शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा देणारी दुकानेही आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:31 IST

रत्नागिरी : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत रत्नागिरीत अत्यावश्यक सेवेवरही जिल्हा प्रशासनाने निर्बंध आणले असून त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू करण्यात आली ...

रत्नागिरी : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत रत्नागिरीत अत्यावश्यक सेवेवरही जिल्हा प्रशासनाने निर्बंध आणले असून त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने तसेच भाजी विक्रेते यांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत घरपोच सेवा देण्याची मुभा दिली आहे. दुकाने उघडलेली दिसल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तसेच औषध दुकानांमधील कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे.

शासनाने १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लाॅकडाऊन केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळून अन्य दुकानांना सुरू करण्यास मनाई करण्यात आली आहे. यानुसार, शुक्रवारी अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश असलेले किराणा दुकानदार, भाजीविक्रेते, औषध दुकाने यांच्यासह बेकरी आदी दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला असल्याने ही दुकानेही तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच केंद्र सरकारच्या कोरोनाविषयक निर्देशानुसार घरपोच सेवेशी संबंधित कामगार वर्गाचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्याचेही आदेश दिले आहेत.

शुक्रवारी ही सर्व दुकाने सुरू होती. या दुकानदारांना एका दिवसात माल संपविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कोरोना टेस्ट करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

मात्र, औषधांची दुकाने वगळता अन्य दुकानांना बंदी घालण्यात आल्याने व्यापाऱ्यांमधून पुन्हा तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा सर्वच दुकानदारांना घरपाेच देता येणे शक्य नाही. त्यामुळे ही दुकाने बंद राहिली तर या दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. त्यामुळे किमान किराणा, दूध, भाजीपाला आदी अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

सध्या प्रशासनाकडून अचानक अत्यावश्यक दुकानेही बंद करण्याचे आदेश आल्याने या दुकानदारांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान शनिवारपासून सर्वच दुकाने बंद राहणार असल्याने घरात बसलेल्या नागरिकांच्या जिवाला ‘उद्यापासून काय’ हा घोर लागून राहिला आहे.

चौकट

- अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने यांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत केवळ घरपाेच सेवा देता येणार आहे.

- आवश्यक सेवा पुरविणारे दुकान मालक, त्यामध्ये काम करणारा कामगार वर्ग यांचे लवकारत लवकर लसीकरण करावे. ग्राहकांशी संवाद साधताना पारदर्शक काचेमधून संपर्क अथवा इतर सुरक्षा उपाय, ऑनलाइन पेंमेंट इत्यादीचे पालन करावे.

चौकट

- नियमांचा भंग करणाऱ्या दुकानमालक, कर्मचारी किंवा ग्राहकाला पाचशे रुपये दंड केला जाईल. तसेच कोविड सुसंगत वागणुकीचा भंग करणाऱ्या ग्राहकाला माल दिला जात असेल तर दुकानाला एक हजार रुपये दंड केला जाईल. तसेच शर्तभंगाची पुनरावृत्ती झाल्यास कोरोना साथ संपेपर्यंत दुकान बंद करण्याची कार्यवाही केली जाईल.

- रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थ विक्रेत्यांना जागेवर खाद्यपदार्थ खाण्यास पुरविता येणार नाहीत. फक्त पार्सल सेवा व घरपोच सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सर्व दिवशी सुरू ठेवता येतील.

-