहरात कोणालाही नव्याने बांधकाम करता येणार नाही. शाळा असो वा दवाखाने अथवा रहिवासी सदनिका या नव्याने उभारता येणार नाहीत. केवळ आहे त्याच जागेत इमारतीची दुरुस्ती करता येणार आहे. शासनाने याबाबतचा नकाशा संकेत स्थळावर प्रसिद्ध केला. लवकरच याबाबतचा आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणार आहे.

क्रीडाईचे अध्यक्ष राजेश वाजे म्हणाले, केवळ हात दुखतो म्हणून संपूर्ण हातच काढून टाकणे, असा हा प्रकार आहे. प्रथम महापुराची कारणे शोधली पाहिजेत. गेल्या शंभर वर्षांत नदीतील गाळ काढलेला नाही. हा गाळच प्रामुख्याने महापुरास कारणीभूत ठरतो. पहिल्या टप्प्यात महापूर न येण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. त्यानंतर जलसंपदा विभागाने पुन्हा सर्वेक्षण करावे आणि पूररेषा निश्चित करावी.

आमदार शेखर म्हणाले, जलसंपदा विभागाने जाहीर केलेली पूररेषेची पातळी शहरासाठी धोकादायक आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यास कोणत्याही प्रकारचा विकास शहरात होणार नाही. संपूर्ण बाजारपेठ उद्ध्वस्त होईल. याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू. या वेळी प्रांत प्रवीण पवार जलसंपदाच्या अधीक्षक नारकर, पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, गट विकास अधिकारी प्रशांत राऊत, शहानवाज शाह, रामशेठ रेडीज, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे यांच्यासह जलसंपदा बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

.................

दोन दिवसांत मदत वाटप

व्यापाऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेली मदत येत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत त्याचे ऑनलाइन पद्धतीने वाटप करण्यास सुरुवात केली जाईल, अशी माहितीही अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली.