शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनिवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
2
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
3
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
4
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
5
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
6
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
7
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
8
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
9
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
10
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
11
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
12
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
13
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
14
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
15
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
16
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
17
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
18
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
19
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
20
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल

सहा महिन्यांत डेंग्यूचे ६६ रुग्ण गतवर्षीपेक्षा रुग्णांच्या प्रमाणात घट

By admin | Updated: November 3, 2014 23:32 IST

घनकचरा, पाण्याचे व्यवस्थापन आवश्यक आहे़

रत्नागिरी : राज्यात अनेक ठिकाणी डेंग्यूच्या साथीने थैमान घातलेले असताना जिल्ह्यात डेंग्यू तापाचे प्रमाण कमी आहे़ मागील सहा महिन्यांमध्ये जिल्ह्यात डेंग्यूचे ६६ रुग्ण आढळून आले असून, सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही़डेंग्यू हा एडीस इजिटी या डासांपासून होतो़ डेंग्यूकडे दुर्लक्ष झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो़ इतर जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यूचे प्रमाण फार कमी आहे़ डेंग्यू ताप दोन प्रकारचा असतो़ तीव्र स्वरूपाचा ताप येणे, डोकेदुखी, स्नायूदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, डोळे तीव्र दुखणे, अंगावर पुरळ येणे, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे ही डेंग्यू तापाची लक्षणे आहेत. शिवाय त्वचेखाली रक्तस्राव होणे, नाकातून रक्तस्राव होणे आणि रक्ताची उलटी होणे अशीही लक्षणे आढळून येतात़ जिल्ह्यात गतवर्षी या कालावधीत डेंग्यूचे ८९ रुग्ण आढळले होते़ त्यातील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नव्हता़ त्यानंतर चालू आर्थिक वर्षात मार्चपासून आतापर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे ६६ रुग्ण आढळून आले आहेत़ डेंग्यूची उत्पत्ती रोखण्यासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक आहे़ कोरडा दिवस पाळणे, योग्य घनकचरा व्यवस्थापन, टायर-ट्यूबची वेळीच विल्हेवाट लावणे किंवा बंद अवस्थेत ठेवणे, डेंग्यूबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे़ (शहर वार्ताहर)जिल्ह्यातील ग्रामपंचायती, नगरपालिका यांनी डास नियंत्रण अंमलबजावणी करणे आवश्यक आहे़ त्यासाठी घनकचरा, पाण्याचे व्यवस्थापन आवश्यक आहे़ - डॉ़ कॅप्टन बी़ जी़ टोणपे, जिल्हा हिवताप अधिकारी, रत्नागिरी़डेंग्यू रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारीतालुकारुग्णदापोली१ खेड१चिपळूण९ गुहागर१५संगमेश्वर१४रत्नागिरी२१लांजा४राजापूर१एकूण६६