शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

मान्सूनचा पाऊस बरसतोय श्रावण सरींनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा कमी झाला आहे. सध्या पाऊस श्रावणातील सरींसारखा सुरू झाला आहे. मध्येच एखादी पावसाची ...

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा कमी झाला आहे. सध्या पाऊस श्रावणातील सरींसारखा सुरू झाला आहे. मध्येच एखादी पावसाची सर आणि क्षणार्धात ऊन पडू लागले आहे. रात्रीही पावसाची विश्रांती असते. गेल्या २४ तासांत एकूण १४१.२० मिलीमीटर (सरासरी १५.६९ मिलीमीटर) पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला पावसाने चांगलाच जोर घेतला होता. आठवडाभर रात्री दमदार पाऊस पडत होता. त्यामुळे काही दिवस रात्री पाऊस आणि दिवसा ऊन असा खेळ सुरू होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर एकदमच कमी झाला आहे.

मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने गेल्या वर्षीची आकडेवारी ओलांडली आहे. गेल्या वर्षी १ ते २१ जून या कालावधीत ५९० मिलीमीटर इतका पाऊस झाला होता. यंदा या कालावधीत ७१० मिलीमीटर पाऊस झाला आहे. म्हणजेच १२० मिलीमीटरने अधिक पाऊस झाला आहे. मात्र, आता जोर कमी झाला आहे.

आता दिवसभरात पावसाची सर अधूनमधून येत असते. मात्र, दिवसभर ऊन पडलेले. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती अशी, मंडणगड तालुक्यात पुरार-म्हाप्रळ-मंडणगड रस्त्यावर काही ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाडे हटविण्याचे काम चालू आहे. उर्वरित तालुक्यात कुठल्याही पावसाच्या घडामोडीची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे झालेली नाही.