शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

एसएमएस फंडा अनेकांना गंडा

By admin | Updated: August 27, 2014 23:13 IST

चिपळुणातील प्रकार : महिलांचीही फसवणूक

चिपळूण : तुम्हाला २५ लाख रुपयांचे बक्षीस लागले आहे, त्यासाठी १५ हजार रुपये भरा, असा एसएमएस येण्याचा प्रकार चिपळूणमध्ये सुरु आहे. मोबाईलद्वारे काही महिलांची फसवणूक झाली असल्याची चर्चा असून, अशा घटनांपासून नागरिकांनी सावध राहायला हवे, असे आवाहन माजी नगरसेविका सीमा चाळके यांनी केले आहे. सध्या मोबाईलचे युग असल्याने तरुण-तरुणींसह अनेकांच्या हातात सध्या मोबाईल पाहायला मिळतो. बँकेतील खातीही इंटरनेटशी जोडली गेली असल्याने खाते क्रमांक सांगून ग्राहकांना लुटण्याच्या घटना घडत आहेत. याचा अनुभव प्रत्यक्ष माजी नगरसेवक चाळके यांना आल्याचे त्यांनी सांगितले. तामिळनाडू येथून एक आपल्याला मोबाईलवरुन एसएमएस आला. आपल्याला २५ लाखांचे बक्षीस लागले आहे. त्यासाठी दिलेल्या खाते क्रमांकावर १५ हजार रुपये भरा, अशी सूचना करुन ३ तासाने तुमची भरलेली रक्कम परत मिळेल, असे आमिष दाखविले जात आहे. गोवळकोटसारख्या भागातही अशा प्रकारे ३ ते ४ महिलांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. तामिळनाडू येथील एका टोळीकडून नागरिकांना आपल्या बँकेचा अकाऊंट नंबर सांगा. आम्ही बँकेतून बोलत आहोत, असे सांगून बँक खात्यातील पैसे परस्पर गायब होण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याने याबाबत चाळके यांनी पोलीस यंत्रणेकडेही संबंधित व्यक्तीचा मोबाईल नंबर दिला आहे, असे चाळके यांनी सांगितले.आपल्याला मोठे बक्षिस लागले आहे, असे आमिष दाखवून फसवणुकीचा प्रकार होण्याची शक्यता असल्याने यापासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहनही चाळके यांनी केले आहे. (वार्ताहर)