शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात शिवसेनाच अव्वल

By admin | Updated: October 20, 2014 22:30 IST

मजबूत पकड : पूर्ण यश नसले तरी बालेकिल्ल्याची सुभेदारी कायम

रत्नागिरी : जिल्ह्यात तळागाळापर्यंत पोहोचलेले, सर्वसामान्यांशी कायम संपर्कात राहणारे कार्यकर्ते फक्त शिवसेनेकडे असल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीतून स्पष्ट झाले. जिल्ह्यातील ७ लाख ९६ हजार ९५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ३ लाख २६ हजार ८७२ मते म्हणजेच ४१.0१ टक्के इतकी मते एकट्या शिवसेनेला मिळाली आहेत. रत्नागिरी मतदार संघात शिवसेनेला मिळालेली १00 टक्के मते शिवसेनेची नसली तरी त्यातील खूप मोठा वाटा शिवसेनेचा आहे. त्यामुळे तळागाळात आजही शिवसेनेची बीजे घट्ट असल्याचे स्पष्ट होत आहे.रविवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. पाचपैकी तीन विधानसभा मतदार संघांमध्ये शिवसेनेने भगवा फडकवला. गतवेळी शिवसेनेकडे असलेला दापोली विधानसभा मतदार संघ यावेळी राष्ट्रवादीकडे गेला असला तरी गेल्या वेळी राष्ट्रवादीकडे असलेला रत्नागिरी मतदारसंघ यावेळी शिवसेनेकडे आला आहे. त्यामुळे विधानसभेतील रत्नागिरीचा वाटा कायम ठेवण्यात शिवसेनेला यश आले आहे.जिल्ह्यात मिळालेल्या सव्वातीन लाख मतांचा विचार केला, तर सर्वाधिक ९३ हजार ८७६ मते शिवसेनेला रत्नागिरीत मिळाली आहेत. अर्थात ही सर्वच्या सर्व मते शिवसेनेची नाहीत. ज्या काही ‘अर्थ’पूर्ण तडजोडी झाल्या त्यात राष्ट्रवादी आणि भाजपची मतेही शिवसेनेला मिळाली. पण, शिवसेना रत्नागिरी तालुक्यात आधीपासूनच मजबूत आहे, हे नक्की. काही ‘मोला’ची वाढीव मते वगळली, तरी शिवसेनेचा मतांमधील वाटा खूप मोठा आहे. त्याखालोखाल शिवसेनेला अधिक मते मिळाली ती राजापूर मतदार संघात. येथे राजन साळवी यांनी ७६ हजार २६६ मते मिळवली. ही सर्वच मते ही पूर्णपणे शिवसेनेचीच आहेत.शिवसेनेचा तिसरा आमदार निवडून आलेल्या चिपळूण मतदार संघात शिवसेनेच्या मतांची संख्या आहे. ती आहे ७५ हजार ६९५. गतनिवडणुकीत युती असताना शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांना ७६,0१५ मते मिळाली होती. याच मतदार संघातील भाजप उमेदवाराला ९,१४३ मते मिळाल्यामुळे चव्हाण यांची थोडी मते कमी झाली आहेत. पण, जी मते त्यांना मिळाली आहेत, ती पूर्णपणे शिवसेनेची आहेत.दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेनेला पराभव पत्करावा लागला. पण, तेथेही शिवसेनेची ताकद मोठीच आहे. सूर्यकांत दळवी यांना ३ हजार २६४ मतांनी पराभूत व्हावे लागले. गत निवडणुकीत त्यांनी ४६ हजारांचे मताधिक्य मिळवले होते. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अनंत गीते यांना या मतदार संघात १७ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. येथील सूर्यकांत दळवी यांच्याबाबत असलेल्या नाराजीमुळे शिवसेनेची मते इतरत्र वळली. रत्नागिरील पक्षांतरामुळे जी समीकरणे बदलली, त्यात जिल्हा पषिदेचे सभापती आयत्यावेळी बदलले गेले. त्यामुळे काहीजण सूर्यकांत दळवी यांच्यापासून लांब गेले. त्याचा त्रास दळवी यांना सहन करावा लागला. पण, शिवसेना या मतदार संघातही मजबूत असल्याचे स्पष्ट झाले.शिवसेना कमी झाली आहे ती गुहागर मतदारसंघात. अनंत गीते आणि रामदास कदम यांच्यातील गटातटाच्या राजकारणामुळे गुहागरमध्ये शिवसेना थोडी बॅकफूटवर आली आहे. २00९च्या निवडणुकीत शिवसेनेच्या रामदास कदम यांना ४0 हजार ३२ मते मिळाली होती. मात्र, यावेळी ती मते ३२ हजार ८३ वर आली आहेत. ही मते भाजपकडे वळली असण्याची अधिक शक्यता आहे.शिवसेनेची ही मते लक्षात घेता कसलीही फाटाफूट झाली नाही, तर सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर पुन्हा एकदा कब्जा करण्याची ताकद शिवसेनेकडेच आहे. (प्रतिनिधी)