शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

स्मार्ट सिटी,फोल्डींग सायकल विज्ञान प्रदर्शनातील आकर्षण

By admin | Updated: January 19, 2015 00:24 IST

अखंड भारत स्वच्छता व गांधी जयंतीच्या ‘खेड्याकडे चला’ या संदेशाची प्रचिती आल्यावाचून राहत नाही.स्मार्ट सिटी किंवा गाव कसे असावे, तसेच कचरा निर्मूलन किंवा व्यवस्थापन यावर सर्वाधिक भर देण्यात आला होता

रत्नागिरी : ‘चिरंतन विश्वासाठी गणित आणि विज्ञान’ थिम घेऊन, आयोजित करण्यात आलेल्या ४० व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे लक्ष्य स्मार्ट सिटी कचरा व्यवस्थापन, फोल्डींग सायकल आकर्षण ठरत आहे. मुख्य द्वारावर उभा असलेला रोबोट सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. पाहुण्यांना नमस्कार किंवा हस्तांदोलन हे त्याचे खास आकर्षण होते. याशिवाय, फोल्डींग सायकल हा तर कुतूहलाचा विषय होता. महाविद्यालयाच्या तीन मजली इमारतीतील प्रत्येक खोलीतून ४३६ विविध प्रकल्प सादर करण्यात आले. दुषीत हवा शुद्धीकरण उपक्रम या प्रयोगातून गावातील, शहरातील, कारखान्यातील दुषीत हवेचे शुद्धीकरण कसे करता येईल, याचे विश्लेषण करण्यात आले होते. बोअरवेलमध्ये अडकलेले मुल फुग्याचा वापर करुन, कसे बाहेर काढता येईल यासाठी बालवैज्ञानिकांनी कल्पकतेने उपकरण मांडले होते. रेल्वेस्टेशनवरील अस्वच्छता दूर करण्यासाठी रेल्वेमध्ये स्टेशन येण्यापूर्वीच, सायरनचा वापर करुन स्टेशनमधून गाडी सुटेपर्यंत प्रसाधन गृहांचा वापर करता येणार नाही. जेणेकरुन प्रवाशांना याची जाणीव होईल व पर्यायाने स्थानक स्वच्छ राहिल.गृहिणींना घरच्या घरी व्यायाम करत असतानाच, घरातील अन्य कामेही कशी सुलभ होतील हे सांगण्यासाठी एक्सल बाईक कम वॉशिंग मशीन हे उपकरण मांडण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या उपक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या अखंड भारत स्वच्छता व गांधी जयंतीच्या ‘खेड्याकडे चला’ या संदेशाची प्रचिती आल्यावाचून राहत नाही.स्मार्ट सिटी किंवा गाव कसे असावे, तसेच कचरा निर्मूलन किंवा व्यवस्थापन यावर सर्वाधिक भर देण्यात आला होता. जेणेकरुन स्वच्छता राखण्यास हातभार लागेल. लोकसंख्या शिक्षणांतर्गत शिक्षकांनीही विविध प्रयोग मांडले होते. त्यामध्ये एडस् जनजागृती, शिक्षण करी देशाचे रक्षण, व्यसनाचे दुष्परिणाम, स्वच्छता व आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलन, मुलगी वाचवा हो आदी प्रयोग मांडून, त्यामधून सर्व जनतेस सामाजिक संदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)घनकचरा निर्मूलन करीत असतानाच, कचऱ्याचे विघटन करुन बायोगॅस, विद्युत निर्मिती तसेच गटारे व उद्योगाच्या सांडपाण्यांचे शुद्धीकरण तसेच, पुर्नवापर काच व कागद निर्मुलन त्याचा पुर्नवापर कसा करता येईल, हे प्रयोगातून मांडून संसर्गजन्य रोगाच्या प्रसारावर कसा प्रतिबंध होईल, हे मांडण्यात आले होते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मजूर तसेच जनावरांचा वापर न करता, आधुनिक शेतीयंत्र वापरले तर, कमी वेळेत व कमी खर्चात शेतीची कामे कशी सोपी होतील, हे आधुनिक शेती यंत्राद्वारे मांडण्यात आले होते. ज्या यंत्राद्वारे पेरणी, नांगरणी, खुरपणी, खते टाकणे तसेच फवारणीची कामे एकाच यंत्राने शक्य आहे.विद्यार्थ्यांना साध्या सोप्या भाषेत व खेळातून विज्ञान विषयाची आवड, गोडी निर्माण होण्यासाठी उपयुक्त असे, शैक्षणिक साहित्य वापरून ‘जीवनसत्वाची सापशिडी’ मांडण्यात आली होती. या खेळातून जीवनसत्वांचा स्रोत व त्याअभावी होणारे दुष्परिणाम, यांची माहिती समजण्यासाठी सोप्या तंत्राचा अवलंब करण्यात आला आहे. वाहनांचे गगनाला भिडलेले दर, तसेच इंधनांचे वाढते दर यावर उपाय म्हणून, पवन उर्जेवर चालणारी वाहने, सोलर, स्ट्रीट लाईट उपकरण मांडण्यात आले. नैसर्गिक आपत्ती, महापूर येण्यापूर्वी, त्याबाबतचे सुचक यंत्र तसेच एटीएम मशिनमध्येही होणारा चोरीचा प्रयत्न रोखण्यासाठी मोबाईलचा वापर कल्पकतेने करुन, त्याची कल्पना शाखा व्यवस्थापकास होऊन त्यांच्याव्दारे पोलिसांच्या मदतीने चोरांना लागलीच पकडणे शक्य होणार आहे.