शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

परिस्थिती गंभीर, घरी राहणे फायद्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:13 IST

कोरोनाचा नायनाट कधी होणार आणि सर्वांचे आयुष्य पूर्वपदावर कधी येणाऱ या प्रश्नाने प्रत्येक जण ग्रासला गेला आहे़. सर्वांचे जीवनमान ...

कोरोनाचा नायनाट कधी होणार आणि सर्वांचे आयुष्य पूर्वपदावर कधी येणाऱ या प्रश्नाने प्रत्येक जण ग्रासला गेला आहे़. सर्वांचे जीवनमान पूर्वपदावर येण्यासाठी प्रत्येकानेच कोरोनाशी लढा देण्याचा संकल्प करण्याची गरज आहे़ प्रत्येकाने या संकटातून बाहेर पडायचे आहे, असेल तर काही गोष्टी आपणाला कराव्या लागणार आहेत़ यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काढणे अवश्यक आहे़.

कोरोना वाडी-वस्त्या, गावांमध्ये पोहोचला आहे़. पहिल्या टप्प्यामध्ये शहरी भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण होते़. आता तर ग्रामीण भागामध्येही संख्या वाढल्याने चिंतेची बाब बनली आहे़. गावाकडचा माणूस भोळाभाबडा, असे म्हटले जाते़. पहिल्या टप्प्याच्या वेळी गावकऱ्यांनी अनेक गावांमध्ये गावाच्या सीमा बंद केल्या होत्या़. त्यामुळे काही ठिकाणी याला विरोधही झाला होता़. त्यातच कोरोना रुग्ण सापडल्यास त्या गावच्या परिसराचा काही किलोमीटरपर्यंतचा भाग बंद करण्यात येत होता़. मात्र, आता ते दिवस राहिलेले नाहीत़. त्यामुळे आता अधिक काळजी घेणे गरजेचे आहे़. कारण कोरोनाचा प्रसार आता हवेतूनही होत असल्याने त्याचा संसर्ग अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही़. त्यामुळेच आज कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असून ग्रामीण भागालाही विळखा घेतला आहे़. त्यातच मृतांची आकडेवारी दररोज वाढत असून ही बाब चिंताजनक आहे़. त्यामुळे अनेकांचे संसार उदध्वस्त होत आहेत़. एकेका कुटुंबातील कमवती व्यक्ती तर काही कुटुंबातील दोन-दोन व्यक्ती कोरोनाचे बळी पडत असल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळत आहे़. या बळींमध्ये आता तरुणांची संख्याही वाढू लागल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनत चालली आहे़. त्यामुळे प्रत्येकाने स्वत: जपायला पाहिजे़ आधी जीव नंतरच सर्व काही, असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे़.

कोरोनाचे वाढते संकट पाहाता शासनाने आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढविले आहे. मात्र, निर्बंध अधिक कडकही करण्यात आले आहेत. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करुन घ्यावे. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर चाचण्या आणि कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांचीही चाचणी करावी. तसेच शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अशा बाबी केल्यास कोरोनाला दूर ठेवता येईल.

जिल्ह्यातील काही गावांनी स्वत:हून कडक लॉकडाऊन पाळण्याचे जाहीर केले आहे. मरण्यापेक्षा घरात बसलेले बरे, अशी परिस्थिती निर्माण झाल्यानेच गावांना स्वत:हून निर्णय घेण्याची वेळ आली आहे. याची जाणीव प्रत्येकाने स्वत:ला करुन घेणे आवश्यक आहे. अन्यथा फार गंभीर परिणाम भोगावे लागतील, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.

रहिम दलाल