शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना वाढत असल्याने ‘शिवशाही’ला अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:32 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने, शिवशाही बसेससाठी प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाला ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने, शिवशाही बसेससाठी प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाला आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत ५५ शिवशाही गाड्या मुंबई, पुणे मार्गावर धावत होत्या. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून प्रवासी संख्या घटल्यामुळे बसेसची संख्या कमी झाली आहे. सध्या ३५ शिवशाही गाड्या दररोज धावत आहेत.

वातानुकूलित तसेच आरामदायी सुविधा उपलब्ध असलेल्या शिवशाही बसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. सुरुवातीला खासगी कंपनीमार्फत शिवशाही बसेस चालविण्यात येत असताना प्रचंड तक्रारी होत्या. मात्र आता महामंडळातर्फेच शिवशाही बसेस चालविण्यात येत असल्याने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. शिवाय ऑनलाईन आरक्षण सुविधा उपलब्ध असल्याने येता-जातानाचे आरक्षण उपलब्ध होत आहे. खासगी वाहतुकीप्रमाणे गर्दीच्या वा गर्दी नसलेल्या हंगामात तिकीट दरांत चढउतार होत नाहीत. दर स्थिर असल्याने प्रवाशांकडून ‘शिवशाही’साठी पसंती दर्शविली जात आहे. परंतु गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रवासी वातानुकूलित गाडीतून प्रवास टाळू लागल्याने गर्दी ओसरली आहे.

पुणे मार्गावर १५, तर मुंबईसाठी २० गाड्या

सध्या पुणे मार्गावर १५, तर मुंबई मार्गावर २० शिवशाही बसेस सोडण्यात येत आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे वातानुकूलित गाड्यांतून प्रवास टाळू लागल्याने प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळेच मुंबई-पुणे मार्गावरील २० गाड्यांची संख्या कमी झाली आहे.

उत्पन्नात चढ-उतार कायम

नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत ५५ गाड्या दररोज सोडण्यात आल्या; मात्र उत्पन्नातील चढ-उतार सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये पाच लाख ३३ हजार, डिसेंबरमध्ये ५ लाख ३८ हजार, जानेवारीत सात लाख ८२ हजार, तर फेब्रुवारीत पाच लाख दहा हजार रुपये उत्पन्न रत्नागिरी विभागाला प्राप्त झाले होते.

शिवशाही सुरू झाल्यापासून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्यातील अनेक मंडळी मुंबई-पुणे येथे नोकरी, व्यवसायासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे या गाड्यांसाठी प्रवाशांचा ओघ कायम आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. वातानुकूलित वाहनातून प्रवास करणे टाळू लागल्याने प्रवाशांची संख्या कमी झाल्याने दैनंदिन नियोजनातील २० गाड्या कमी करण्यात आल्या आहेत.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

प्रतिसादानंतर निर्णय

प्रवाशांमध्ये एस.टी.बद्दलची विश्वासार्हता कायम आहे. त्यामुळेच ‘शिवशाही’साठी प्रवाशांनी पसंती दर्शविली आहे. वातानुकूलित, आरामदायी प्रवासासाठी शिवशाहीची निवड केली जाते. स्लिपर कोच शिवशाहीलाही वाढती पसंती आहे. मात्र प्रवाशांमध्ये कोरोनाची भीती असल्याने वातानुकूलित बसचा प्रतिसाद कमी झाला आहे. प्रतिसादाअभावीच दैनंदिन ५५ गाड्यांपैकी २० गाड्या कमी असून ३५ गाड्या सोडण्यात येत आहेत. भविष्यातही प्रवासी प्रतिसादानंतरच शिवशाही गाड्यांची संख्या कमी-अधिक करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. गेल्या चार महिन्यात जानेवारीत ‘शिवशाही’ला चांगला प्रतिसाद लाभला; मात्र मार्चमध्ये प्रवासी संख्या घटल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे.