शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

परिस्थिती गंभीर, घरी राहणे फायद्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:13 IST

कोरोनाचा नायनाट कधी होणार आणि सर्वांचे आयुष्य पूर्वपदावर कधी येणाऱ या प्रश्नाने प्रत्येक जण ग्रासला गेला आहे़. सर्वांचे जीवनमान ...

कोरोनाचा नायनाट कधी होणार आणि सर्वांचे आयुष्य पूर्वपदावर कधी येणाऱ या प्रश्नाने प्रत्येक जण ग्रासला गेला आहे़. सर्वांचे जीवनमान पूर्वपदावर येण्यासाठी प्रत्येकानेच कोरोनाशी लढा देण्याचा संकल्प करण्याची गरज आहे़ प्रत्येकाने या संकटातून बाहेर पडायचे आहे, असेल तर काही गोष्टी आपणाला कराव्या लागणार आहेत़ यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काढणे अवश्यक आहे़.

कोरोना वाडी-वस्त्या, गावांमध्ये पोहोचला आहे़. पहिल्या टप्प्यामध्ये शहरी भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण होते़. आता तर ग्रामीण भागामध्येही संख्या वाढल्याने चिंतेची बाब बनली आहे़. गावाकडचा माणूस भोळाभाबडा, असे म्हटले जाते़. पहिल्या टप्प्याच्या वेळी गावकऱ्यांनी अनेक गावांमध्ये गावाच्या सीमा बंद केल्या होत्या़. त्यामुळे काही ठिकाणी याला विरोधही झाला होता़. त्यातच कोरोना रुग्ण सापडल्यास त्या गावच्या परिसराचा काही किलोमीटरपर्यंतचा भाग बंद करण्यात येत होता़. मात्र, आता ते दिवस राहिलेले नाहीत़. त्यामुळे आता अधिक काळजी घेणे गरजेचे आहे़. कारण कोरोनाचा प्रसार आता हवेतूनही होत असल्याने त्याचा संसर्ग अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही़. त्यामुळेच आज कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असून ग्रामीण भागालाही विळखा घेतला आहे़. त्यातच मृतांची आकडेवारी दररोज वाढत असून ही बाब चिंताजनक आहे़. त्यामुळे अनेकांचे संसार उदध्वस्त होत आहेत़. एकेका कुटुंबातील कमवती व्यक्ती तर काही कुटुंबातील दोन-दोन व्यक्ती कोरोनाचे बळी पडत असल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळत आहे़. या बळींमध्ये आता तरुणांची संख्याही वाढू लागल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनत चालली आहे़. त्यामुळे प्रत्येकाने स्वत: जपायला पाहिजे़ आधी जीव नंतरच सर्व काही, असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे़.

कोरोनाचे वाढते संकट पाहाता शासनाने आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढविले आहे. मात्र, निर्बंध अधिक कडकही करण्यात आले आहेत. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करुन घ्यावे. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर चाचण्या आणि कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांचीही चाचणी करावी. तसेच शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अशा बाबी केल्यास कोरोनाला दूर ठेवता येईल.

जिल्ह्यातील काही गावांनी स्वत:हून कडक लॉकडाऊन पाळण्याचे जाहीर केले आहे. मरण्यापेक्षा घरात बसलेले बरे, अशी परिस्थिती निर्माण झाल्यानेच गावांना स्वत:हून निर्णय घेण्याची वेळ आली आहे. याची जाणीव प्रत्येकाने स्वत:ला करुन घेणे आवश्यक आहे. अन्यथा फार गंभीर परिणाम भोगावे लागतील, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.

रहिम दलाल