शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
3
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
4
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
5
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
6
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
7
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
8
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
9
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
10
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
11
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
12
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
13
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
14
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
15
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
17
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
18
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
19
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
20
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

कोरोना वाढत असल्याने ‘शिवशाही’ला अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:32 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने, शिवशाही बसेससाठी प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाला ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने, शिवशाही बसेससाठी प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाला आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत ५५ शिवशाही गाड्या मुंबई, पुणे मार्गावर धावत होत्या. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून प्रवासी संख्या घटल्यामुळे बसेसची संख्या कमी झाली आहे. सध्या ३५ शिवशाही गाड्या दररोज धावत आहेत.

वातानुकूलित तसेच आरामदायी सुविधा उपलब्ध असलेल्या शिवशाही बसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. सुरुवातीला खासगी कंपनीमार्फत शिवशाही बसेस चालविण्यात येत असताना प्रचंड तक्रारी होत्या. मात्र आता महामंडळातर्फेच शिवशाही बसेस चालविण्यात येत असल्याने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. शिवाय ऑनलाईन आरक्षण सुविधा उपलब्ध असल्याने येता-जातानाचे आरक्षण उपलब्ध होत आहे. खासगी वाहतुकीप्रमाणे गर्दीच्या वा गर्दी नसलेल्या हंगामात तिकीट दरांत चढउतार होत नाहीत. दर स्थिर असल्याने प्रवाशांकडून ‘शिवशाही’साठी पसंती दर्शविली जात आहे. परंतु गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रवासी वातानुकूलित गाडीतून प्रवास टाळू लागल्याने गर्दी ओसरली आहे.

पुणे मार्गावर १५, तर मुंबईसाठी २० गाड्या

सध्या पुणे मार्गावर १५, तर मुंबई मार्गावर २० शिवशाही बसेस सोडण्यात येत आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे वातानुकूलित गाड्यांतून प्रवास टाळू लागल्याने प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळेच मुंबई-पुणे मार्गावरील २० गाड्यांची संख्या कमी झाली आहे.

उत्पन्नात चढ-उतार कायम

नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत ५५ गाड्या दररोज सोडण्यात आल्या; मात्र उत्पन्नातील चढ-उतार सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये पाच लाख ३३ हजार, डिसेंबरमध्ये ५ लाख ३८ हजार, जानेवारीत सात लाख ८२ हजार, तर फेब्रुवारीत पाच लाख दहा हजार रुपये उत्पन्न रत्नागिरी विभागाला प्राप्त झाले होते.

शिवशाही सुरू झाल्यापासून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्यातील अनेक मंडळी मुंबई-पुणे येथे नोकरी, व्यवसायासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे या गाड्यांसाठी प्रवाशांचा ओघ कायम आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. वातानुकूलित वाहनातून प्रवास करणे टाळू लागल्याने प्रवाशांची संख्या कमी झाल्याने दैनंदिन नियोजनातील २० गाड्या कमी करण्यात आल्या आहेत.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

प्रतिसादानंतर निर्णय

प्रवाशांमध्ये एस.टी.बद्दलची विश्वासार्हता कायम आहे. त्यामुळेच ‘शिवशाही’साठी प्रवाशांनी पसंती दर्शविली आहे. वातानुकूलित, आरामदायी प्रवासासाठी शिवशाहीची निवड केली जाते. स्लिपर कोच शिवशाहीलाही वाढती पसंती आहे. मात्र प्रवाशांमध्ये कोरोनाची भीती असल्याने वातानुकूलित बसचा प्रतिसाद कमी झाला आहे. प्रतिसादाअभावीच दैनंदिन ५५ गाड्यांपैकी २० गाड्या कमी असून ३५ गाड्या सोडण्यात येत आहेत. भविष्यातही प्रवासी प्रतिसादानंतरच शिवशाही गाड्यांची संख्या कमी-अधिक करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. गेल्या चार महिन्यात जानेवारीत ‘शिवशाही’ला चांगला प्रतिसाद लाभला; मात्र मार्चमध्ये प्रवासी संख्या घटल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे.