शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

पावसाची हळूहळू पाठ; चिपळूण, खेडमध्ये मदतकार्याला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:33 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात हळूहळू पावसाची पाठ फिरू लागली आहे. दिवसभरात तुरळक सरी पडत आहेत. ऊन पडू लागल्याने आता काहीअंशी ...

रत्नागिरी : जिल्ह्यात हळूहळू पावसाची पाठ फिरू लागली आहे. दिवसभरात तुरळक सरी पडत आहेत. ऊन पडू लागल्याने आता काहीअंशी उकाडाही सुरू झाला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण १४५.५० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वच तालुक्यांमध्ये सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. चिपळूण, खेड भागात त्यामुळे मदतकार्याला वेग आला आहे.

गेल्या बुधवारी रात्रीपासून दोन दिवस सलग झालेल्या अतिवृष्टीने चिपळूण, खेड, राजापूर आणि रत्नागिरीतील काही गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण केली. मात्र, शुक्रवारपासून पावसाने विश्रांती घेण्यास सुरूवात केली. त्यामुळे पूरपरिस्थिती निवळली असून, पाणी ओसरण्यास सुरूवात झाली आहे. या ढगफुटीसदृश्य पावसाचा तडाखा चिपळूण आणि खेड या दोन तालुक्यांना मोठ्या प्रमाणावर बसला. पावसामुळे ही दोन शहरे आणि परिसरातील गावे जलमय झाली. त्याचबरोबर अनेक भागांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने जीवितहानीही झाली.

सध्या पूरग्रस्त भागांमध्ये सामाजिक संस्था, सामाजिक - राजकीय कार्यकर्ते मदतीसाठी सरसावले आहेत. त्याचबरोबर प्रशासनाचेही युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पाऊस थांबल्याने आता मदतकार्याला वेग आला आहे. सध्या घरात - दुकानांमध्ये पुराच्या पाण्यामुळे झालेला चिखल उपसण्याचे काम सुरू असून, पूरग्रस्तांना जीवनावश्यक विविध वस्तूंचे वाटप सुरू आहे.

गेल्या दोन - तीन दिवसांपासून हळूहळू पाऊस कमी होत असून, कडाक्याचे ऊन पडत आहे. अधूनमधून तुरळक सर येत आहे. पाऊस थांबल्याने आता हळूहळू उकाडाही वाढू लागला आहे.