शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
3
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
4
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
5
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
6
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
7
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
8
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
10
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
11
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
12
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
13
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
14
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
15
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
16
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
17
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
18
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
19
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
20
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार

भरपाई वाटपाची गाडी हळूहळू रूळावर

By admin | Updated: March 2, 2016 01:32 IST

जिल्हा प्रशासन : ७१ हजार ८१२ शेतकऱ्यांना लाभ

रत्नागिरी : जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या नुकसान भरपाई वाटपाला वेग आला आहे. शासनाने हमीपत्र स्वीकारण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याने आता सामायिक खातेदारांच्या नुकसान भरपाई वाटपाची गाडी आता रूळावर येऊ लागली आहे. आतापर्यंत ७१,८१२ शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. २८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत झालेल्या अवेळी पावसाने जिल्ह्यातील शेतीपीक आणि फळपिकांचे नुकसान झाले होते. या अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील विविध फळपिकाअंतर्गत ५० टक्के एकत्रित रब्बी पिकाखालील क्षेत्र बाधित झाले होते. यात २०७१८.२० हेक्टर क्षेत्रावरील आंबापीक बाधित झाले, तर ११०९६.४१ हेक्टर क्षेत्रावरील काजूपिकाचे नुकसान झाले आहे. या दोन्ही पिकांचे नुकसान झालेल्या खातेदारांंची एकूण संख्या ६४,८७४ इतकी आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ३,१८,३४० इतके शेतकरी असून २०,०७१ एकेरी खातेदार आहेत, तर २,९८,२६९ इतके सामायिक खातेदार आहेत. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक २०,००१ इतके एकूण खातेदार असून, सामायिक १६,५११ तर वैयक्तिक खातेदार ३४९० आहेत. काही खातेदार अन्य ठिकाणी गेल्याने त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणे अवघड होत होते. काही खातेदारांकडून चुकीचे खातेक्रमांक आल्याने भरपाईची रक्कम खात्यावर जमा होण्यात अडचणी येत होत्या. कोकणात अनेक ठिकाणी ही समस्या निर्माण झाली होती. याबाबत प्रशासनाकडे तक्रारीही आल्या होत्या.कोकणात सामाईक मिळकत असल्याने ही समस्या उभी राहिली होती. नुकसानभरपाई कोणाच्या खात्यावर जमा करायची? असा प्रश्न उपस्थित झाला. मुख्य म्हणजे सातबारा उताऱ्यावर एकापेक्षा जास्त खातेदारांची नावे असल्याने सामायिक खातेदारांच्या खात्यावर रक्कम जमा होताना अडचणी येत होत्या. याबाबत बागायतदारांनी हमीपत्र स्वीकारून भरपाईची रक्कम देण्याची मागणी उचलून धरली होती. याबाबत विविध स्तरावर विचारविनिमय करण्यात आला.याप्रकरणी पालकमंत्री रवींद्र वायकर तसेच इथले स्थानिक नगरसेवक यांनीही ही हमीपत्राबाबत आग्रह धरल्याने ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेली. अखेर शासनाने या मागणीचा विचार करून सामायिक खातेदारांना हमीपत्रावर भरपाई देण्याची मागणी मान्य केल्याने अखेर भरपाई वाटपातील मोठा अडथळा दूर झाला आहे.मुळात कृषी विभागाकडील भरपाई वाटपाची जबाबदारी महसूल विभागाकडे देण्यात आली असली तरी महसूल विभागाकडे असलेला रिक्त पदांचा अनुशेष पाहता आहे त्याच कर्मचाऱ्यांवर ही भरपाईवाटपाची जबाबदारी देण्यात आली आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त बागायतदारांची संख्या लक्षात घेता या कर्मचाऱ्यांनाच ही अतिरिक्त जबाबदारी पेलावी लागत आहे. त्यामुळे वाटपाच्या गतीवरही त्याचा परिणाम होत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)तालुका शेतकरी वाटप करावयाचीखातेदार झालेले संख्याएकूण रक्कमसंख्यावाटपमंडणगड ५४६४३,८४,४१,०००२७९८१,६८,४५,६४०दापोली ८०७४३,९०,१८,५०० ५४०३२,५८,५६,५८८खेड ६६२७३,५२,०१,०००४२१२१,७५,७१,२३५चिपळूण ४५०७४४९५८५००८७४४२,५६,०३,८८९गुहागर ३८८६७२९५०२५०१०४१०२,७३,६७,२७३संगमेश्वर १२४०८१३८५२२५००६२७८४,५९,१७,०११ रत्नागिरी १०७७५१६८१६१००० २०००११०,४१,०९,२७८लांजा १०२४५१३६६११७५०६२९३५,३३,६२,९८५राजापूूर २८८८१२१५१०५००७६७३४,७७,७८,३३९एकूण ६४,८७४७९५३७५०००३१८३४०३६,४४,१२,२३८प्रश्न निकालीसामायिक खातेदार असल्याने जिल्ह्यात नुकसानभरपाईचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र यावरही शासनाने तोडगा काढल्याने आता भरपाईचा प्रश्न तात्पुरत्या स्वरुपात का होईना; परंतु निकाली निघाला आहे.