शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

खरा सामना रंगणार शिवसेना विरुद्ध शिवसेना

By admin | Updated: February 1, 2017 23:33 IST

रणसंग्राम : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये परिवर्तन ?

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरीरत्नागिरी जिल्हा परिषद व ९ पंचायत समित्यांसाठी येत्या २१ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत कमालीची चुरस पाहायला मिळणार आहे. ही निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी व भाजप अशी तिरंगी होणार असली तरी शिवसेनेतील ‘महाबंडखोरी’मुळे ‘सेना विरूध्द सेना’ असाच सामना रंगणार असल्याची स्पष्ट चिन्ह आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेला पराभूत करण्याची ताकद सध्या तरी कोणत्याही पक्षात नाही. सेनेला सेनाच पराभूत करू शकते, याचा अनुभव या निवडणुकीत येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून सख्ख्या भावाप्रमाणे राजकीय क्षेत्रात मिरवत होते. काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात भाजपची फारशी ताकद नव्हती. सेनेशी असलेल्या युतीमुळे भाजपलाही जिल्ह्याच्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही हात -पाय पसरता आले. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील सेना-भाजप युती तुटली. त्याचे परिणाम राज्यभरातील युतीवर झाले. तरीही विधानसभा निवडणुकीनंतर सेना राज्याच्या सत्तेत सहभागी झाली. मात्र, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यभरातील युतीही सेनेने संपुष्टात आणली. त्याचे परिणाम आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दिसून येत आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचा पाया भक्कम आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता आणण्याचा निर्धार शिवेसेनेने केला आहे. सेनेसाठी हा निर्धार प्रत्यक्षात आणणे, त्यांची जिल्ह्यातील ताकद पाहता अशक्य नाही. परंतु जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी सेनेत २००पेक्षा अधिक, तर ९ पंचायत समित्यांमधील ११० जागांसाठी सहाशे ते सातशे इच्छुकांची संख्या पाहता उमेदवार ठरविणे हे सेनेच्या वरिष्ठांसाठी जणू आव्हानच ठरले आहे.आधीच उत्तर रत्नागिरीतील दापोली, खेड, मंडणगडमध्ये सेनेत अनेक नेत्यांची संस्थाने व त्यांच्यातील मतभेद यामुळे संघटनेचे मोठे नुकसान झाले आहे. तेथील मतभेद मिटविण्यात नेत्यांना अजूनही यश आलेले नाही. दक्षिण रत्नागिरीत फारसे वाद नव्हते. तरीही सेनेतील उमेदवारीसाठी इच्छुकांच्या महापुरामुळे भाजपने ही संधी अचूक हेरली. सेनेने नाकारलेल्या इच्छुकांसाठी भाजपने पायघड्या अंथरल्या. भाजपच्या या जाळ्यात सेनेतील अनेक बंडखोर अलगद अडकले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेश मुकादम, देवरूख पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती प्रमोद अधटराव यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला आहे. आपले राजीनामे पक्षाकडे सादर केले आहेत. अजून अनेकजण भाजपच्या वाटेवर आहेत. सेनेतील बंडखोरी पाहता या निवडणुकीत सेना विरुध्द सेना असाच सामना रंगण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.