शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

कोरोना वाढत असल्याने ‘शिवशाही’ला अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:32 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने, शिवशाही बसेससाठी प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाला ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने, शिवशाही बसेससाठी प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाला आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत ५५ शिवशाही गाड्या मुंबई, पुणे मार्गावर धावत होत्या. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून प्रवासी संख्या घटल्यामुळे बसेसची संख्या कमी झाली आहे. सध्या ३५ शिवशाही गाड्या दररोज धावत आहेत.

वातानुकूलित तसेच आरामदायी सुविधा उपलब्ध असलेल्या शिवशाही बसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. सुरुवातीला खासगी कंपनीमार्फत शिवशाही बसेस चालविण्यात येत असताना प्रचंड तक्रारी होत्या. मात्र आता महामंडळातर्फेच शिवशाही बसेस चालविण्यात येत असल्याने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. शिवाय ऑनलाईन आरक्षण सुविधा उपलब्ध असल्याने येता-जातानाचे आरक्षण उपलब्ध होत आहे. खासगी वाहतुकीप्रमाणे गर्दीच्या वा गर्दी नसलेल्या हंगामात तिकीट दरांत चढउतार होत नाहीत. दर स्थिर असल्याने प्रवाशांकडून ‘शिवशाही’साठी पसंती दर्शविली जात आहे. परंतु गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रवासी वातानुकूलित गाडीतून प्रवास टाळू लागल्याने गर्दी ओसरली आहे.

पुणे मार्गावर १५, तर मुंबईसाठी २० गाड्या

सध्या पुणे मार्गावर १५, तर मुंबई मार्गावर २० शिवशाही बसेस सोडण्यात येत आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे वातानुकूलित गाड्यांतून प्रवास टाळू लागल्याने प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळेच मुंबई-पुणे मार्गावरील २० गाड्यांची संख्या कमी झाली आहे.

उत्पन्नात चढ-उतार कायम

नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत ५५ गाड्या दररोज सोडण्यात आल्या; मात्र उत्पन्नातील चढ-उतार सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये पाच लाख ३३ हजार, डिसेंबरमध्ये ५ लाख ३८ हजार, जानेवारीत सात लाख ८२ हजार, तर फेब्रुवारीत पाच लाख दहा हजार रुपये उत्पन्न रत्नागिरी विभागाला प्राप्त झाले होते.

शिवशाही सुरू झाल्यापासून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्यातील अनेक मंडळी मुंबई-पुणे येथे नोकरी, व्यवसायासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे या गाड्यांसाठी प्रवाशांचा ओघ कायम आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. वातानुकूलित वाहनातून प्रवास करणे टाळू लागल्याने प्रवाशांची संख्या कमी झाल्याने दैनंदिन नियोजनातील २० गाड्या कमी करण्यात आल्या आहेत.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

प्रतिसादानंतर निर्णय

प्रवाशांमध्ये एस.टी.बद्दलची विश्वासार्हता कायम आहे. त्यामुळेच ‘शिवशाही’साठी प्रवाशांनी पसंती दर्शविली आहे. वातानुकूलित, आरामदायी प्रवासासाठी शिवशाहीची निवड केली जाते. स्लिपर कोच शिवशाहीलाही वाढती पसंती आहे. मात्र प्रवाशांमध्ये कोरोनाची भीती असल्याने वातानुकूलित बसचा प्रतिसाद कमी झाला आहे. प्रतिसादाअभावीच दैनंदिन ५५ गाड्यांपैकी २० गाड्या कमी असून ३५ गाड्या सोडण्यात येत आहेत. भविष्यातही प्रवासी प्रतिसादानंतरच शिवशाही गाड्यांची संख्या कमी-अधिक करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. गेल्या चार महिन्यात जानेवारीत ‘शिवशाही’ला चांगला प्रतिसाद लाभला; मात्र मार्चमध्ये प्रवासी संख्या घटल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे.