शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

भरपाई वाटपाची गाडी हळूहळू रूळावर

By admin | Updated: March 2, 2016 01:32 IST

जिल्हा प्रशासन : ७१ हजार ८१२ शेतकऱ्यांना लाभ

रत्नागिरी : जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या नुकसान भरपाई वाटपाला वेग आला आहे. शासनाने हमीपत्र स्वीकारण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याने आता सामायिक खातेदारांच्या नुकसान भरपाई वाटपाची गाडी आता रूळावर येऊ लागली आहे. आतापर्यंत ७१,८१२ शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. २८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत झालेल्या अवेळी पावसाने जिल्ह्यातील शेतीपीक आणि फळपिकांचे नुकसान झाले होते. या अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील विविध फळपिकाअंतर्गत ५० टक्के एकत्रित रब्बी पिकाखालील क्षेत्र बाधित झाले होते. यात २०७१८.२० हेक्टर क्षेत्रावरील आंबापीक बाधित झाले, तर ११०९६.४१ हेक्टर क्षेत्रावरील काजूपिकाचे नुकसान झाले आहे. या दोन्ही पिकांचे नुकसान झालेल्या खातेदारांंची एकूण संख्या ६४,८७४ इतकी आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ३,१८,३४० इतके शेतकरी असून २०,०७१ एकेरी खातेदार आहेत, तर २,९८,२६९ इतके सामायिक खातेदार आहेत. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक २०,००१ इतके एकूण खातेदार असून, सामायिक १६,५११ तर वैयक्तिक खातेदार ३४९० आहेत. काही खातेदार अन्य ठिकाणी गेल्याने त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणे अवघड होत होते. काही खातेदारांकडून चुकीचे खातेक्रमांक आल्याने भरपाईची रक्कम खात्यावर जमा होण्यात अडचणी येत होत्या. कोकणात अनेक ठिकाणी ही समस्या निर्माण झाली होती. याबाबत प्रशासनाकडे तक्रारीही आल्या होत्या.कोकणात सामाईक मिळकत असल्याने ही समस्या उभी राहिली होती. नुकसानभरपाई कोणाच्या खात्यावर जमा करायची? असा प्रश्न उपस्थित झाला. मुख्य म्हणजे सातबारा उताऱ्यावर एकापेक्षा जास्त खातेदारांची नावे असल्याने सामायिक खातेदारांच्या खात्यावर रक्कम जमा होताना अडचणी येत होत्या. याबाबत बागायतदारांनी हमीपत्र स्वीकारून भरपाईची रक्कम देण्याची मागणी उचलून धरली होती. याबाबत विविध स्तरावर विचारविनिमय करण्यात आला.याप्रकरणी पालकमंत्री रवींद्र वायकर तसेच इथले स्थानिक नगरसेवक यांनीही ही हमीपत्राबाबत आग्रह धरल्याने ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेली. अखेर शासनाने या मागणीचा विचार करून सामायिक खातेदारांना हमीपत्रावर भरपाई देण्याची मागणी मान्य केल्याने अखेर भरपाई वाटपातील मोठा अडथळा दूर झाला आहे.मुळात कृषी विभागाकडील भरपाई वाटपाची जबाबदारी महसूल विभागाकडे देण्यात आली असली तरी महसूल विभागाकडे असलेला रिक्त पदांचा अनुशेष पाहता आहे त्याच कर्मचाऱ्यांवर ही भरपाईवाटपाची जबाबदारी देण्यात आली आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त बागायतदारांची संख्या लक्षात घेता या कर्मचाऱ्यांनाच ही अतिरिक्त जबाबदारी पेलावी लागत आहे. त्यामुळे वाटपाच्या गतीवरही त्याचा परिणाम होत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)तालुका शेतकरी वाटप करावयाचीखातेदार झालेले संख्याएकूण रक्कमसंख्यावाटपमंडणगड ५४६४३,८४,४१,०००२७९८१,६८,४५,६४०दापोली ८०७४३,९०,१८,५०० ५४०३२,५८,५६,५८८खेड ६६२७३,५२,०१,०००४२१२१,७५,७१,२३५चिपळूण ४५०७४४९५८५००८७४४२,५६,०३,८८९गुहागर ३८८६७२९५०२५०१०४१०२,७३,६७,२७३संगमेश्वर १२४०८१३८५२२५००६२७८४,५९,१७,०११ रत्नागिरी १०७७५१६८१६१००० २०००११०,४१,०९,२७८लांजा १०२४५१३६६११७५०६२९३५,३३,६२,९८५राजापूूर २८८८१२१५१०५००७६७३४,७७,७८,३३९एकूण ६४,८७४७९५३७५०००३१८३४०३६,४४,१२,२३८प्रश्न निकालीसामायिक खातेदार असल्याने जिल्ह्यात नुकसानभरपाईचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र यावरही शासनाने तोडगा काढल्याने आता भरपाईचा प्रश्न तात्पुरत्या स्वरुपात का होईना; परंतु निकाली निघाला आहे.