शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

स्मशानशेड उभारणार

By admin | Updated: August 1, 2016 00:29 IST

३ कोटी ७ लाख रुपये खर्च होणार : मृत्यूनंतर चीरनिद्रेची होणार व्यवस्था

 रत्नागिरी : मरणानंतर शांत चित्ताने चिरनिद्रा मिळावी, यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्ह्यात १४९३ स्मशान शेड उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन मंडळाला लवकरच प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. जन्मापासून मरणापर्यंत जनतेला सोयीसुविधा देण्याचे धोरण शासनाने आखले आहे. मुलांचा जन्म होण्याआधीच गरोदर महिलांना योग्य आहार, तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी शासनाकडून घेण्यात येते. त्यानंतर शिक्षणापासून आता अन्नधान्याची सोय तर केली आहेच. शिवाय मोफत औषधोपचार करण्यासाठी जीवनदायी योजना सुरु केली. त्यातून हजारो लोकांना मरणातून वाचवण्यासाठी कॅन्सर, हृदय विकारावरही उपचार करण्यात येत आहेत. विकासाबरोबरच जनतेला सर्वच सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे धोरण शासनाकडून राबविले जात आहे. शासनाचे विकासाचे धोरण माणसाच्या अंतिम यात्रेपर्यंत म्हणजेच स्मशानभूमीपर्यंत जाऊन पोहोचले आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून जनसुविधाअंतर्गत स्मशान शेड उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हाभरातून प्रस्ताव मागवण्यात आले होते. जिल्ह्याच्या सर्वच ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन आपल्या हद्दीतील स्मशानभूमींसाठी आवश्यक असलेली स्मशानशेडचे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडे पाठवण्यात आले होते. ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील १४९३ स्मशानशेडचा आराखडा तयार केला होता. त्यानंतर तो प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठवण्यात येणार आहेत. जनसुविधाअंतर्गत स्मशान शेड बांधकामासाठी १ लाख ९२ हजार रुपये देण्यात येत होते. वाढत्या महागाईसह शासनानेही विचार करून त्यामध्ये वाढ करण्यात आली असून आता २ लाख ५२ हजार रुपये अनुदान दिले जात आहे. त्यामुळे शेडची कामे लवकरच होेणार आहेत. त्यासाठी ३ कोटी ७ लाख ९२ हजार २२ रुपयांचा निधी लागणार आहे. (शहर वार्ताहर) विकास धोरण : नियोजन मंडळाचे प्रयत्न तालुकानिहाय संख्या तालुका प्रस्तावित स्मशानशेड मंडणगड ३९ दापोली १७० खेड १११ चिपळूण ५०० गुहागर ५० संगमेश्वर २२३ रत्नागिरी १९९ लांजा ४४ राजापूर १५७ एकूण १४९३ ४नियोजन मंडळाकडे लवकरच सादर करणार प्रस्ताव. ४जिल्हा परिषदेने तयार केला प्रस्ताव. ४शासनाचे विकासाचे धोरण थेट स्मशानभूमीपर्यंत. ४जनसुविधाअंतर्गत उभारणार स्मशानशेड. शासनाचे विकासाचे धोरण माणसाच्या अंतिम यात्रेपर्यंत म्हणजेच स्मशानभूमीपर्यंत जाऊन पोहोचले आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून जनसुविधाअंतर्गत स्मशान शेड उभारण्यात येणार आहेत.