शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
4
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
5
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
6
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
7
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
8
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
9
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
10
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
11
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
12
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
13
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
14
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
15
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
17
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
18
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
19
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
20
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?

सागरी सुरक्षा कायद्यात लवकरच मोठे बदल

By admin | Updated: February 12, 2016 23:42 IST

राम शिंदे : सर्व संबंधित विभागांशी चर्चा करणार

रत्नागिरी : कोकणला ७२० किलोमीटर लांबीचा सागरकिनारा लाभला असून, सागरी सुरक्षा अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे. त्यामुळेच सागरात कोणी संशयित सापडल्यावर त्याला तहसीलदारांच्या ताब्यात देण्याची तरतूद असलेल्या १९८१ च्या कायद्यात येत्या अधिवेशनापूर्वी महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत. सर्व संबंधित विभागांशी चर्चा करून त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा पोलीस कार्यालयातील सभागृहात सागरी सुरक्षिततेबाबत शुक्रवारी दुपारी मंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर मंत्री शिंदे पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्यासोबत कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुुषार पाटील व अन्य अधिकारी उपस्थित होते.गेल्या काही वर्षांतील अतिरेकी कारवायांसाठी सागरी किनाऱ्याचाच वापर झाल्याने सागरी सुरक्षिततेसाठी शासनानेही महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मात्र, सागरी क्षेत्रात घुसखोरी केल्यानंतर, संशयित व्यक्ती सापडल्यानंतर त्या व्यक्तीला तहसीलदारांकडे कारवाईसाठी सादर केले जाते. तेथे जुन्या कायद्यानुसार कारवाई होते. अशा घुसखोरीला आळा घालण्यासाठी अत्यंत कठोर कायदा असणे आवश्यक आहे. त्यासाठीच १९८१ च्या सागरी कायद्यातील बदल आवश्यक झाले आहेत, असे ते म्हणाले. गेल्या काही वर्षांत मच्छिमारी नौकांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे कोणत्या नौका किनाऱ्यावर, बंदरात येतात व समुद्रात जातात, त्यांना नंबर देण्याचे काम योग्यरीत्या होते की नाही, याकडे सातत्याने लक्ष ठेवण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मार्चमध्ये सुधारणा बैठककायद्यात आवश्यक बदल राज्य येत्या अधिवेशनापूर्वी केले जाणार आहेत. त्यासाठी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किनारपट्टीवरील संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक मुंबईत घेतली जाईल व कायद्यातील आवश्यक सुधारणांवर शिक्कामोर्तब केले जाईल, असे मंत्री शिंदे म्हणाले.मंत्री शिंदे म्हणाले...सागरी सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना पोहण्याचे प्रशिक्षण देणार. ४जिल्ह्यास मंजूर असलेल्या पदांपैकी २५ पदेच भरली गेली आहेत. उर्वरित पदेही भरली जाणार. गस्तिनौकांना इंधनाची कमतरता भासू देणार नाही.पोलीस खाते वापरत असलेल्या जिल्ह्यातील जुन्या इमारती नव्याने उभारणार. राज्यभरातील सर्व पोलिसांना घरे देणार. रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिसांच्या घरांसाठी गृहनिर्माण विभागाकडून २९ कोटींची तरतूद.