शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

पावसाची हळूहळू पाठ; चिपळूण, खेडमध्ये मदतकार्याला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:33 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात हळूहळू पावसाची पाठ फिरू लागली आहे. दिवसभरात तुरळक सरी पडत आहेत. ऊन पडू लागल्याने आता काहीअंशी ...

रत्नागिरी : जिल्ह्यात हळूहळू पावसाची पाठ फिरू लागली आहे. दिवसभरात तुरळक सरी पडत आहेत. ऊन पडू लागल्याने आता काहीअंशी उकाडाही सुरू झाला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण १४५.५० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वच तालुक्यांमध्ये सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. चिपळूण, खेड भागात त्यामुळे मदतकार्याला वेग आला आहे.

गेल्या बुधवारी रात्रीपासून दोन दिवस सलग झालेल्या अतिवृष्टीने चिपळूण, खेड, राजापूर आणि रत्नागिरीतील काही गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण केली. मात्र, शुक्रवारपासून पावसाने विश्रांती घेण्यास सुरूवात केली. त्यामुळे पूरपरिस्थिती निवळली असून, पाणी ओसरण्यास सुरूवात झाली आहे. या ढगफुटीसदृश्य पावसाचा तडाखा चिपळूण आणि खेड या दोन तालुक्यांना मोठ्या प्रमाणावर बसला. पावसामुळे ही दोन शहरे आणि परिसरातील गावे जलमय झाली. त्याचबरोबर अनेक भागांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने जीवितहानीही झाली.

सध्या पूरग्रस्त भागांमध्ये सामाजिक संस्था, सामाजिक - राजकीय कार्यकर्ते मदतीसाठी सरसावले आहेत. त्याचबरोबर प्रशासनाचेही युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पाऊस थांबल्याने आता मदतकार्याला वेग आला आहे. सध्या घरात - दुकानांमध्ये पुराच्या पाण्यामुळे झालेला चिखल उपसण्याचे काम सुरू असून, पूरग्रस्तांना जीवनावश्यक विविध वस्तूंचे वाटप सुरू आहे.

गेल्या दोन - तीन दिवसांपासून हळूहळू पाऊस कमी होत असून, कडाक्याचे ऊन पडत आहे. अधूनमधून तुरळक सर येत आहे. पाऊस थांबल्याने आता हळूहळू उकाडाही वाढू लागला आहे.