शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भरपाई वाटपाची गाडी हळूहळू रूळावर

By admin | Updated: March 2, 2016 01:32 IST

जिल्हा प्रशासन : ७१ हजार ८१२ शेतकऱ्यांना लाभ

रत्नागिरी : जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या नुकसान भरपाई वाटपाला वेग आला आहे. शासनाने हमीपत्र स्वीकारण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याने आता सामायिक खातेदारांच्या नुकसान भरपाई वाटपाची गाडी आता रूळावर येऊ लागली आहे. आतापर्यंत ७१,८१२ शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. २८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत झालेल्या अवेळी पावसाने जिल्ह्यातील शेतीपीक आणि फळपिकांचे नुकसान झाले होते. या अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील विविध फळपिकाअंतर्गत ५० टक्के एकत्रित रब्बी पिकाखालील क्षेत्र बाधित झाले होते. यात २०७१८.२० हेक्टर क्षेत्रावरील आंबापीक बाधित झाले, तर ११०९६.४१ हेक्टर क्षेत्रावरील काजूपिकाचे नुकसान झाले आहे. या दोन्ही पिकांचे नुकसान झालेल्या खातेदारांंची एकूण संख्या ६४,८७४ इतकी आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ३,१८,३४० इतके शेतकरी असून २०,०७१ एकेरी खातेदार आहेत, तर २,९८,२६९ इतके सामायिक खातेदार आहेत. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक २०,००१ इतके एकूण खातेदार असून, सामायिक १६,५११ तर वैयक्तिक खातेदार ३४९० आहेत. काही खातेदार अन्य ठिकाणी गेल्याने त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणे अवघड होत होते. काही खातेदारांकडून चुकीचे खातेक्रमांक आल्याने भरपाईची रक्कम खात्यावर जमा होण्यात अडचणी येत होत्या. कोकणात अनेक ठिकाणी ही समस्या निर्माण झाली होती. याबाबत प्रशासनाकडे तक्रारीही आल्या होत्या.कोकणात सामाईक मिळकत असल्याने ही समस्या उभी राहिली होती. नुकसानभरपाई कोणाच्या खात्यावर जमा करायची? असा प्रश्न उपस्थित झाला. मुख्य म्हणजे सातबारा उताऱ्यावर एकापेक्षा जास्त खातेदारांची नावे असल्याने सामायिक खातेदारांच्या खात्यावर रक्कम जमा होताना अडचणी येत होत्या. याबाबत बागायतदारांनी हमीपत्र स्वीकारून भरपाईची रक्कम देण्याची मागणी उचलून धरली होती. याबाबत विविध स्तरावर विचारविनिमय करण्यात आला.याप्रकरणी पालकमंत्री रवींद्र वायकर तसेच इथले स्थानिक नगरसेवक यांनीही ही हमीपत्राबाबत आग्रह धरल्याने ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेली. अखेर शासनाने या मागणीचा विचार करून सामायिक खातेदारांना हमीपत्रावर भरपाई देण्याची मागणी मान्य केल्याने अखेर भरपाई वाटपातील मोठा अडथळा दूर झाला आहे.मुळात कृषी विभागाकडील भरपाई वाटपाची जबाबदारी महसूल विभागाकडे देण्यात आली असली तरी महसूल विभागाकडे असलेला रिक्त पदांचा अनुशेष पाहता आहे त्याच कर्मचाऱ्यांवर ही भरपाईवाटपाची जबाबदारी देण्यात आली आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त बागायतदारांची संख्या लक्षात घेता या कर्मचाऱ्यांनाच ही अतिरिक्त जबाबदारी पेलावी लागत आहे. त्यामुळे वाटपाच्या गतीवरही त्याचा परिणाम होत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)तालुका शेतकरी वाटप करावयाचीखातेदार झालेले संख्याएकूण रक्कमसंख्यावाटपमंडणगड ५४६४३,८४,४१,०००२७९८१,६८,४५,६४०दापोली ८०७४३,९०,१८,५०० ५४०३२,५८,५६,५८८खेड ६६२७३,५२,०१,०००४२१२१,७५,७१,२३५चिपळूण ४५०७४४९५८५००८७४४२,५६,०३,८८९गुहागर ३८८६७२९५०२५०१०४१०२,७३,६७,२७३संगमेश्वर १२४०८१३८५२२५००६२७८४,५९,१७,०११ रत्नागिरी १०७७५१६८१६१००० २०००११०,४१,०९,२७८लांजा १०२४५१३६६११७५०६२९३५,३३,६२,९८५राजापूूर २८८८१२१५१०५००७६७३४,७७,७८,३३९एकूण ६४,८७४७९५३७५०००३१८३४०३६,४४,१२,२३८प्रश्न निकालीसामायिक खातेदार असल्याने जिल्ह्यात नुकसानभरपाईचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र यावरही शासनाने तोडगा काढल्याने आता भरपाईचा प्रश्न तात्पुरत्या स्वरुपात का होईना; परंतु निकाली निघाला आहे.