शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित जागांसाठी पक्षांच्या दाही दिशा

By admin | Updated: April 3, 2015 00:46 IST

राजकारण तापले : निवडणुक, पोटनिवडणुकीतून शक्ती दाखवणार

राजापूर : तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक तर ११ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून, सर्वच पक्षीय आपापले उमेदवारी अर्ज सादर करण्यात गुंतले आहेत. ७ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून आरक्षित प्रभागातील उमेदवारांसहित महिलांची शोध मोहीम जोरात सुरु आहे. तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध पार पाडण्याच्यादृष्टीने तयारी सुरु आहे.तालुक्यात एकूण १०१ ग्रामपंचायती असून, त्यापैकी ५० टक्के म्हणजे ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका या महिन्यात पार पडत आहेत. त्यामध्ये शिवणे खुर्द, गोवळ, धोेश्वर, शीळ, ओणी, कोंडीवळे, कोदवली, देवाचे गोठणे, चिखलगाव, चुनाकोळवण, मंदरुळ, हातदे, करक, पांगरी खुर्द, हरळ, कारवली, येरडाव, मिळंद, जवळेथर, काजिर्डा, कोळंब, फुफेरे, ओशिवळे, सौंदळ, कशेळी, सोलगाव, आंबोळगड, वाडापेठ, कोंडसर बु., उन्हाळे, मोरोशी, पन्हळेतर्फे सौंदळ, वालये, पांगरे बु., दोनिवडे, ससाळे, महाळुंगे, तळगाव, मोसम, अणसुरे, निवेली, दळे, कुवेशी, कुंभवडे, तारळ, पडवे यांचा समावेश आहे तर देवाचे गोठणे, कोतापूर, वडवली, खरवते, वडदहसोळ, पडवे, कोळवणखडी, आंगले, साखरीनाटे, मोगरे व कोंड्येतर्फे सौंदळ अशा ११ ग्रामपंचायती अंतर्गत पोटनिवडणुका पार पडत आहेत. त्यामुळे तालुक्यात ६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून ७ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत, तर २२ एप्रिलला मतदान पार पडेल. यामुळे तालुक्यातील विविध राजकीय पक्षांची लगबग सुरु आहे. राजापुरात प्रामुख्याने शिवसेना व काँग्रेस या दोन पक्षांकडे जास्त ग्रामपंचायती आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादीकडे ग्रामपंचायती आहेत. केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपचे मात्र तालुक्यात खाते शून्य आहे. मनसेसह आरपीआयचीदेखील परिस्थिती अशीच आहे.प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत आरणिातील स्त्री, पुरुष उमेदवारांचे जात प्रमाणपत्रासाठी आता धावपळ सुरु आहे. गतवेळी काही ठिकाणी आरक्षणांतर्गत जातीचे प्रमाणपत्र नसल्याने काही ठिकाणच्या जागा रिक्त राहिल्या होत्या. तशी वेळ यावेळी येऊ नये म्हणून अनेक राजकीय पक्षांनी ती खबरदारी घेतली आहे. स्थानिक पातळीवरील विकास प्रचारादरम्यानचा महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे.गावांतर्गत असलेली शांतता सुव्यवस्था अबाधित राहवी यासाठी बिनविरोध पार पडाव्यात यासाठी गावोगावच्या तंटामुक्त समित्या सरसावल्या असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत. जिल्हापरिषदेसह पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण निवडणुकमय बनू लागले आहे. (प्रतिनिधी)