शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची हळूहळू पाठ; चिपळूण, खेडमध्ये मदतकार्याला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:33 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात हळूहळू पावसाची पाठ फिरू लागली आहे. दिवसभरात तुरळक सरी पडत आहेत. ऊन पडू लागल्याने आता काहीअंशी ...

रत्नागिरी : जिल्ह्यात हळूहळू पावसाची पाठ फिरू लागली आहे. दिवसभरात तुरळक सरी पडत आहेत. ऊन पडू लागल्याने आता काहीअंशी उकाडाही सुरू झाला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण १४५.५० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वच तालुक्यांमध्ये सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. चिपळूण, खेड भागात त्यामुळे मदतकार्याला वेग आला आहे.

गेल्या बुधवारी रात्रीपासून दोन दिवस सलग झालेल्या अतिवृष्टीने चिपळूण, खेड, राजापूर आणि रत्नागिरीतील काही गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण केली. मात्र, शुक्रवारपासून पावसाने विश्रांती घेण्यास सुरूवात केली. त्यामुळे पूरपरिस्थिती निवळली असून, पाणी ओसरण्यास सुरूवात झाली आहे. या ढगफुटीसदृश्य पावसाचा तडाखा चिपळूण आणि खेड या दोन तालुक्यांना मोठ्या प्रमाणावर बसला. पावसामुळे ही दोन शहरे आणि परिसरातील गावे जलमय झाली. त्याचबरोबर अनेक भागांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने जीवितहानीही झाली.

सध्या पूरग्रस्त भागांमध्ये सामाजिक संस्था, सामाजिक - राजकीय कार्यकर्ते मदतीसाठी सरसावले आहेत. त्याचबरोबर प्रशासनाचेही युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पाऊस थांबल्याने आता मदतकार्याला वेग आला आहे. सध्या घरात - दुकानांमध्ये पुराच्या पाण्यामुळे झालेला चिखल उपसण्याचे काम सुरू असून, पूरग्रस्तांना जीवनावश्यक विविध वस्तूंचे वाटप सुरू आहे.

गेल्या दोन - तीन दिवसांपासून हळूहळू पाऊस कमी होत असून, कडाक्याचे ऊन पडत आहे. अधूनमधून तुरळक सर येत आहे. पाऊस थांबल्याने आता हळूहळू उकाडाही वाढू लागला आहे.