शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात शिवसेनाच अव्वल

By admin | Updated: October 20, 2014 22:30 IST

मजबूत पकड : पूर्ण यश नसले तरी बालेकिल्ल्याची सुभेदारी कायम

रत्नागिरी : जिल्ह्यात तळागाळापर्यंत पोहोचलेले, सर्वसामान्यांशी कायम संपर्कात राहणारे कार्यकर्ते फक्त शिवसेनेकडे असल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीतून स्पष्ट झाले. जिल्ह्यातील ७ लाख ९६ हजार ९५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ३ लाख २६ हजार ८७२ मते म्हणजेच ४१.0१ टक्के इतकी मते एकट्या शिवसेनेला मिळाली आहेत. रत्नागिरी मतदार संघात शिवसेनेला मिळालेली १00 टक्के मते शिवसेनेची नसली तरी त्यातील खूप मोठा वाटा शिवसेनेचा आहे. त्यामुळे तळागाळात आजही शिवसेनेची बीजे घट्ट असल्याचे स्पष्ट होत आहे.रविवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. पाचपैकी तीन विधानसभा मतदार संघांमध्ये शिवसेनेने भगवा फडकवला. गतवेळी शिवसेनेकडे असलेला दापोली विधानसभा मतदार संघ यावेळी राष्ट्रवादीकडे गेला असला तरी गेल्या वेळी राष्ट्रवादीकडे असलेला रत्नागिरी मतदारसंघ यावेळी शिवसेनेकडे आला आहे. त्यामुळे विधानसभेतील रत्नागिरीचा वाटा कायम ठेवण्यात शिवसेनेला यश आले आहे.जिल्ह्यात मिळालेल्या सव्वातीन लाख मतांचा विचार केला, तर सर्वाधिक ९३ हजार ८७६ मते शिवसेनेला रत्नागिरीत मिळाली आहेत. अर्थात ही सर्वच्या सर्व मते शिवसेनेची नाहीत. ज्या काही ‘अर्थ’पूर्ण तडजोडी झाल्या त्यात राष्ट्रवादी आणि भाजपची मतेही शिवसेनेला मिळाली. पण, शिवसेना रत्नागिरी तालुक्यात आधीपासूनच मजबूत आहे, हे नक्की. काही ‘मोला’ची वाढीव मते वगळली, तरी शिवसेनेचा मतांमधील वाटा खूप मोठा आहे. त्याखालोखाल शिवसेनेला अधिक मते मिळाली ती राजापूर मतदार संघात. येथे राजन साळवी यांनी ७६ हजार २६६ मते मिळवली. ही सर्वच मते ही पूर्णपणे शिवसेनेचीच आहेत.शिवसेनेचा तिसरा आमदार निवडून आलेल्या चिपळूण मतदार संघात शिवसेनेच्या मतांची संख्या आहे. ती आहे ७५ हजार ६९५. गतनिवडणुकीत युती असताना शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांना ७६,0१५ मते मिळाली होती. याच मतदार संघातील भाजप उमेदवाराला ९,१४३ मते मिळाल्यामुळे चव्हाण यांची थोडी मते कमी झाली आहेत. पण, जी मते त्यांना मिळाली आहेत, ती पूर्णपणे शिवसेनेची आहेत.दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेनेला पराभव पत्करावा लागला. पण, तेथेही शिवसेनेची ताकद मोठीच आहे. सूर्यकांत दळवी यांना ३ हजार २६४ मतांनी पराभूत व्हावे लागले. गत निवडणुकीत त्यांनी ४६ हजारांचे मताधिक्य मिळवले होते. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अनंत गीते यांना या मतदार संघात १७ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. येथील सूर्यकांत दळवी यांच्याबाबत असलेल्या नाराजीमुळे शिवसेनेची मते इतरत्र वळली. रत्नागिरील पक्षांतरामुळे जी समीकरणे बदलली, त्यात जिल्हा पषिदेचे सभापती आयत्यावेळी बदलले गेले. त्यामुळे काहीजण सूर्यकांत दळवी यांच्यापासून लांब गेले. त्याचा त्रास दळवी यांना सहन करावा लागला. पण, शिवसेना या मतदार संघातही मजबूत असल्याचे स्पष्ट झाले.शिवसेना कमी झाली आहे ती गुहागर मतदारसंघात. अनंत गीते आणि रामदास कदम यांच्यातील गटातटाच्या राजकारणामुळे गुहागरमध्ये शिवसेना थोडी बॅकफूटवर आली आहे. २00९च्या निवडणुकीत शिवसेनेच्या रामदास कदम यांना ४0 हजार ३२ मते मिळाली होती. मात्र, यावेळी ती मते ३२ हजार ८३ वर आली आहेत. ही मते भाजपकडे वळली असण्याची अधिक शक्यता आहे.शिवसेनेची ही मते लक्षात घेता कसलीही फाटाफूट झाली नाही, तर सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर पुन्हा एकदा कब्जा करण्याची ताकद शिवसेनेकडेच आहे. (प्रतिनिधी)