शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
"प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
4
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
5
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
6
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
7
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
8
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
9
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
10
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
11
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
12
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
13
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
14
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
15
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
16
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
17
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
18
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
19
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
20
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल

आंबा घाटातील दरड काढण्याचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:33 IST

साखरपा/आंबा : रत्नागिरी - काेल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील दरड काढण्याचे काम गेल्या पाच दिवसांत केवळ चाळीस टक्केच झाले आहे. ...

साखरपा/आंबा : रत्नागिरी - काेल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील दरड काढण्याचे काम गेल्या पाच दिवसांत केवळ चाळीस टक्केच झाले आहे. पावसाचा जोर ओसरल्याने शक्य तिथे दिवसरात्र काम‌ करून एकेरी वाहतुकीसाठी तरी घाट सुरू करण्यात यावा, अशी मागणी हाेत आहे.

दरड काढण्यासोबत वजरे खिंडीलगत खचलेल्या रस्त्याचे बांधकाम करण्यास गती देणे गरजेचे आहे, तरच येथून अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरू होईल. सन २०१९ मध्ये याच खिंडीत नव्याने उभारलेल्या काँक्रीटच्या भिंती पहिल्याच पावसात खचल्या होत्या. त्याच्या पुढील वळणावर आता सत्तर फुटांचा रस्ता मध्यभागातून खचला आहे. खचलेल्या ठिकाणी दरीत सुमारे दोनशे फुटावर घळ पडल्याने खचलेला रस्ता उभारणीचे मोठे आव्हान आहे. गेल्या महिन्यात या ठिकाणाहून ट्रक दरीत कोसळून अपघात झाला होता तेव्हा बाजूपट्टी व ग्रिल निसटले होते. त्याच ठिकाणी आता निम्मा रस्ता तुटला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अजूनही बंद ठेवण्यात आली आहे.

----------------------------

रत्नागिरी - काेल्हापूर मार्गावर आंबा घाटातील वजरे खिंडीजवळ रस्ता खचलेला आहे.