शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा रत्नागिरीत मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : दसºयापूर्वी राज्यातील शेतकºयांना कर्जमुक्ती मिळावी, या मागणीसाठी सोमवारी रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.राज्यातील शेतकºयांना कर्जमुक्त करण्याची घोषणा राज्य सरकारने करून तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अजूनही त्याचा लाभ शेतकºयांना मिळत नाही. आॅनलाईन अर्ज प्रक्रियेमुळे शेतकºयांना अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : दसºयापूर्वी राज्यातील शेतकºयांना कर्जमुक्ती मिळावी, या मागणीसाठी सोमवारी रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.राज्यातील शेतकºयांना कर्जमुक्त करण्याची घोषणा राज्य सरकारने करून तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अजूनही त्याचा लाभ शेतकºयांना मिळत नाही. आॅनलाईन अर्ज प्रक्रियेमुळे शेतकºयांना अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे सर्वच शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ मिळावा, यासाठी शिवसेनेने सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.आठवडा बाजार येथून मोर्चाला सुरुवात झाली. यात आमदार राजन साळवी, आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, सचिन कदम, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापूकर, उपजिल्हाप्रमुख (शहर) संजय साळवी, महिला जिल्हा संघटक शिल्पा सुर्वे, योगेश कदम, तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी शिष्टमंडळाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी स्वीकारले.पोलिसांशी बाचाबाचीआठवडा बाजारातून आलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेल्यानंतर दोन आमदार, जिल्हाप्रमुखांसह एक शिष्टमंडळ निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी गेले. सर्वांना आत सोडले जाणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे पोलिसांची आणि सेना पदाधिकाºयांची बाचाबाची झाली. मात्र, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी केलेल्या सूचनेमुळे सर्वांना आत पाठविण्यात आले आणि वाद मिटला.